शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
2
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
3
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
4
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
5
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
6
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
7
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
8
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
9
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?
10
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
11
प्रेक्षकांची प्रतीक्षा आज संपणार; काही तासात सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो येणार; पाहा झलक
12
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
13
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
14
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
15
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
16
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
17
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  
18
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
19
युद्धबंदीच्या बातमीनंतर सेन्सेक्स-निफ्टी वधारले, पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
20
लग्नानंतर दरमहा १०,००० फिक्स! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त एकदाच करा गुंतवणूक!

ई-लिलावासाठी कृउबाला आदेश

By admin | Updated: July 16, 2017 00:35 IST

औरंगाबाद : राज्यातील पहिल्या टप्प्यातील ३० बाजार समित्यांना १५ आॅगस्टपूर्वी शेतीमालाची आॅनलाइन लिलाव पद्धत सुरूकरण्याचे आदेश कृषी व पणनचे प्रधान सचिव विजयकुमार यांनी दिले

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : राज्यातील पहिल्या टप्प्यातील ३० बाजार समित्यांना १५ आॅगस्टपूर्वी शेतीमालाची आॅनलाइन लिलाव पद्धत सुरूकरण्याचे आदेश कृषी व पणनचे प्रधान सचिव विजयकुमार यांनी दिले आहेत. यादृष्टीने जाधववाडीतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येत्या २९ दिवसांत शेतीमालाच्या हर्राशीची पारंपरिक पद्धत बंद होऊन आॅनलाइन लिलाव पद्धत अस्तित्वात येणार आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालास योग्य भाव मिळावा, बाजार समितीच्या कारभारात, लिलाव प्रक्रियेत पारदर्शकता निर्माण व्हावी, शेतकऱ्यांची आर्थिक लूट थांबविण्यात यावी. यासाठी केंद्र सरकारने ‘इलेक्ट्रॉनिक नॅशनल अ‍ॅग्रिकल्चरल मार्केट’ (ई-नाम) पोर्टल सुरू केले आहे. याद्वारे देशभरातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या आॅनलाइन एकमेकांना जोडल्या जाणार आहेत. यामुळे औरंगाबादेतील जाधववाडीत आलेला शेतीमाल परजिल्ह्यातील कृउबामधील खरेदीदार खरेदी करू शकतील. खरेदीदारांमध्ये स्पर्धा वाढल्याने शेतीमालास चांगला भाव मिळेल. राज्यात पहिल्या टप्प्यात ३० बाजार समित्यांमध्ये ‘ई-नाम’ सुरूकरण्यात येणार आहे. यासंदर्भात शुक्रवारी कृषी व पणनचे प्रधान सचिव विजयकुमार यांनी पुणे येथे राज्यातील कृउबाच्या सचिवांची बैठक घेतली. पहिल्या टप्प्यातील सर्व बाजार समित्यांना येत्या १५ आॅगस्टच्या अगोदर आॅनलाइन लिलाव सुरूकरण्याचे आदेश देण्यात आले. यामुळे बाजार समित्यांचे कर्मचारी कामाला लागले आहेत. केंद्र शासनाने जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १३ कॉम्प्युटर, १३ यूपीएस, ४ लेझर प्रिंटर, १ एलईडी, २ वेबकॅमेरे, २ टॅब्लेट आदी साहित्य दिले आहे. बाजार समितीने लीज लाइनसाठी बीएसएनएलकडे रक्कम भरली असून, येत्या ८ दिवसांत लीज लाइन टाकण्यात येणार आहे. धान्याच्या अडत बाजारातील ४ सेल हॉलमध्ये ई-लिलावासाठी संगणक व अन्य यंत्रणा बसविण्यात येणार आहे. यासाठी सेलहॉलमध्ये छोटी केबिन तयार करण्यात येईल. येत्या बुधवारी १९ जुलै रोजी ई-लिलावाचे प्रात्यक्षिक घेतले जाईल, अशी माहिती सचिव विजय शिरसाठ यांनी दिली. १५ आॅगस्टआधीच ई-लिलाव सुरूकरण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. सॉफ्टवेअर कंपनीने बाजार समितीमध्ये एका मंडी अ‍ॅनलिस्टची नेमणूक केली आहे. ई-लिलावासाठी ५८ पैकी ४६ अडत्यांना व ८१ खरेदीदारांना कंपनीतर्फे प्रशिक्षण देण्यात आले आहे. बाजार समितीच्या चार कर्मचाऱ्यांनाही प्रशिक्षण दिले जात आहे.