शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

संतांमुळेच ज्ञानाची दालने खुली

By admin | Updated: July 28, 2014 00:55 IST

लातूर : प्रस्थापित समाजव्यवस्थेने बहुजनांसाठी ज्ञानाची दारे बंद केली होती. प्रस्थापितांनीच ज्ञानसंग्रह करून इतरांना त्यापासून वंचित ठेवले होते.

लातूर : प्रस्थापित समाजव्यवस्थेने बहुजनांसाठी ज्ञानाची दारे बंद केली होती. प्रस्थापितांनीच ज्ञानसंग्रह करून इतरांना त्यापासून वंचित ठेवले होते. मात्र संतांनी ज्ञानाची केंद्र सर्वांसाठी खुली केली. त्यामुळे परिश्रम करणारी माणसं ज्ञानकेंद्रित झाली, असा सूर अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाच्या रविवारी झालेल्या परिसंवादात निघाला.दयानंद महाविद्यालयाच्या सभागृहात अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने नवोदित साहित्यिकांचे संमेलन सुरू आहे. रविवारी ‘प्रबोधनामध्ये संत साहित्याचे योगदान’ या विषयावर परिसंवाद झाला. अध्यक्षस्थानी प्रा. रतनलाल सोनग्रा होते. डॉ. सुरेखा आडगावकर, प्रा.डॉ. राजशेखर सोलापुरे यांनी या विषयाची मांडणी केली. यावेळी बोलताना डॉ. सुरेखा आडगावकर म्हणाल्या, संतांनी जनमानसांतील विवेक प्रज्वलित केला. समाजातील देव-धर्माच्या घटनांकडे डोळसपणे पहायला शिकविले. समाजातील प्रचलित रुपकांचा वापर करून मिळविलेले ज्ञान सामान्य माणसांच्या गळीही उतरविले. या संत साहित्याने ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या आहेत. संतांच्या विचारांची शिदोरी मानव कल्याणासाठी महत्वाचीच असल्याचे त्या म्हणाल्या. प्रा.डॉ. राजशेखर सोलापुरे म्हणाले, समाजातील वाईट चालीरीती, परंपरा यावर पहिल्यांदा प्रहार संतांनी केला. ज्ञानाची दारेही खुली करून दिली. महात्मा बसवेश्वर, महात्मा गौतम बुद्ध हेही संतच आहेत. त्यांनी आयुष्यभर सामान्य माणसांना केंद्रबिंदू मानून त्याच्या कल्याणाचा विचार केला. क्रांती, भ्रांती व शांतीचा दुवा म्हणजे संत साहित्य आहे. सूत्रसंचालन डॉ. सुषमा गोमारे यांनी केले. यावेळी नवोदित साहित्यिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. (प्रतिनिधी)प्रस्थापितांकडून शोषण... अध्यक्षीय समारोप करताना प्रा. रतनलाल सोनग्रा म्हणाले, प्रस्थापित समाज व धर्मव्यवस्थेने बहुजनांना ज्ञान नाकारले होते. ज्ञानाच्या जोरावर प्रस्थापितांनी लोकांचे शोषण केले. मात्र संतांनी हे ज्ञान सर्वांसाठी खुले केले. संतांमुळेच ज्ञानाचे केंद्र परिश्रम करणाऱ्या माणसांची केंद्र झाली. ज्ञानदानाचे हे कार्य संतांनी केले नसते, तर ज्ञानाची मक्तेदारी मूठभरांच्याच हाती राहिली असती. धर्माचा वेगळा अर्थ लावून हे ज्ञान नाकारले होते. परंतु, संत साहित्याचा उदय झाला आणि ज्ञानाची दारे सर्वांसाठी खुली झाली, असेही प्रा. सोनग्रा यावेळी म्हणाले.