शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

भूसंपादन कामाला महिनाभरात सुरुवात

By admin | Updated: July 17, 2014 00:58 IST

परळी: परळी शहरात नियोजित बायपाससाठी जमीन संपादनाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असून हे काम जलदगतीने करण्यात येणार असल्याने वाहतूक प्रश्न निकाली निघणार आहे.

परळी: परळी शहरात नियोजित बायपाससाठी जमीन संपादनाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असून हे काम जलदगतीने करण्यात येणार असल्याने वाहतूक प्रश्न निकाली निघणार आहे.आ. धनंजय मुंडे यांनी परळीकरांच्या जिव्हाळ्याचा बायपासचा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर मांडला होता. बायपासच्या कामासाठी भूसंपादनाचे काम पूर्ण करावे, अशा सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. गेल्या अनेक महिन्यापासून परळी बायपासचा प्रश्न रेंगाळत पडला होता. त्याला आता गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भूसंपादनाचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचे टेंडर काढून बायपास लवकरात लवकर तयार करण्यात येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान, बायपासचे काम सुरू झाल्यानंतर त्याला गती मिळेल, यात शंका नाही. बायपास पूर्ण झाल्यानंतर बाहेर जिल्ह्यातून येणारी मोठी वाहने शहराच्या बाहेरुनच वळविली जाणार आहेत. त्यामुळे हा प्रश्न परळीकरांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय झाला आहे. १६ सप्टेंबर २०१३ रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर सभेत परळी बायपास रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. १९ सप्टेंबर २०१३ रोजी हे काम सुरू करण्यासंदर्भात बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार भूमापन कार्यालयाने बायपास होणाऱ्या परिसरातील शेतकऱ्यांचे आक्षेप मागविले होते. ज्या- ज्या शेतकऱ्यांचे आक्षेप प्रशासनाला प्राप्त झाले आहेत त्याचे निराकरण करण्यात आले आहे. भूमापन झाल्यानंतर आता भूसंपादनाचे काम ऐरणीवर येणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर टेंडर प्रक्रिया व प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार आहे. त्यामुळे भूसंपादन कामास प्राधान्य दिल्यास हे काम एक महिन्यात पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे, परंतु यावर पुन्हा कोणी आक्षेप घेतला तर हे काम रेंगाळण्याची शक्यताही नाकारता येत नाही.शहरात वाहतूक वाढलीपरळी शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढली आहे. वाहन खरेदी करणे सोपे झाले असल्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहन खरेदी करणे सर्वसामान्यांना शक्य झाले आहे. परिणामी, वाहनांची संख्या वाढतच चालली आहे. शहरातील काही भागातील रस्ते लहान आहेत. मोठे वाहन आले तर वाहतूक कोंडी होणे हा नित्याचा विषय ठरला आहे. मोंढा परिसरात असा एकही दिवस जात नाही की, वाहन कोंडी होत नाही. त्यामुळे बायपास तयार झाला तर शहरात होणारी वाहन कोंडी समस्या निकाली तर निघलेच शिवाय लहान-मोठे अपघात टळतील. (वार्ताहर)परळी शहरात वाहनांची संख्या वाढली मोठ्या व मालवाहू वाहनांमुळे शहरात वाहनकोंडी झाली नित्याचीबायपासचे काम लवकर झाल्यास नागरिकांना मिळणार दिलासाबायपासमुळे बाहेरच्या जिल्ह्यातून येणारी वाहने बाहेरच वळणारभूसंपादनाचे काम आक्षेप न घेतल्यास लवकर पूर्ण होण्याची शक्यताबायपासच्या भूमापनाचे काम झाले पूर्ण