शहरं
Join us  
Trending Stories
1
तिकडे पाकिस्तान करतोय बॉम्बिंग, इकडे भारतानं अफगाणिस्तानला पाठवली मोठी मदद; तालिबान सरकार खुश
2
मनमोहनसिंग सरकारमधील कोळसामंत्री श्रीप्रकाश जायसवाल यांचे निधन, कानपूरमधून तीन वेळा झाले होते खासदार
3
डीके शिवकुमार यांच्या आमदारांशी गाठीभेटी; उद्या सकाळी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांसोबत ब्रेकफास्ट करणार...
4
११ जहाल नलक्षवाद्यांचे गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण; हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षल चळवळीला हादरा
5
कांदा निर्यात धडाम...! केंद्राचे धोरण आड आले;  बांगलादेश, सौदी अरब सारख्या देशांनी फिरवली पाठ
6
अविस्मरणीय अन् ऐतिहासिक! PM मोदींच्या हस्ते गोव्यात ७७ फूट उंच 'श्रीराम मूर्ती'चे अनावरण
7
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
8
५ राजयोगात १४१ दिवसांनी शनि मार्गी: ९ राशींचे कल्याण, सुख-समृद्धीचे वरदान; सौभाग्य-यश-लाभ!
9
“काँग्रेसमध्ये काही राहिले नाही, वडेट्टीवारांनी खांद्याला धनुष्यबाण लावावा”; कुणी दिली ऑफर?
10
Ayush Mhatre Century : षटकार-चौकारांची 'बरसात'; आयुष म्हात्रेचा २०० च्या स्ट्राइक रेटसह शतकी धमका!
11
भारताची क्षेपणास्त्र चाचणीची घोषणा, हिंदी महासागरात चौथे चिनी 'हेरगिरी जहाज' दाखल
12
SMAT 2025: अर्जुन तेंडुलकरची हवा! पहिल्या स्पेलमध्ये ५ धावांत २ विकेट्स घेत लुटली मैफील
13
सर्वांनी वयाच्या 30 व्या वर्षापूर्वीच जाणून घ्यायला हवं हे 'सीक्रेट'! असं करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग; तयार होईल मोठा निधी, आनंदात जगाल म्हातारपणी
14
गौतम गंभीरवर बीसीसीआय नाराज, कसोटी हरल्यानंतर जे बोलला, ते खटकले... 
15
Thailand Flood : हाहाकार! थायलंडमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस; १४५ जणांचा मृत्यू, ३६ लाख लोकांना फटका
16
धक्कादायक! अनियंत्रित कार तलावात कोसळली, चालक बेशुद्ध पडला, नाविक देवदूत बनून आला
17
नेपाळने भारताला डिवचले; 100 रुपयांच्या नवीन नोटेवर भारताचा भूभाग आपला दाखवला
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ २ दिवसांत सुटली; लग्नानंतर नवरदेवाचा बाथरुममध्ये संशयास्पद मृत्यू
19
चीनच्या शेजारी देशाने प्रचंड सोने घेतले; एवढे महाग असले तरी..., जगातील सर्वात मोठा खरेदीदार ठरला
20
भारताच्या अर्थव्यवस्थेची ताकद वाढली, दुसऱ्या तिमाहीत देशाचा जीडीपी ८.२% वाढला
Daily Top 2Weekly Top 5

कोमेजू लागले हिरवे स्वप्न!

By admin | Updated: June 24, 2017 00:24 IST

जालना : पावसाने दहा दिवसांपासून दडी मारल्याने कपाशीच्या झाडांनी आता माना टाकायला सुरुवात केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात यंदा जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाने हजेरी लावल्यानंतर शेतकऱ्यांनी महागडे बी-बियाणे खरेदीकरून उत्साहाने पेरणीची कामे सुरू केली. जमिनीत ओलावा असल्याने पिकांची उगवणही चांगली झाली. परंतु पावसाने दहा दिवसांपासून दडी मारल्याने कपाशीच्या झाडांनी आता माना टाकायला सुरुवात केली आहे. दमदार पावसाअभावी शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न कोमेजू लागले आहे. जिल्ह्यात यंदा सरासरी सहा लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी नियोजन आहे. सुरुवातीला भोकरदन, बदनापूर, जालना तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी कपाशी व मका लागवड केली. कापसाची ४३, तर मका पिकाची २३ टक्के लावगड झाली आहे. बहुतांश भागात मूग, उडीद, सोयाबीन पेरणीही पूर्ण करण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ७५ हजार हेक्टरवर खरिपाची ३० टक्के पेरणी पूर्ण झाल्याची नोंद कृषी विभागाकडे आहे. मात्र, गत दहा दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे ठिबक सिंचनवर कपाशी लागवड केलेले शेतक री थेंब, थेंब पाण्याचा काटकसरीने वापर करताना दिसत आहेत. तर ठिबकची सुविधा नसलेले जालना, भोकरदन, बदनापूर तालुक्यातील बहुतांश शेतकरी कपाशी पिकाला हाताने पाणी घालून जगविण्याचा प्रयत्न करत आहेत. सकाळचे ऊन आणि दुपारचे ढगाळ वातावरण पाहून आज पाऊस पडलेच, या आशेवर असलेले शेतकरी आता पेरणी वाया जाण्याच्या शक्यतेने चिंतातुर झाले आहेत. पाऊस लांबल्याने जिल्ह्यात अद्याप ७० टक्के क्षेत्रावर अद्याप पेरणी झालेली नसल्याने मूग, उडिदाचे क्षेत्र घटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.