शहरं
Join us  
Trending Stories
1
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
2
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
3
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
4
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
5
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
6
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
7
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
8
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
9
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
10
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
11
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
12
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
13
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
14
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
15
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
16
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
17
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
18
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
19
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
20
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल

औरंगाबाद शहरात कचरा जाळण्याचे प्रकार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 00:40 IST

चौदा दिवस उलटले तरी महापालिका कचरा कोंडीचा प्रश्न सोडवू शकली नाही. त्यामुळे शहरातील त्रस्त नागरिकांनी ठिकठिकाणी पडलेल्या कच-याला आग लावली. त्यामुळे दिवसभर शहरातील विविध भागांत धुराचे लोट दिसून येत होते. धुरामुळे आसपासच्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. कचºयाला आग लावण्याच्या या दळभद्री प्रकारामुळे विशेषत: दम्याच्या रुग्णांना बराच त्रास सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देधुराचे लोट : त्रस्त झालेल्या नागरिकांचा मनपाविरुद्ध संताप; दुर्गंधीनेही जनता त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : चौदा दिवस उलटले तरी महापालिका कचरा कोंडीचा प्रश्न सोडवू शकली नाही. त्यामुळे शहरातील त्रस्त नागरिकांनी ठिकठिकाणी पडलेल्या कच-याला आग लावली. त्यामुळे दिवसभर शहरातील विविध भागांत धुराचे लोट दिसून येत होते. धुरामुळे आसपासच्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. कच-याला आग लावण्याच्या या दळभद्री प्रकारामुळे विशेषत: दम्याच्या रुग्णांना बराच त्रास सहन करावा लागत आहे.नारेगाव येथे शेतक-यांनी १६ फेब्रुवारीपासून आंदोलन सुरू केले आहे. नारेगाव कचरा डेपोवर एकही ट्रक १४ दिवसांमध्ये गेला नाही. सुरुवातीला महापालिकेने काही वॉर्डातील कचरा उचलून जिरवण्याचा प्रयत्न केला. हा प्रयोगही अयशस्वी ठरला. त्यानंतर कचरा जशास तसा पडून आहे. या कच-यामुळे परिसरात राहणा-या नागरिकांना नरकयातना सहन कराव्या लागत होत्या. अखेर बुधवारी महापालिकेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कच-याच्या डोंगराला नागरिकांनीच आग लावून दिली. दिवसभर या कचºयातून धूर निघत होता. ओला व सुका कचरा एकत्र असल्याने धुरामुळे परिसरात राहणा-या आणि रस्त्याने ये-जा करणा-या नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. हाच प्रकार इतर वसाहतींमध्येही सुरू होता. दम्याच्या रुग्णांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत होता. सर्वसामान्य नागरिकांची चिंता न करणारी महापालिका दम्याच्या रुग्णांची चिंता काय करणार, असा प्रश्नही नागरिक करीत आहेत.शहरात दररोज चारशे मेट्रिक टन कचरा जमा होतो. मागील अनेक वर्षांपासून हा कचरा नारेगाव कचरा डेपोवर नेऊन टाकण्यात येत होता. या कच-यावर कोणतीही प्रक्रिया करण्यात येत नव्हती. मागील १४ दिवसांमध्ये मनपाने कचराच उचलला नाही. त्यामुळे शहरातील विविध वसाहतींमध्ये जवळपास साडेचार हजार मेट्रिक टन कचरा पडून आहे. कचरा उचलला तर नेऊन कुठे टाकावा हा सर्वात मोठा प्रश्न महापालिकेला भेडसावत आहे. महापालिकेने मागील काही दिवसांपासून शासकीय आणि खाजगी जागांचा पर्याय शोधला. प्रत्येक ठिकाणी कचरा टाकण्यास विरोधच झाला. त्यामुळे हतबल महापालिका आता न्यायालय काही तरी तोडगा काढेल या अशी अपेक्षांची प्रतीक्षा करीत आहे.