शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

भूसंपादन कामाला महिनाभरात सुरुवात

By admin | Updated: July 17, 2014 00:58 IST

परळी: परळी शहरात नियोजित बायपाससाठी जमीन संपादनाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असून हे काम जलदगतीने करण्यात येणार असल्याने वाहतूक प्रश्न निकाली निघणार आहे.

परळी: परळी शहरात नियोजित बायपाससाठी जमीन संपादनाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असून हे काम जलदगतीने करण्यात येणार असल्याने वाहतूक प्रश्न निकाली निघणार आहे.आ. धनंजय मुंडे यांनी परळीकरांच्या जिव्हाळ्याचा बायपासचा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर मांडला होता. बायपासच्या कामासाठी भूसंपादनाचे काम पूर्ण करावे, अशा सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. गेल्या अनेक महिन्यापासून परळी बायपासचा प्रश्न रेंगाळत पडला होता. त्याला आता गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भूसंपादनाचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचे टेंडर काढून बायपास लवकरात लवकर तयार करण्यात येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान, बायपासचे काम सुरू झाल्यानंतर त्याला गती मिळेल, यात शंका नाही. बायपास पूर्ण झाल्यानंतर बाहेर जिल्ह्यातून येणारी मोठी वाहने शहराच्या बाहेरुनच वळविली जाणार आहेत. त्यामुळे हा प्रश्न परळीकरांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय झाला आहे. १६ सप्टेंबर २०१३ रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर सभेत परळी बायपास रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. १९ सप्टेंबर २०१३ रोजी हे काम सुरू करण्यासंदर्भात बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार भूमापन कार्यालयाने बायपास होणाऱ्या परिसरातील शेतकऱ्यांचे आक्षेप मागविले होते. ज्या- ज्या शेतकऱ्यांचे आक्षेप प्रशासनाला प्राप्त झाले आहेत त्याचे निराकरण करण्यात आले आहे. भूमापन झाल्यानंतर आता भूसंपादनाचे काम ऐरणीवर येणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर टेंडर प्रक्रिया व प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार आहे. त्यामुळे भूसंपादन कामास प्राधान्य दिल्यास हे काम एक महिन्यात पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे, परंतु यावर पुन्हा कोणी आक्षेप घेतला तर हे काम रेंगाळण्याची शक्यताही नाकारता येत नाही.शहरात वाहतूक वाढलीपरळी शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढली आहे. वाहन खरेदी करणे सोपे झाले असल्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहन खरेदी करणे सर्वसामान्यांना शक्य झाले आहे. परिणामी, वाहनांची संख्या वाढतच चालली आहे. शहरातील काही भागातील रस्ते लहान आहेत. मोठे वाहन आले तर वाहतूक कोंडी होणे हा नित्याचा विषय ठरला आहे. मोंढा परिसरात असा एकही दिवस जात नाही की, वाहन कोंडी होत नाही. त्यामुळे बायपास तयार झाला तर शहरात होणारी वाहन कोंडी समस्या निकाली तर निघलेच शिवाय लहान-मोठे अपघात टळतील. (वार्ताहर)परळी शहरात वाहनांची संख्या वाढली मोठ्या व मालवाहू वाहनांमुळे शहरात वाहनकोंडी झाली नित्याचीबायपासचे काम लवकर झाल्यास नागरिकांना मिळणार दिलासाबायपासमुळे बाहेरच्या जिल्ह्यातून येणारी वाहने बाहेरच वळणारभूसंपादनाचे काम आक्षेप न घेतल्यास लवकर पूर्ण होण्याची शक्यताबायपासच्या भूमापनाचे काम झाले पूर्ण