शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
6
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
7
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
8
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
9
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
10
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
11
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
12
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
13
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
14
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
15
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
16
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
17
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
18
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
19
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
20
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...

ई-लिलावासाठी कृउबाला आदेश

By admin | Updated: July 16, 2017 00:35 IST

औरंगाबाद : राज्यातील पहिल्या टप्प्यातील ३० बाजार समित्यांना १५ आॅगस्टपूर्वी शेतीमालाची आॅनलाइन लिलाव पद्धत सुरूकरण्याचे आदेश कृषी व पणनचे प्रधान सचिव विजयकुमार यांनी दिले

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : राज्यातील पहिल्या टप्प्यातील ३० बाजार समित्यांना १५ आॅगस्टपूर्वी शेतीमालाची आॅनलाइन लिलाव पद्धत सुरूकरण्याचे आदेश कृषी व पणनचे प्रधान सचिव विजयकुमार यांनी दिले आहेत. यादृष्टीने जाधववाडीतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येत्या २९ दिवसांत शेतीमालाच्या हर्राशीची पारंपरिक पद्धत बंद होऊन आॅनलाइन लिलाव पद्धत अस्तित्वात येणार आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालास योग्य भाव मिळावा, बाजार समितीच्या कारभारात, लिलाव प्रक्रियेत पारदर्शकता निर्माण व्हावी, शेतकऱ्यांची आर्थिक लूट थांबविण्यात यावी. यासाठी केंद्र सरकारने ‘इलेक्ट्रॉनिक नॅशनल अ‍ॅग्रिकल्चरल मार्केट’ (ई-नाम) पोर्टल सुरू केले आहे. याद्वारे देशभरातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या आॅनलाइन एकमेकांना जोडल्या जाणार आहेत. यामुळे औरंगाबादेतील जाधववाडीत आलेला शेतीमाल परजिल्ह्यातील कृउबामधील खरेदीदार खरेदी करू शकतील. खरेदीदारांमध्ये स्पर्धा वाढल्याने शेतीमालास चांगला भाव मिळेल. राज्यात पहिल्या टप्प्यात ३० बाजार समित्यांमध्ये ‘ई-नाम’ सुरूकरण्यात येणार आहे. यासंदर्भात शुक्रवारी कृषी व पणनचे प्रधान सचिव विजयकुमार यांनी पुणे येथे राज्यातील कृउबाच्या सचिवांची बैठक घेतली. पहिल्या टप्प्यातील सर्व बाजार समित्यांना येत्या १५ आॅगस्टच्या अगोदर आॅनलाइन लिलाव सुरूकरण्याचे आदेश देण्यात आले. यामुळे बाजार समित्यांचे कर्मचारी कामाला लागले आहेत. केंद्र शासनाने जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १३ कॉम्प्युटर, १३ यूपीएस, ४ लेझर प्रिंटर, १ एलईडी, २ वेबकॅमेरे, २ टॅब्लेट आदी साहित्य दिले आहे. बाजार समितीने लीज लाइनसाठी बीएसएनएलकडे रक्कम भरली असून, येत्या ८ दिवसांत लीज लाइन टाकण्यात येणार आहे. धान्याच्या अडत बाजारातील ४ सेल हॉलमध्ये ई-लिलावासाठी संगणक व अन्य यंत्रणा बसविण्यात येणार आहे. यासाठी सेलहॉलमध्ये छोटी केबिन तयार करण्यात येईल. येत्या बुधवारी १९ जुलै रोजी ई-लिलावाचे प्रात्यक्षिक घेतले जाईल, अशी माहिती सचिव विजय शिरसाठ यांनी दिली. १५ आॅगस्टआधीच ई-लिलाव सुरूकरण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. सॉफ्टवेअर कंपनीने बाजार समितीमध्ये एका मंडी अ‍ॅनलिस्टची नेमणूक केली आहे. ई-लिलावासाठी ५८ पैकी ४६ अडत्यांना व ८१ खरेदीदारांना कंपनीतर्फे प्रशिक्षण देण्यात आले आहे. बाजार समितीच्या चार कर्मचाऱ्यांनाही प्रशिक्षण दिले जात आहे.