शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

‘पॉलिटीकल मॅच्युरिटी’चा अभाव

By admin | Updated: May 8, 2015 00:28 IST

शिरीष शिंदे , बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे आर्थीक व्यवहार घोटाळ्यामुळे गेल्या तीन वर्षापासून ठप्प आहेत.

शिरीष शिंदे , बीडजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे आर्थीक व्यवहार घोटाळ्यामुळे गेल्या तीन वर्षापासून ठप्प आहेत. सभासद व शेतकऱ्यांचा विश्वास जिंकण्यासाठी राजकीय पक्षांनी एकत्र येऊन बँकचे निवडणूक बिनविरोध काढायला हवी होती मात्र काही नेत्यांनी आपली विरोधाची भुमिका कायम ठेवली. एकंदरीत ‘पॉलेटीकल मॅच्युरीटी’चा आभाव निर्माण झाल्याने निवडणूक घेण्याची नामुष्की ओढावली गेली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ताब्यात असताना माजी संचालक मंडळ व इतर संस्थांनी बनावट कर्ज घेतले. कोट्यावधीचे कर्ज न फेडले गेल्याने बँक डबघाईस आली. या घोटाळ्यापासून चार हात लांब रहावे यासाठी तत्कालीन संचालक मंडळाने राजीनामा दिला व त्यानंतर भाजपा व राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये आरोप प्रत्यारोप करण्यात आले. त्यातून गुन्हे दाखल करण्याचे राजकारणही झाले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही मुळात शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखली जाते. या बँकेतून शेतकऱ्यांना पीक कर्ज व इतर शेती संबंधीत कर्ज मिळतात. बँक बुडल्याने अनेक गरजवंत शेतकऱ्यांना इतर बँकेच उंबरठे झिजविण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सर्व पक्षांनी डीसीसी निवडणूक बिनविरोध काढून बँक वाचविण्याचा प्रयत्न करण्याची भुमिका पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यासह इतर नेत्यांवर होती मात्र तसे न करता केवळ आ. जयदत्त क्षीरसागर व माजी आ. धस यांना हाताशी धरत महायुती करण्यात आली व तडजोड करुन पाच उमेदवार बिनविरोध कढण्यात आले. पालक मंत्र्यांनी पालकत्व सिद्ध करण्याची संधी सोडली असल्याने राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. मुख्यमंत्री, सहकार मंत्र्यांनी घेतला रससदरील निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सहकार मंत्री शिंदे यांनी या निवडणुकीत रस घेतला होता. प्रारुप मतदार यादीनुसार निवडणूक पार पडली असती तर ही निवडणूक भाजपाला जड गेली असती.अंबाजोगाईतील एक जागा विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांना हवी होती. माजलगावची जागा माजी मंत्री सोळंके यांना पाहिजे होती तर आ. अमरसिंह पंडित यांना गेवराईच्या दोन जागा हव्या होत्या. शेवटी निवडणूक होऊनही आ. पंडित यांनी दोन जागा मिळविल्या तर सोळंके यांनी एक जागा मिळवली. विरोधी पक्ष नेत्यांना आपले वर्चस्व दाखविता आले नाही. या सर्वांचा आढावा घेतला तर निवडणूक बिनविरोध होण्यास काही हरकत नव्हती असे समजून येते. मात्र राजकीय सुड बुद्धी म्हणा की इतर काही म्हणा यातून काही राष्ट्रवादी काँगे्रसच्या नेत्यांना हाताशी धरुन काही लोकांना डावलले. भाजपाचे वारे असतानाही राष्ट्रवादीच्या एका गटाने आपले अस्तित्व सिद्ध केले. या निवडणूकी गेवराई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब नाटकर व अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दत्ता पाटील हे निवडणुकीचे आर्कषण राहिले.