शहरं
Join us  
Trending Stories
1
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 
2
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
3
फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल? 
4
कंगाल पाकिस्तानबद्दल काय म्हणावं? पाकिस्तानची सरकारी एअरलाईन्स खरेदी करण्यासाठी आले सीमेंटवाले
5
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
6
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
7
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
8
हातात हात अन् प्रेग्नंट पत्नीला साथ! शूराची काळजी घेताना दिसला अरबाज खान, व्हिडीओ व्हायरल
9
समलैंगिक संबंध, ब्लॅकमेलिंग अन् शेवट...; मुंबईतील ३ घटना, ३ मृत्यू, नेमकं काय घडले?
10
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
11
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
12
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
13
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
14
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे
15
पंढरीचे ‘एआय’ वारकरी! AI ने केली २७ लाख लोकांची गर्दी मोजण्याची किमया
16
निवडणूक आयोग जनतेला मूर्ख समजतो की काय?; रोखठोक प्रश्न विचारणं आवश्यक बनलंय
17
महासंचालकांचे परिपत्रक सर्व पोलिसांवर बंधनकारक नाही का?; अपूर्ण केस डायरीवरून उच्च न्यायालय संतापले
18
मृत घोषित केलेले बाळ अंत्यसंस्कारावेळी रडले; अंबाजोगाईच्या रुग्णालयात धक्कादायक प्रकार
19
‘आई’ व्हा! शाळकरी मुलींनाही 'या' देशानं दिलं आमिष; मुलं जन्माला घातली तर मिळणार १ लाख
20
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...

कोमेजू लागले हिरवे स्वप्न!

By admin | Updated: June 24, 2017 00:24 IST

जालना : पावसाने दहा दिवसांपासून दडी मारल्याने कपाशीच्या झाडांनी आता माना टाकायला सुरुवात केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात यंदा जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाने हजेरी लावल्यानंतर शेतकऱ्यांनी महागडे बी-बियाणे खरेदीकरून उत्साहाने पेरणीची कामे सुरू केली. जमिनीत ओलावा असल्याने पिकांची उगवणही चांगली झाली. परंतु पावसाने दहा दिवसांपासून दडी मारल्याने कपाशीच्या झाडांनी आता माना टाकायला सुरुवात केली आहे. दमदार पावसाअभावी शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न कोमेजू लागले आहे. जिल्ह्यात यंदा सरासरी सहा लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी नियोजन आहे. सुरुवातीला भोकरदन, बदनापूर, जालना तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी कपाशी व मका लागवड केली. कापसाची ४३, तर मका पिकाची २३ टक्के लावगड झाली आहे. बहुतांश भागात मूग, उडीद, सोयाबीन पेरणीही पूर्ण करण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ७५ हजार हेक्टरवर खरिपाची ३० टक्के पेरणी पूर्ण झाल्याची नोंद कृषी विभागाकडे आहे. मात्र, गत दहा दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे ठिबक सिंचनवर कपाशी लागवड केलेले शेतक री थेंब, थेंब पाण्याचा काटकसरीने वापर करताना दिसत आहेत. तर ठिबकची सुविधा नसलेले जालना, भोकरदन, बदनापूर तालुक्यातील बहुतांश शेतकरी कपाशी पिकाला हाताने पाणी घालून जगविण्याचा प्रयत्न करत आहेत. सकाळचे ऊन आणि दुपारचे ढगाळ वातावरण पाहून आज पाऊस पडलेच, या आशेवर असलेले शेतकरी आता पेरणी वाया जाण्याच्या शक्यतेने चिंतातुर झाले आहेत. पाऊस लांबल्याने जिल्ह्यात अद्याप ७० टक्के क्षेत्रावर अद्याप पेरणी झालेली नसल्याने मूग, उडिदाचे क्षेत्र घटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.