शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
3
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
4
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
5
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
6
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
7
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
8
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
9
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
10
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
11
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
12
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
13
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
14
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
15
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
16
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
17
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
18
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
19
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
20
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'

‘लालपरी’ धावली; हाल थांबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 00:52 IST

सकाळपासूनच ‘लालपरी’ रस्त्यावर धावली. त्यामुळे दिवाळीच्या सुट्टया संपवून परतीच्या दिशेने निघालेल्या प्रवाशांचे होणारे हाल थांबले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : ऐन दिवाळीत राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाºयांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारल्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले होते. चार दिवस हा संप चालल्यानंतर शनिवारी तो मागे घेण्यात आला. सकाळपासूनच ‘लालपरी’ रस्त्यावर धावली. त्यामुळे दिवाळीच्या सुट्टया संपवून परतीच्या दिशेने निघालेल्या प्रवाशांचे होणारे हाल थांबले आहेत. चार दिवस शुकशुकाट असलेल्या स्थानकांमध्ये शनिवारी सकाळपासूनच प्रवाशांची गर्दी दिसून आली.सातवा वेतन आयोग लागू करावा या प्रमुख मागण्यांसह इतर २४ मागण्यांना घेऊन ऐन दिवाळीत राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचा-यांनी राज्यव्यापी संप पुकारला होता. यामुळे जिल्ह्यातील ८ आगार आणि १८ स्थानकातून एकही बस बाहेर पडली नव्हती.दिवाळीच्या सणासाठी गावाकडे येणा-यांना मात्र याचा मोठा त्रास सहन करावा लागला. दिवाळीमध्ये आगोदरच प्रवाशांची मोठी गर्दी असते, त्यात हा संप. यामुळे प्रवाशांना नाईलाजास्तव खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागला. यामध्ये खाजगी वाहनचालकांनी प्रवाशांकडून दुप्पट, तिप्पट तिकीट वसूल करून त्यांची आर्थिक लूट केली. त्यांच्यासाठी ही ‘दिवाळी’ गोड झाली. प्रवाशांना मात्र जादा पैसे मोजावे लागल्याने त्यांचा एकप्रकारे ‘शिमगा’च झाला.दरम्यान, येताना प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला होता. परंतु आता हा संप मिटल्याने परतीच्या दिशेने जाण्यासाठी होणारा त्रास टळला आहे. यामुळे प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे.