शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

Killari Earthquake : ‘ती’ काळोखी पहाट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 19:56 IST

अनंत चतुर्दशीची ती काळोखी पहाट आठवली, तर आजही अंगावर शहारे उभारतात. त्यावेळी ‘लोकमत’च्या सोलापूर युनिटचे काम चालू होते. रात्री एकच्या सुमारास मी सोलापूरहून उस्मानाबादला पोहोचलो होतो. गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीचा गोंगाट २.३० च्या दरम्यान संपून थोडासा डोळा लागत नाही तोच ३.०० ते ३.३० च्या दरम्यान परिसरात कुत्र्यांचे जोरजोरात भुंकणे सुरू झाले व पाठोपाठ रडण्याचा आवाज येऊ लागला. 

- विजयकुमार बेदमुथा

बिछान्यावरून उठून पाहतोय तर वातावरण कसे तरी निस्तेज जाणवू लागले होते. अशाच स्थितीत बाल्कनीतून रूममध्ये येऊन बसलो नाही तोच अचानक भूगर्भातून पश्चिमेकडून पूर्वेकडे रेल्वे धावावी, तसा ४/५ सेकंदाचा मोठा आवाज झाला आणि घराच्या भिंतीसह तावदानेही हादरली. भीतीच्या आक्रंदाने लोकांची आरडाओरड सुरू झाली. इमारती हादरताच लोक मुलाबाळांसह घर सोडून रस्त्यावर जमा होऊ लागली.

तेव्हा मोबाईल नव्हता. त्यामुळे सर्व संदेश प्रणाली टेलिफोन किंवा वायरलेसवरच अवलंबून होती. भूकंपाच्या हादऱ्यामध्ये टेलिफोन व विजेचे खांब आडवे झाल्याने वीज व दूरसंचार यंत्रणाही पूर्णपणे ठप्प झाली. त्यावेळी उस्मानाबादला अनिल पवार हे जिल्हाधिकारी तर विष्णूदेव मिश्रा जिल्हा पोलीस प्रमुख होते. पहाटे चारच्या दरम्यान मी या दोघांनाही संपर्क करून भूकंपामुळे कोठे जास्त नुकसान झाले याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला त्यांच्याकडेही काहीच माहिती नव्हती. मात्र, पहाटे ५.३० च्या दरम्यान जिल्हा पोलीस प्रमुखांचा फोन आला की माकणीच्या तेरणा धरणावर जे वायरलेस सेट होते, तेथून माहिती मिळाली की सास्तूर व परिसरातील गावच्या गावे जमीनदोस्त झाली असून, अनेक लोक इमारतींच्या ढिगाऱ्याखाली दबून मरण पावली आहेत. 

जिल्हा पोलीस प्रमुख, जिल्हाधिकारी व सर्व शासकीय यंत्रणेने तातडीने सास्तूर व परिसराकडे धाव घेतली. मीही सकाळी सहाच्या सुमारास सास्तूरकडे निघालो. माझ्यासोबत श्यामसुंदर बोरा, बाबू काजी, भन्साळी फोटोग्राफर, शीला उंबरे, कोहिनूर फोटोचे जैनोद्दीन काजी होते. आम्ही ७.३० च्या दरम्यान लोहाऱ्याला पोहोचलो. तेथून पुढे या विनाशकारी भूकंपाची कल्पना येऊ लागली होती. गावची गावे मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून गेली होती. मातीच्या ढिगाऱ्याखाली माणसे व मुकी जनावरे दबून गेलेली होती. आप्तस्वकीयांचा मातीच्या ढिगाऱ्याखालून जिवंत कोणी तरी मिळेल का याचा शोध चालू होता. अनेक ठिकाणी या शोधातून प्रेतच हाती येत असल्याने रडारड पाहण्यास मिळत होती. ज्या ढिगाऱ्याजवळ माणूस दिसत नसेल अशा ठिकाणी कुत्री मुडद्यांचे लचके तोडत होती. कावळे व गिधाडांचीही लगबग वाढलेली होती.

आम्ही सास्तूर, गुबाळ, नारंगवाडी, राजेगाव, बलसूरपर्यंत सर्वत्र फिरलो. याच दरम्यान येणेगूरहून आमचे वार्ताहर देवीसिंग राजपूत, बसवराज पाटील ही मंडळी त्या परिसरातील माहिती घेऊन आली होती. त्यांच्या सांगण्यावरून हेच चित्र सर्वत्र होते. उस्मानाबादला परत येऊन संपादक राजेंद्र दर्डा यांना परिस्थिती विशद केली. त्यांच्या सूचनेनुसार श्यामसुंदर बोरा यांना सर्व फोटोज् देऊन तातडीने खास गाडी करून औरंगाबादला पाठविले. औरंगाबादच्या लोकमत कार्यालयात सर्वप्रथम फोटो व बातमी उस्मानाबादची पोहोचली होती.

दुसऱ्या दिवशी हेडलाईनमध्ये बाय नेम बातमी आली व त्यापाठोपाठ परदेशातील व्हॉइस आॅफ अमेरिका, बीबीसीसह अनेक वृत्तसंस्थांनी लोकमत कार्यालयातून माझा फोन नंबर घेऊन घटनेचा सविस्तर वृत्तांत व फोटो माझ्याकडून घेऊन माझा संदर्भ देऊन बातम्या प्रसारित केल्या. पत्रकारितेसोबतच सामाजिक जाण ठेवून तातडीने अन्नाची पाकिटे, केळी, बिस्किटस् व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था लोकमततर्फे करावी, अशी विनंती राजेंद्र दर्डा यांना,  तर जैन संघटनेतर्फे करण्याची विनंती शांतिलालजी मुथ्थाा यांना केली. त्यानुसार लोकमत व जैन संघटनेचे प्रमुख मदत केंद्र सास्तूर येथे सुरू झाले. दुसऱ्या दिवशी सकाळीच ‘लोकमत’ कडून मदतीचे वितरणदेखील सुरू झाले. 

टॅग्स :Killari Earthquakeकिल्लारी भूकंपAurangabadऔरंगाबादlaturलातूर