शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

‘गुडघ्या’चे बाशिंग झाले सैल

By admin | Updated: July 7, 2015 00:54 IST

औरंगाबाद : निवडणुकीसाठी वर्षभरापासून सातारा- देवळाईत तयारीला असलेल्या ‘भावी’ उमेदवारांचा उत्साह ओसरत गेला अन् आता तर घिरट्या घालणारी चाके जैसे थे अवस्थेत रुतली

औरंगाबाद : निवडणुकीसाठी वर्षभरापासून सातारा- देवळाईत तयारीला असलेल्या ‘भावी’ उमेदवारांचा उत्साह ओसरत गेला अन् आता तर घिरट्या घालणारी चाके जैसे थे अवस्थेत रुतली. ग्रामपंचायतीमधून, नगर परिषद आणि महानगरपालिकेत समावेश असे रहाटगाडगे नागरिकांनी पाहिले. २५ वॉर्डातून फक्त दोनच वॉर्ड अस्तित्वात आले. अर्धा लाख मतदार दोन भागांत विखुरले गेले. वॉर्ड आरक्षणात खुला आणि एसटी महिला वॉर्ड सुटल्याने अनेकांनी ‘गुडघ्याला बांधून ठेवलेले बाशिंग’च सैल झाल्याचे कबूल करीत आपापल्या कामावर जाणे पसंत केले आहे. पावसाने जोराची सुरुवात केल्याने बोअरची काहीअंशी पाणी पातळी वाढली. मनपाचे २१ टँकर आजही सुरू असल्याने मग उगाच कशाला व्यर्थ श्रम वाया घालवायचे म्हणून नशिबाला दोष देत कार्यकर्ते सध्या तरी ‘भूमिगत’ झाल्याचे दिसत आहे. अहो काय चाललंय? कोण उमेदवार तयारीत आहे? असे प्रश्न एकमेकांना विचारले जात आहेत. परंतु प्रत्येक जण त्या चर्चेतच ‘रस’नसल्याचा आव आणून मला घरचे अर्जंट काम आहे, मी जाऊन येतो, असा बहाणा करीत निघून जाताना दिसत आहे. सातारा वॉर्ड एस.टी. महिलेसाठी राखीव झाल्याने आता उमेदवार कोण असा सवाल प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आहे. स्थानिक उमेदवार शोधावर सर्वच पक्षांनी भर दिल्याचे दिसत आहे. आम्ही एक- दोघे पाहून ठेवले आहेत. परंतु पक्ष कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार; याची आम्हाला कल्पना नाही, असे सांगून कार्यकर्ते वेळ मारून नेत आहेत. खुल्या वॉर्डाकडे अनेकांच्या नजरा वळल्या असल्या तरी आपला ‘शिक्का’ त्या वॉर्डात चालेल का? शेवटी पक्षाची मर्जी राखणारा कोण? तेथे आपला काय निभाव लागणार आहे ? असे अनेक प्रश्न इच्छुकांसमोर आहेत. या भागात अतिक्रमण पाडापाडी हा कळीचा मुद्दा आहे. ४धनिकांची चालणार की जनतेच्या कामात श्रम ओतणारा या विषयीही जनता विचार करीत आहे. परंतु अनेक जण मनपा की नगर परिषद अशा आशेवर ‘छापा -काटा’ करीत आहेत. कारण याविषयीची याचिका न्यायप्रविष्ट आहे. त्याबाबत सर्वच पक्षांनी मौन धरले आहे. बहुतांश जनता म्हणते की, कोणीही असो; रस्ते,पाणी, वीज, ड्रेनेज हे प्रश्न सोडवा, पण पुन्हा हातोडा नको.