शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

कोमेजू लागले हिरवे स्वप्न!

By admin | Updated: June 24, 2017 00:24 IST

जालना : पावसाने दहा दिवसांपासून दडी मारल्याने कपाशीच्या झाडांनी आता माना टाकायला सुरुवात केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात यंदा जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाने हजेरी लावल्यानंतर शेतकऱ्यांनी महागडे बी-बियाणे खरेदीकरून उत्साहाने पेरणीची कामे सुरू केली. जमिनीत ओलावा असल्याने पिकांची उगवणही चांगली झाली. परंतु पावसाने दहा दिवसांपासून दडी मारल्याने कपाशीच्या झाडांनी आता माना टाकायला सुरुवात केली आहे. दमदार पावसाअभावी शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न कोमेजू लागले आहे. जिल्ह्यात यंदा सरासरी सहा लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी नियोजन आहे. सुरुवातीला भोकरदन, बदनापूर, जालना तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी कपाशी व मका लागवड केली. कापसाची ४३, तर मका पिकाची २३ टक्के लावगड झाली आहे. बहुतांश भागात मूग, उडीद, सोयाबीन पेरणीही पूर्ण करण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ७५ हजार हेक्टरवर खरिपाची ३० टक्के पेरणी पूर्ण झाल्याची नोंद कृषी विभागाकडे आहे. मात्र, गत दहा दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे ठिबक सिंचनवर कपाशी लागवड केलेले शेतक री थेंब, थेंब पाण्याचा काटकसरीने वापर करताना दिसत आहेत. तर ठिबकची सुविधा नसलेले जालना, भोकरदन, बदनापूर तालुक्यातील बहुतांश शेतकरी कपाशी पिकाला हाताने पाणी घालून जगविण्याचा प्रयत्न करत आहेत. सकाळचे ऊन आणि दुपारचे ढगाळ वातावरण पाहून आज पाऊस पडलेच, या आशेवर असलेले शेतकरी आता पेरणी वाया जाण्याच्या शक्यतेने चिंतातुर झाले आहेत. पाऊस लांबल्याने जिल्ह्यात अद्याप ७० टक्के क्षेत्रावर अद्याप पेरणी झालेली नसल्याने मूग, उडिदाचे क्षेत्र घटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.