शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
6
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
7
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
8
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
9
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
10
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
11
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
12
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
13
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
14
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
15
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
16
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
17
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
18
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
19
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
20
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?

लेबर कॉलनीतील क्वॉर्टर्स करणार भुईसपाट...

By admin | Updated: May 20, 2016 00:36 IST

औरंगाबाद : मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरामध्ये मंत्रालयाच्या धर्तीवर विभागीय प्रशासकीय संकुल उभारण्याच्या प्राथमिक हालचाली सुरू झाल्या आहेत.

औरंगाबाद : मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरामध्ये मंत्रालयाच्या धर्तीवर विभागीय प्रशासकीय संकुल उभारण्याच्या प्राथमिक हालचाली सुरू झाल्या आहेत. येत्या काही महिन्यांत इमारतीचा आराखडा, अंदाजपत्रक आणि पर्यायी जागेप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाची निश्चिती झाली आहे. त्यासाठी लेबर कॉलनीतील २५० क्वॉर्टर्स असलेल्या जागेवरील शासकीय क्वॉर्टर्स भुईसपाट करण्यात येणार आहेत. बांधकाम विभागाने क्वॉर्टर्समधील गाळेधारकांना १५ दिवसांत इमारत खाली करण्यासाठी नोटिसा दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. १९६१ मध्ये हे क्वॉर्टर बांधले असून, तेथे सर्व शासकीय कर्मचाऱ्यांची निवासस्थाने आहेत. तेथील अनेकांनी क्वॉर्टरचा ताबा वेगवेगळ्या माध्यमातून स्वत:कडे ठेवला आहे. शासकीय जागा असल्यामुळे ती खाली करून घेण्याची तयारी विभागीय पातळीवर सुरू करण्यात आली आहे. शासनाच्या मालकीचे उर्वरित क्वॉर्टरदेखील खाली करण्यात येणार आहेत. त्यासाठी सर्व्हे सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. मार्च महिन्यात त्या संकुलाच्या संभाव्य आराखड्यावर विभागीय आयुक्त डॉ.उमाकांत दांगट यांच्या उपस्थितीत चर्चा झाली. जागतिक बँक प्रकल्पांतर्गत हे संकुल बांधण्यात येणार आहे. बांधकाम विभागाकडे त्यासाठी जबाबदारी देण्यात आली असून, महसूल विभागाच्या मदतीने क्वॉर्टर पाडले जाणार आहेत. भूमी अभिलेख, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तालय वगळता उर्वरित ४५ प्रशासकीय कार्यालये भाड्याच्या इमारतींमध्ये आहेत. त्या इमारती कार्यालयासाठी पोषक नाहीत; परंतु एकत्रित इमारत नसल्यामुळे पर्याय म्हणून ही कार्यालये भाड्याच्या इमारतीत सुरू आहेत. मराठवाड्यात कॅबिनेटमंत्री, सचिव दर्जाचे अधिकारी, आयुक्त, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पर्यटक येण्याचे प्रमाण वाढले आहे. मंत्रिमंडळ बैठक यंदा झाली नसली तरी २००९ पर्यंत ती सातत्याने होत गेली आहे. त्यामुळे विभागीय प्रशासकीय संकुलात मंत्रालयीन दर्जाचे बैठक सभागृह, सुसज्ज प्रशासकीय दालने, सर्व कार्यालयांचे एकत्रीकरण करण्यासाठी संकुल उभारण्यात येणार आहे. १२ एकर जागा; ५० कोटींचा खर्चया प्रशासकीय संकुलासाठी १२ एकर जागा लागणार आहे. ५० कोटींच्या आसपासचा खर्च या संकुलावर होण्याची शक्यता आहे. लेबर कॉलनीतील शासकीय जागेवर हे संकुल बांधण्यात येणार असून, अंदाजपत्रकासाठी शासनाकडून मंजुरी घेण्यात येणार आहे. ३ वर्षांपर्यंतचा कालावधी हे संकुल बांधण्यासाठी लागेल. त्यासाठी तीन टप्पे करण्यात येतील. महत्त्वाकांक्षी आणि औरंगाबाद शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारे हे भव्य संकुल असावे. यासाठी सुनियोजित आराखडा तयार करण्यात आला आहे.