शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
2
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
3
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
4
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
5
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
6
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
7
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
8
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
9
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
10
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
11
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
12
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
13
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
14
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
15
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
16
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
17
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
18
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
19
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
20
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी

संतांमुळेच ज्ञानाची दालने खुली

By admin | Updated: July 28, 2014 00:55 IST

लातूर : प्रस्थापित समाजव्यवस्थेने बहुजनांसाठी ज्ञानाची दारे बंद केली होती. प्रस्थापितांनीच ज्ञानसंग्रह करून इतरांना त्यापासून वंचित ठेवले होते.

लातूर : प्रस्थापित समाजव्यवस्थेने बहुजनांसाठी ज्ञानाची दारे बंद केली होती. प्रस्थापितांनीच ज्ञानसंग्रह करून इतरांना त्यापासून वंचित ठेवले होते. मात्र संतांनी ज्ञानाची केंद्र सर्वांसाठी खुली केली. त्यामुळे परिश्रम करणारी माणसं ज्ञानकेंद्रित झाली, असा सूर अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाच्या रविवारी झालेल्या परिसंवादात निघाला.दयानंद महाविद्यालयाच्या सभागृहात अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने नवोदित साहित्यिकांचे संमेलन सुरू आहे. रविवारी ‘प्रबोधनामध्ये संत साहित्याचे योगदान’ या विषयावर परिसंवाद झाला. अध्यक्षस्थानी प्रा. रतनलाल सोनग्रा होते. डॉ. सुरेखा आडगावकर, प्रा.डॉ. राजशेखर सोलापुरे यांनी या विषयाची मांडणी केली. यावेळी बोलताना डॉ. सुरेखा आडगावकर म्हणाल्या, संतांनी जनमानसांतील विवेक प्रज्वलित केला. समाजातील देव-धर्माच्या घटनांकडे डोळसपणे पहायला शिकविले. समाजातील प्रचलित रुपकांचा वापर करून मिळविलेले ज्ञान सामान्य माणसांच्या गळीही उतरविले. या संत साहित्याने ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या आहेत. संतांच्या विचारांची शिदोरी मानव कल्याणासाठी महत्वाचीच असल्याचे त्या म्हणाल्या. प्रा.डॉ. राजशेखर सोलापुरे म्हणाले, समाजातील वाईट चालीरीती, परंपरा यावर पहिल्यांदा प्रहार संतांनी केला. ज्ञानाची दारेही खुली करून दिली. महात्मा बसवेश्वर, महात्मा गौतम बुद्ध हेही संतच आहेत. त्यांनी आयुष्यभर सामान्य माणसांना केंद्रबिंदू मानून त्याच्या कल्याणाचा विचार केला. क्रांती, भ्रांती व शांतीचा दुवा म्हणजे संत साहित्य आहे. सूत्रसंचालन डॉ. सुषमा गोमारे यांनी केले. यावेळी नवोदित साहित्यिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. (प्रतिनिधी)प्रस्थापितांकडून शोषण... अध्यक्षीय समारोप करताना प्रा. रतनलाल सोनग्रा म्हणाले, प्रस्थापित समाज व धर्मव्यवस्थेने बहुजनांना ज्ञान नाकारले होते. ज्ञानाच्या जोरावर प्रस्थापितांनी लोकांचे शोषण केले. मात्र संतांनी हे ज्ञान सर्वांसाठी खुले केले. संतांमुळेच ज्ञानाचे केंद्र परिश्रम करणाऱ्या माणसांची केंद्र झाली. ज्ञानदानाचे हे कार्य संतांनी केले नसते, तर ज्ञानाची मक्तेदारी मूठभरांच्याच हाती राहिली असती. धर्माचा वेगळा अर्थ लावून हे ज्ञान नाकारले होते. परंतु, संत साहित्याचा उदय झाला आणि ज्ञानाची दारे सर्वांसाठी खुली झाली, असेही प्रा. सोनग्रा यावेळी म्हणाले.