शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

संतांमुळेच ज्ञानाची दालने खुली

By admin | Updated: July 28, 2014 00:55 IST

लातूर : प्रस्थापित समाजव्यवस्थेने बहुजनांसाठी ज्ञानाची दारे बंद केली होती. प्रस्थापितांनीच ज्ञानसंग्रह करून इतरांना त्यापासून वंचित ठेवले होते.

लातूर : प्रस्थापित समाजव्यवस्थेने बहुजनांसाठी ज्ञानाची दारे बंद केली होती. प्रस्थापितांनीच ज्ञानसंग्रह करून इतरांना त्यापासून वंचित ठेवले होते. मात्र संतांनी ज्ञानाची केंद्र सर्वांसाठी खुली केली. त्यामुळे परिश्रम करणारी माणसं ज्ञानकेंद्रित झाली, असा सूर अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाच्या रविवारी झालेल्या परिसंवादात निघाला.दयानंद महाविद्यालयाच्या सभागृहात अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने नवोदित साहित्यिकांचे संमेलन सुरू आहे. रविवारी ‘प्रबोधनामध्ये संत साहित्याचे योगदान’ या विषयावर परिसंवाद झाला. अध्यक्षस्थानी प्रा. रतनलाल सोनग्रा होते. डॉ. सुरेखा आडगावकर, प्रा.डॉ. राजशेखर सोलापुरे यांनी या विषयाची मांडणी केली. यावेळी बोलताना डॉ. सुरेखा आडगावकर म्हणाल्या, संतांनी जनमानसांतील विवेक प्रज्वलित केला. समाजातील देव-धर्माच्या घटनांकडे डोळसपणे पहायला शिकविले. समाजातील प्रचलित रुपकांचा वापर करून मिळविलेले ज्ञान सामान्य माणसांच्या गळीही उतरविले. या संत साहित्याने ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या आहेत. संतांच्या विचारांची शिदोरी मानव कल्याणासाठी महत्वाचीच असल्याचे त्या म्हणाल्या. प्रा.डॉ. राजशेखर सोलापुरे म्हणाले, समाजातील वाईट चालीरीती, परंपरा यावर पहिल्यांदा प्रहार संतांनी केला. ज्ञानाची दारेही खुली करून दिली. महात्मा बसवेश्वर, महात्मा गौतम बुद्ध हेही संतच आहेत. त्यांनी आयुष्यभर सामान्य माणसांना केंद्रबिंदू मानून त्याच्या कल्याणाचा विचार केला. क्रांती, भ्रांती व शांतीचा दुवा म्हणजे संत साहित्य आहे. सूत्रसंचालन डॉ. सुषमा गोमारे यांनी केले. यावेळी नवोदित साहित्यिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. (प्रतिनिधी)प्रस्थापितांकडून शोषण... अध्यक्षीय समारोप करताना प्रा. रतनलाल सोनग्रा म्हणाले, प्रस्थापित समाज व धर्मव्यवस्थेने बहुजनांना ज्ञान नाकारले होते. ज्ञानाच्या जोरावर प्रस्थापितांनी लोकांचे शोषण केले. मात्र संतांनी हे ज्ञान सर्वांसाठी खुले केले. संतांमुळेच ज्ञानाचे केंद्र परिश्रम करणाऱ्या माणसांची केंद्र झाली. ज्ञानदानाचे हे कार्य संतांनी केले नसते, तर ज्ञानाची मक्तेदारी मूठभरांच्याच हाती राहिली असती. धर्माचा वेगळा अर्थ लावून हे ज्ञान नाकारले होते. परंतु, संत साहित्याचा उदय झाला आणि ज्ञानाची दारे सर्वांसाठी खुली झाली, असेही प्रा. सोनग्रा यावेळी म्हणाले.