शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
3
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
4
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
5
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
6
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
7
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
8
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
9
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
10
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
11
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
12
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
13
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
14
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
15
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
16
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
17
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
18
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
19
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
20
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'

भाषा आणि शिक्षणाचा व्यवसायात अडसर नाही -धनंजय दातार

By admin | Updated: September 19, 2016 00:12 IST

औरंगाबाद : नोटा मोजता येण्याएवढे शिक्षण व्यवसायासाठी पुरेसे असून, आपणास मोठे व्हायचे आहे, अशी जिद्द मात्र मनात असायला हवी.

औरंगाबाद : तुम्ही कोणती भाषा बोलता, शिक्षण किती झाले, याचा व्यवसायात कधीच अडसर येत नाही. नोटा मोजता येण्याएवढे शिक्षण व्यवसायासाठी पुरेसे असून, आपणास मोठे व्हायचे आहे, अशी जिद्द मात्र मनात असायला हवी. ग्राहक हा देव असून, तो कोणत्याही धर्माचा असू शकतो, त्यामुळे सर्व धर्मांचा आदर करा, असा सल्ला प्रख्यात उद्योजक, मसालाकिंग धनंजय दातार यांनी रविवारी येथे दिला.अ. भा. ब्राह्मण महासंघ महाराष्ट्र प्रदेश शाखेच्या वतीने बीड बायपासवरील गुरूलॉन्स येथे आयोजित ब्रह्मोद्योग प्रदर्शन आणि ब्राह्मण उद्योजक संमेलनातील परिसंवादात दातार यांनी अतिशय परखड आणि नेमकेपणाने आपला जीवनप्रवास उलगडत यशाची गुपितेही सांगितली. डॉ. नचिकेत वाचासुंदर यांनी दातार यांची मुलाखत घेतली. अकोला येथील मूळ रहिवासी असलेल्या आणि लहानपण अतिशय गरिबीत काढलेल्या दातार यांनी वयाच्या केवळ विसाव्या वर्षी दुबई गाठली. वडिलांबरोबर दुकानामध्ये अहोरात्र काम करीत यशाची एकेक पायरी सर केली. हे सारे करताना आपल्याला खूप मोठे व्हायचे आहे, हे मी कधीही विसरलो नाही आणि आजही तेच उद्दिष्ट माझ्यासमोर सतत असते, असे त्यांनी सांगितले.इंग्रजीचा बाऊ करूनकाव्यवसायाकरिता विशिष्ट प्रकारचेच शिक्षण हवे असे म्हणणे साफ चुकीचे असल्याचे सांगत नोटा मोजण्यापुरते शिक्षणही पुरेसे आहे. व्यवहारज्ञान, धाडस, सारासार विवेकबुद्धी आणि ‘मौका देखकर चौका मारना’ जमायला हवे. इंग्रजी भाषेचे अकारण स्तोम माजवू नका, ती येत नसेल तरी काही बिघडत नाही, असे त्यांनी आपल्या अनुभव कथनातून सांगितले.स्वत:च्या पैशाने व्यवसाय न करण्याचा सल्लाही त्यांनी दिला. बँकांकडून कर्ज काढा, त्यांचे हप्ते व्यवस्थित फेडा, स्वत:ची पत निर्माण करा. धंद्यातून पैसा, नफा मिळविणे हे जरी ध्येय असले तरी स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, मिळविलेल्या पैशाचा उपभोगही घ्या, असे त्यांनी सांगितले.मुख्यमंत्र्यांबद्दल नाराजीब्राह्मणांसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, पौरोहित्य करणाऱ्यांना दरमहा पाच हजार मानधन द्यावे, ब्राह्मणविरोधी लिखाण करणाऱ्या पुस्तकांवर बंदी घालावी, या आमच्या प्रमुख तीन मागण्या आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दोन मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले होते; परंतु राज्यात सत्ताबदल झाला. युती सरकार आल्यानंतर ब्राह्मण समाजाने आनंद व्यक्त केला. देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने ब्राह्मण मुख्यमंत्री राज्याला मिळाला; परंतु त्यांनी ब्राह्मण महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेणे टाळले, अशा शद्बात अ.भा. ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी आपली नाराजी व्यक्त केली. ————गुणवत्तेचा वापर करागुणवत्ता ही ब्राह्मण समाजाला जन्मजात मिळालेली देण आहे. या गुणवत्तेचा तरुणांनी प्रत्यक्ष कृतीत वापर करावा, असे आवाहन बडवे इंजिनिअरिंगचे श्रीकांत बडवे यांनी केले. यश कधी एकट्याने मिळत नसते तर त्यासाठी चांगल्या लोकांची टीम तुमच्याबरोबर हवी. आपण काहीतरी वेगळे, दर्जेदार काम करायला लागलो तर यश फार दूर नसते, असेही त्यांनी सांगितले. उद्योजक मिलिंद कंक, सीए उमेश शर्मा यांचेही भाषण झाले.