शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा दिवस संकल्पपूर्तीचा; शांती पसरवणारा, समृद्धी देणारा भारत स्थापन करूया- मोहन भागवत
2
"तिजोरी तुमच्याकडे असली तरी ‘तिजोरी’चा मालक आमच्याकडे"; चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना टोला
3
पतीची हत्या करून मृतदेह निळ्या ड्रममध्ये टाकणारी मुस्कान झाली आई; पण बाळ कुणाचं? साहिलनेही विचारला प्रश्न
4
इन्फोसिस-एसबीआयसह 'हे' ५ शेअर्स करणार मोठी कमाई; ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज
5
IND vs SA : कोहलीनं २० वर्षांनी घेतला होता तेंडुलकरच्या कॅप्टन्सीतील 'क्लीन स्वीप'चा बदला, पण आता...
6
ipad Air: ऑफरने ग्राहकांचाच 'गेम' केला! आधी ७९,९९० चा आयपॅड १५०० रुपयांत दिला, आता रिटेलर म्हणतो...
7
रुग्णवाहिकेतून उतरवले; ओल्या बाळंतीणीची बाळासह २ किमी पायपीट, रुग्णवाहिका चालकाची कमालीची अमानुषता
8
Champashashthi 2025: २६ नोव्हेंबर चंपाषष्ठी, खंडोबाच्या षडरात्रोत्सवाची सांगता; 'अशी' करा पूजा!
9
इथिओपियाहून भारतात आलेले राखेचे ढग कधी कमी होणार? या शहरांवर परिणाम होणार, हवामान विभागाने दिली माहिती
10
मोठी बातमी! अजित पवारांच्या ताफ्यातील गाडीने उडवले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू
11
३० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा 'ही' आर्थिक कामं, अन्यथा मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं
12
MNS: राज ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट, संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी रिक्षाचालकाला गाठलं आणि रस्त्यावरच...
13
Mumbai: दुचाकीस्वाराचं अपहरण करून लैंगिक सुखाची मागणी; वांद्रे पोलिसांकडून ऑडीचालकाला अटक
14
"डीके शिवकुमार पक्ष बदलून आले तर मी...", भाजपाच्या दिग्गज नेत्याने दिला इशारा, काँग्रेसमध्ये खळबळ
15
Gautam Gambhir: गंभीरच्या प्रशिक्षणाखाली भारताच्या नावावर 'या' ५ लाजिरवाण्या विक्रमांची नोंद!
16
'बिग बॉस मराठी ६'मध्ये दिसणार ही मराठी अभिनेत्री? तेलुगु सिनेमात केलंय काम, प्रोमोमुळे चर्चेला उधाण
17
आता Apple नं घेतला कर्मचारी कपातीचा मोठा निर्णय; 'या' ५ कारणांमुळे कंपनीनं केली घोषणा
18
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरील फोटो लीक, रणबीरचा आर्मी लूक तर आलियाने रेट्रो स्टाईलमध्ये वेधलं लक्ष
19
Astrology: गजकेसरी आणि रूचक राजयोग! २५ नोव्हेंबर रोजी 'या' ५ राशींचे भाग्य चमकणार!
20
Hayli Gubbi: भारतीयांच्या चिंतेत भर! भारतात आली इथियोपिया ज्वालामुखीची राख, महाराष्ट्रातील कोणत्या भागात ढग?
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद शहरात कचरा जाळण्याचे प्रकार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 00:40 IST

चौदा दिवस उलटले तरी महापालिका कचरा कोंडीचा प्रश्न सोडवू शकली नाही. त्यामुळे शहरातील त्रस्त नागरिकांनी ठिकठिकाणी पडलेल्या कच-याला आग लावली. त्यामुळे दिवसभर शहरातील विविध भागांत धुराचे लोट दिसून येत होते. धुरामुळे आसपासच्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. कचºयाला आग लावण्याच्या या दळभद्री प्रकारामुळे विशेषत: दम्याच्या रुग्णांना बराच त्रास सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देधुराचे लोट : त्रस्त झालेल्या नागरिकांचा मनपाविरुद्ध संताप; दुर्गंधीनेही जनता त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : चौदा दिवस उलटले तरी महापालिका कचरा कोंडीचा प्रश्न सोडवू शकली नाही. त्यामुळे शहरातील त्रस्त नागरिकांनी ठिकठिकाणी पडलेल्या कच-याला आग लावली. त्यामुळे दिवसभर शहरातील विविध भागांत धुराचे लोट दिसून येत होते. धुरामुळे आसपासच्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. कच-याला आग लावण्याच्या या दळभद्री प्रकारामुळे विशेषत: दम्याच्या रुग्णांना बराच त्रास सहन करावा लागत आहे.नारेगाव येथे शेतक-यांनी १६ फेब्रुवारीपासून आंदोलन सुरू केले आहे. नारेगाव कचरा डेपोवर एकही ट्रक १४ दिवसांमध्ये गेला नाही. सुरुवातीला महापालिकेने काही वॉर्डातील कचरा उचलून जिरवण्याचा प्रयत्न केला. हा प्रयोगही अयशस्वी ठरला. त्यानंतर कचरा जशास तसा पडून आहे. या कच-यामुळे परिसरात राहणा-या नागरिकांना नरकयातना सहन कराव्या लागत होत्या. अखेर बुधवारी महापालिकेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कच-याच्या डोंगराला नागरिकांनीच आग लावून दिली. दिवसभर या कचºयातून धूर निघत होता. ओला व सुका कचरा एकत्र असल्याने धुरामुळे परिसरात राहणा-या आणि रस्त्याने ये-जा करणा-या नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. हाच प्रकार इतर वसाहतींमध्येही सुरू होता. दम्याच्या रुग्णांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत होता. सर्वसामान्य नागरिकांची चिंता न करणारी महापालिका दम्याच्या रुग्णांची चिंता काय करणार, असा प्रश्नही नागरिक करीत आहेत.शहरात दररोज चारशे मेट्रिक टन कचरा जमा होतो. मागील अनेक वर्षांपासून हा कचरा नारेगाव कचरा डेपोवर नेऊन टाकण्यात येत होता. या कच-यावर कोणतीही प्रक्रिया करण्यात येत नव्हती. मागील १४ दिवसांमध्ये मनपाने कचराच उचलला नाही. त्यामुळे शहरातील विविध वसाहतींमध्ये जवळपास साडेचार हजार मेट्रिक टन कचरा पडून आहे. कचरा उचलला तर नेऊन कुठे टाकावा हा सर्वात मोठा प्रश्न महापालिकेला भेडसावत आहे. महापालिकेने मागील काही दिवसांपासून शासकीय आणि खाजगी जागांचा पर्याय शोधला. प्रत्येक ठिकाणी कचरा टाकण्यास विरोधच झाला. त्यामुळे हतबल महापालिका आता न्यायालय काही तरी तोडगा काढेल या अशी अपेक्षांची प्रतीक्षा करीत आहे.