शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

रक्ताचा तुटवडा

By admin | Updated: May 22, 2016 00:07 IST

बीड : येथील जिल्हा रुग्णालयातील ब्लड बँकेत रक्ताचा तुटवडा जाणवू लागला आहे. दिवसाकाठी ५० ते ६० रक्तपिशव्यांची गरज भासते; मात्र त्या तुलनेत रक्तदात्यांची संख्या कमी झाल्याने रक्ताचा तुटवडा जाणवतो.

बीड : येथील जिल्हा रुग्णालयातील ब्लड बँकेत रक्ताचा तुटवडा जाणवू लागला आहे. दिवसाकाठी ५० ते ६० रक्तपिशव्यांची गरज भासते; मात्र त्या तुलनेत रक्तदात्यांची संख्या कमी झाल्याने रक्ताचा तुटवडा जाणवतो.यंदा दुष्काळाची तीव्रता अधिक आहे. परिणामी रक्तदान शिबिरे कमी प्रमाणात घेतली जात असल्याने जिल्हा रुग्णालयाकडे रक्तपिशव्या कमी येतात. सव्वातीनशे खाटांच्या रुग्णालयात ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात रुग्ण येतात. त्यांना रक्ताची गरज भासल्यास पुरवठा करण्यासाठी विलंब लागतो. अनेक वेळा रुग्णांना खाजगी ब्लड बँकेचा सहारा घ्यावा लागतो. दरवर्षी मार्चनंतर जिल्हा रुग्णालयात रक्त्याच्या पिशव्यांची कमतरता भासते. मात्र, यावेळी रुग्णालय प्रशासनाने योग्य नियोजन, विविध शिबिरांच्या माध्यमातून रक्त संकलनाचे काम केले होते. त्यामुळे मे महिन्याच्या अर्ध्यापर्यंत तुटवडा भासला नाही. मात्र, मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यात रकतदान शिबिरांचे प्रमाण कमी झाल्याने जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीत रक्त संकलन कमी झाले. रुग्णांचे नातेवाईक रक्ताची पिशवी घेण्यासाठी रक्तपेढीत जातात तेव्हा उपलब्धता नसल्याने रुग्णांचा जीव टांगणीला लागत आहे.दुष्काळी परिस्थितीमुळे गोरगरीब रुग्ण जिल्हा रुग्णालयात येतात. यामध्ये प्रसुतीनंतर सिझर झालेल्या महिला रुग्णांसाठी रक्ताची आवश्यकता भासते. मात्र, रक्ताचा तुटवडा असल्याने रुग्णांना खासगी रक्तपेढीचाही आधार घ्यावा लागतो. जिल्हा रुग्णालयातून इतर तालुक्यांमध्येही रक्तपुरवठा केला जातो. नागरिकांनी जिल्हा रुग्णालयात येऊन रक्तदान करण्याचे आवाहनही रुग्णालय प्रशासनाने केले आहे. (प्रतिनिधी)दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्हा रुग्णालयात रुग्ण संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत रक्ताची अत्यंत आवश्यकता भासत आहे. शिबिरांचे प्रमाण कमी झाले असून, रक्त संकलनात घट झाली आहे. सामाजिक संघटनांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करून रक्त संकलनात सहकार्य करावे.- डॉ. नागेश चव्हाण, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक