शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
2
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
3
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
4
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
5
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
6
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
7
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
8
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
9
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
10
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
11
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
12
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
13
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
14
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
15
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
16
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
17
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
18
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
19
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
20
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर

‘पॉलिटीकल मॅच्युरिटी’चा अभाव

By admin | Updated: May 8, 2015 00:28 IST

शिरीष शिंदे , बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे आर्थीक व्यवहार घोटाळ्यामुळे गेल्या तीन वर्षापासून ठप्प आहेत.

शिरीष शिंदे , बीडजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे आर्थीक व्यवहार घोटाळ्यामुळे गेल्या तीन वर्षापासून ठप्प आहेत. सभासद व शेतकऱ्यांचा विश्वास जिंकण्यासाठी राजकीय पक्षांनी एकत्र येऊन बँकचे निवडणूक बिनविरोध काढायला हवी होती मात्र काही नेत्यांनी आपली विरोधाची भुमिका कायम ठेवली. एकंदरीत ‘पॉलेटीकल मॅच्युरीटी’चा आभाव निर्माण झाल्याने निवडणूक घेण्याची नामुष्की ओढावली गेली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ताब्यात असताना माजी संचालक मंडळ व इतर संस्थांनी बनावट कर्ज घेतले. कोट्यावधीचे कर्ज न फेडले गेल्याने बँक डबघाईस आली. या घोटाळ्यापासून चार हात लांब रहावे यासाठी तत्कालीन संचालक मंडळाने राजीनामा दिला व त्यानंतर भाजपा व राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये आरोप प्रत्यारोप करण्यात आले. त्यातून गुन्हे दाखल करण्याचे राजकारणही झाले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही मुळात शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखली जाते. या बँकेतून शेतकऱ्यांना पीक कर्ज व इतर शेती संबंधीत कर्ज मिळतात. बँक बुडल्याने अनेक गरजवंत शेतकऱ्यांना इतर बँकेच उंबरठे झिजविण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सर्व पक्षांनी डीसीसी निवडणूक बिनविरोध काढून बँक वाचविण्याचा प्रयत्न करण्याची भुमिका पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यासह इतर नेत्यांवर होती मात्र तसे न करता केवळ आ. जयदत्त क्षीरसागर व माजी आ. धस यांना हाताशी धरत महायुती करण्यात आली व तडजोड करुन पाच उमेदवार बिनविरोध कढण्यात आले. पालक मंत्र्यांनी पालकत्व सिद्ध करण्याची संधी सोडली असल्याने राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. मुख्यमंत्री, सहकार मंत्र्यांनी घेतला रससदरील निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सहकार मंत्री शिंदे यांनी या निवडणुकीत रस घेतला होता. प्रारुप मतदार यादीनुसार निवडणूक पार पडली असती तर ही निवडणूक भाजपाला जड गेली असती.अंबाजोगाईतील एक जागा विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांना हवी होती. माजलगावची जागा माजी मंत्री सोळंके यांना पाहिजे होती तर आ. अमरसिंह पंडित यांना गेवराईच्या दोन जागा हव्या होत्या. शेवटी निवडणूक होऊनही आ. पंडित यांनी दोन जागा मिळविल्या तर सोळंके यांनी एक जागा मिळवली. विरोधी पक्ष नेत्यांना आपले वर्चस्व दाखविता आले नाही. या सर्वांचा आढावा घेतला तर निवडणूक बिनविरोध होण्यास काही हरकत नव्हती असे समजून येते. मात्र राजकीय सुड बुद्धी म्हणा की इतर काही म्हणा यातून काही राष्ट्रवादी काँगे्रसच्या नेत्यांना हाताशी धरुन काही लोकांना डावलले. भाजपाचे वारे असतानाही राष्ट्रवादीच्या एका गटाने आपले अस्तित्व सिद्ध केले. या निवडणूकी गेवराई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब नाटकर व अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दत्ता पाटील हे निवडणुकीचे आर्कषण राहिले.