शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

भूसंपादन कामाला महिनाभरात सुरुवात

By admin | Updated: July 17, 2014 00:58 IST

परळी: परळी शहरात नियोजित बायपाससाठी जमीन संपादनाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असून हे काम जलदगतीने करण्यात येणार असल्याने वाहतूक प्रश्न निकाली निघणार आहे.

परळी: परळी शहरात नियोजित बायपाससाठी जमीन संपादनाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असून हे काम जलदगतीने करण्यात येणार असल्याने वाहतूक प्रश्न निकाली निघणार आहे.आ. धनंजय मुंडे यांनी परळीकरांच्या जिव्हाळ्याचा बायपासचा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर मांडला होता. बायपासच्या कामासाठी भूसंपादनाचे काम पूर्ण करावे, अशा सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. गेल्या अनेक महिन्यापासून परळी बायपासचा प्रश्न रेंगाळत पडला होता. त्याला आता गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भूसंपादनाचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचे टेंडर काढून बायपास लवकरात लवकर तयार करण्यात येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान, बायपासचे काम सुरू झाल्यानंतर त्याला गती मिळेल, यात शंका नाही. बायपास पूर्ण झाल्यानंतर बाहेर जिल्ह्यातून येणारी मोठी वाहने शहराच्या बाहेरुनच वळविली जाणार आहेत. त्यामुळे हा प्रश्न परळीकरांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय झाला आहे. १६ सप्टेंबर २०१३ रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर सभेत परळी बायपास रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. १९ सप्टेंबर २०१३ रोजी हे काम सुरू करण्यासंदर्भात बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार भूमापन कार्यालयाने बायपास होणाऱ्या परिसरातील शेतकऱ्यांचे आक्षेप मागविले होते. ज्या- ज्या शेतकऱ्यांचे आक्षेप प्रशासनाला प्राप्त झाले आहेत त्याचे निराकरण करण्यात आले आहे. भूमापन झाल्यानंतर आता भूसंपादनाचे काम ऐरणीवर येणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर टेंडर प्रक्रिया व प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार आहे. त्यामुळे भूसंपादन कामास प्राधान्य दिल्यास हे काम एक महिन्यात पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे, परंतु यावर पुन्हा कोणी आक्षेप घेतला तर हे काम रेंगाळण्याची शक्यताही नाकारता येत नाही.शहरात वाहतूक वाढलीपरळी शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढली आहे. वाहन खरेदी करणे सोपे झाले असल्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहन खरेदी करणे सर्वसामान्यांना शक्य झाले आहे. परिणामी, वाहनांची संख्या वाढतच चालली आहे. शहरातील काही भागातील रस्ते लहान आहेत. मोठे वाहन आले तर वाहतूक कोंडी होणे हा नित्याचा विषय ठरला आहे. मोंढा परिसरात असा एकही दिवस जात नाही की, वाहन कोंडी होत नाही. त्यामुळे बायपास तयार झाला तर शहरात होणारी वाहन कोंडी समस्या निकाली तर निघलेच शिवाय लहान-मोठे अपघात टळतील. (वार्ताहर)परळी शहरात वाहनांची संख्या वाढली मोठ्या व मालवाहू वाहनांमुळे शहरात वाहनकोंडी झाली नित्याचीबायपासचे काम लवकर झाल्यास नागरिकांना मिळणार दिलासाबायपासमुळे बाहेरच्या जिल्ह्यातून येणारी वाहने बाहेरच वळणारभूसंपादनाचे काम आक्षेप न घेतल्यास लवकर पूर्ण होण्याची शक्यताबायपासच्या भूमापनाचे काम झाले पूर्ण