शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
3
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
4
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
5
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
6
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
7
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
8
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
9
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
10
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
11
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
12
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
13
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
14
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
15
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
16
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
17
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
18
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
19
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
20
India vs England: जिथे कमी तिथे केएल राहुल!

बुडत्याला मिळाले जीवनदान

By admin | Updated: November 4, 2014 01:18 IST

शिंदे यांनी अजय राठोड या तरुणाचा जीव वाचविला. राठोड उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. रविवारी राठोड फिरता फिरता वरळी किना-यावर आला.

पैठण : कार्तिकी एकादशीच्या मुहूर्तावर आज परंपरेनुसार पैठण येथे मोठ्या संख्येने वारकरी व भाविकांनी संत एकनाथ महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले. भक्तांनी नाथाचरणी दुष्काळाचा सामना करण्याचे बळ दे, असे साकडे घातले. भाविक व वारकरी यांच्या उपस्थितीने नाथ मंदिर परिसर फुलून गेला होता.आषाढी व कार्तिकीला जे वारकरी पंढरपूर येथे जाऊन पांडुरंगाचे दर्शन घेऊ शकत नाहीत, असे वारकरी व भाविक अनेक वर्षांपासून पैठणची वारी करतात. गोदावरी स्नान करून नाथ समाधीचे दर्शन घेतात, अशी परंपरा चालत आली आहे. सोमवारी हजारोंच्या संख्येने वारकरी पैठणमध्ये दाखल झाले होते.रविवारी रात्रीपासून मराठवाडाभरातून विविध वाहनांनी वारकरी पैठणमध्ये दाखल होत होते. अनेक वारकरी पायी दिंडी घेऊन आले. यामुळे मंदिर व गोदावरीच्या तटावर एकच गर्दी उसळली. टाळ-मृदंगाच्या गजरासह ‘भानुदास-एकनाथ’च्या जयघोषाने पैठणनगरी दुमदुमली. रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी वारकरी, भाविक यांच्या रांगा लागलेल्या होत्या. एकादशीमुळे यात्रा भरली होती. धार्मिक वस्तू, पुस्तके, साहित्य आदींची दुकाने थाटण्यात आली होती. नाथ मंदिरात भाविकांच्या सोयीसाठी महिला व पुरुष अशा स्वतंत्र रांगा करण्यात आल्या होत्या. दिवसभरात लाखभर भाविकांनी दर्शन घेतले, असे नाथ संस्थानचे कार्यकारी विश्वस्त नंदलाल लाहोटी यांनी सांगितले.नाथ समाधीचे दर्शन घेऊन वारकरी दिंड्या शहरातील विविध मठांत, मंदिरांत विसावल्या. तेथे रात्रभर त्यांनी कीर्तन, प्रवचन, भजन करीत पांडुरंगाची भक्ती केली. यामुळे शहरभर मंदिर व मठातून हरिकीर्तनाचे स्वर निनादत होते. खरीप व रबी दोन्ही हंगामाने यंदा शेतकऱ्यांना दगा दिल्याने विवंचनेत सापडलेल्या बळीराजाने नाथ समाधीचे दर्शन घेतले व परिस्थितीचा मुकाबला करण्याचे बळ दे, असे साकडे नाथांच्या माध्यमातून पांडुरंगाला घातले.शेंदुरवाद्यातही घेतले दर्शनलिंबेजळगाव : कार्तिक एकादशी (प्रबोधिनी) निमित्त सोमवारी तुर्काबाद खराडी, शेंदुरवादा (ता. गंगापूर) येथील विठ्ठल मंदिरात भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या.पहाटे साडेचारला मूर्तीस पंचामृतासह शास्त्रोक्त पद्धतीने अभिषेक करून दर्शनासाठी भाविकांना मंदिर खुले करण्यात आले. दुपारी बारा वाजता महाआरती करण्यात आली. औरंगाबाद-नगर मार्गावर असलेल्या छोट्या पंढरपूरलाही असंख्य दिंड्या रवाना झाल्या. विठ्ठलाचा गजर करीत दर्शनाची ओढ लागलेले भाविक जयहरी विठ्ठल म्हणत मार्गस्थ होताना दिवसभर दिसून आले. स्वयंभू विठ्ठल मंदिरात कार्तिक महोत्सव सुरू असून भरगच्च कार्यक्रम होत आहेत.कार्तिकी एकादशीनिमित्त आज शहरात लाखो वारकरी व भाविकांची उपस्थिती असताना महावितरणने भारनियमन करून वारकऱ्यांना मोठा झटका दिला. विविध मंदिरात व मठात थांबलेल्या वारकऱ्यांना यामुळे असुविधेचा सामना करावा लागला.४एकादशीनिमित्त भारनियमन करण्यात आल्याने भाविकांतून संताप व्यक्त करण्यात येत असून, यापुढे दर एकादशीला भारनियमन करू नये, अशी मागणी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे व शहरप्रमुख प्रकाश वानोळे यांनी निवेदनातून महावितरणचे सहायक अभियंता नीलेश नागरे यांच्याकडे केली आहे.