शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

खंडपीठाच्या सुरक्षाभिंतीखालील भूभाग खचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:02 IST

औरंगाबाद : मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या सुमारे पाचशे मीटर सुरक्षाभिंतीचा काही भाग खचल्याने अवजड ट्रक गुरुवारी खंडपीठ ...

औरंगाबाद : मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या सुमारे पाचशे मीटर सुरक्षाभिंतीचा काही भाग खचल्याने अवजड ट्रक गुरुवारी खंडपीठ वाहनतळाच्या आवारात उलटला. या घटनेत जीवितहानी झाली नाही; परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधलेल्या सुरक्षाभिंतीच्या कामाचा दर्जा चर्चेत आला.

तीन वर्षांपूर्वी सुरक्षाभिंतीची उंची वाढविताना तीन फुटांपेक्षा जास्त बांधकाम करण्यात आले. मात्र, पायाच्या मजबुतीकडे दुर्लक्ष झाल्याने तो खचल्याचे बोलले जात आहे. भिंतीवर भिंत बांधण्यास कंत्राटदाराने नकार दिला होता. परंतु, शाखा आणि उपअभियंत्यांनी सर्व परवानगीसह ते काम करून घेतले. अभियंता वाघमारे आणि तोंडे यांच्या काळात ते काम झाले. बांधकाम विभागाच्या इमारत डिव्हीजनकडे याबाबत काहीही माहिती नाही. उडवा-उडवीची उत्तरे देऊन प्रत्येकजण हातवर करीत आहे. न्यायालयाच्या कामातच एवढा अंधाधुंदपणा सुरू असेल तर इतर कामांच्या दर्जाविषयी काय सांगणार, असा प्रश्न आहे.

जुन्या बांधकामावरच केले काँक्रिटीकरण

सुरक्षाभिंत डबर कामात केलेली होती. ते काम जुने झाल्यामुळे त्याचे नूतनीकरण करण्याचे ठरले. जुन्या बांधकामाच्या क्षमतेचा विचार न करताच या भिंतीवर वजनदार काँक्रीट टाकण्यात आले. यामुळे जुन्या कामावर प्रचंड भार आला. त्याच ठिकाणी अवजड ट्रक उभा होता आणि काही क्षणातच तो न्यायालयाच्या वाहनतळाच्या दिशेने उलटला.

१९९५ बांधली सुरक्षाभिंत

एन-३, एन-४ च्या लगत न्यायालयाच्या प्रवेशद्वारापासून न्यायनगरच्या दिशेने १९९५ साली १० ते १२ फूट उंच भिंत डबर कामासह बांधण्यात आली. जमिनीपासून उंच असलेली भिंत कालांतराने कमजोर झाली. पावसाचे पाणी भिंतीच्या खालून कोर्ट पार्किंगमध्ये जायचे. तसेच सिमेंट रस्त्याचे काम झाल्यानंतर भिंतीची उंची कमी झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने नव्याने भिंतीची उंची वाढविली.

१८ लाख रुपयांतून झाले काम

न्यायालय आवारातील बंगला क्रं.२ लगत जास्तीचा खर्च झाल्यामुळे या मुख्य सुरक्षाभिंतीचे १८ लाखांतून काम करून घेण्यात आले. इमारत विभागाचे उपअभियंता भदाणे यांनी सांगितले, नवीन बांधकामासाठी प्रस्ताव देण्यात येईल. जुन्या भिंतीवरच काँक्रिटीकरणातून काम करण्यात आले होते. त्याला दोन-तीन वर्षे झाली आहेत.