शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

Killari Earthquake : ‘ती’ काळोखी पहाट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 19:56 IST

अनंत चतुर्दशीची ती काळोखी पहाट आठवली, तर आजही अंगावर शहारे उभारतात. त्यावेळी ‘लोकमत’च्या सोलापूर युनिटचे काम चालू होते. रात्री एकच्या सुमारास मी सोलापूरहून उस्मानाबादला पोहोचलो होतो. गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीचा गोंगाट २.३० च्या दरम्यान संपून थोडासा डोळा लागत नाही तोच ३.०० ते ३.३० च्या दरम्यान परिसरात कुत्र्यांचे जोरजोरात भुंकणे सुरू झाले व पाठोपाठ रडण्याचा आवाज येऊ लागला. 

- विजयकुमार बेदमुथा

बिछान्यावरून उठून पाहतोय तर वातावरण कसे तरी निस्तेज जाणवू लागले होते. अशाच स्थितीत बाल्कनीतून रूममध्ये येऊन बसलो नाही तोच अचानक भूगर्भातून पश्चिमेकडून पूर्वेकडे रेल्वे धावावी, तसा ४/५ सेकंदाचा मोठा आवाज झाला आणि घराच्या भिंतीसह तावदानेही हादरली. भीतीच्या आक्रंदाने लोकांची आरडाओरड सुरू झाली. इमारती हादरताच लोक मुलाबाळांसह घर सोडून रस्त्यावर जमा होऊ लागली.

तेव्हा मोबाईल नव्हता. त्यामुळे सर्व संदेश प्रणाली टेलिफोन किंवा वायरलेसवरच अवलंबून होती. भूकंपाच्या हादऱ्यामध्ये टेलिफोन व विजेचे खांब आडवे झाल्याने वीज व दूरसंचार यंत्रणाही पूर्णपणे ठप्प झाली. त्यावेळी उस्मानाबादला अनिल पवार हे जिल्हाधिकारी तर विष्णूदेव मिश्रा जिल्हा पोलीस प्रमुख होते. पहाटे चारच्या दरम्यान मी या दोघांनाही संपर्क करून भूकंपामुळे कोठे जास्त नुकसान झाले याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला त्यांच्याकडेही काहीच माहिती नव्हती. मात्र, पहाटे ५.३० च्या दरम्यान जिल्हा पोलीस प्रमुखांचा फोन आला की माकणीच्या तेरणा धरणावर जे वायरलेस सेट होते, तेथून माहिती मिळाली की सास्तूर व परिसरातील गावच्या गावे जमीनदोस्त झाली असून, अनेक लोक इमारतींच्या ढिगाऱ्याखाली दबून मरण पावली आहेत. 

जिल्हा पोलीस प्रमुख, जिल्हाधिकारी व सर्व शासकीय यंत्रणेने तातडीने सास्तूर व परिसराकडे धाव घेतली. मीही सकाळी सहाच्या सुमारास सास्तूरकडे निघालो. माझ्यासोबत श्यामसुंदर बोरा, बाबू काजी, भन्साळी फोटोग्राफर, शीला उंबरे, कोहिनूर फोटोचे जैनोद्दीन काजी होते. आम्ही ७.३० च्या दरम्यान लोहाऱ्याला पोहोचलो. तेथून पुढे या विनाशकारी भूकंपाची कल्पना येऊ लागली होती. गावची गावे मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून गेली होती. मातीच्या ढिगाऱ्याखाली माणसे व मुकी जनावरे दबून गेलेली होती. आप्तस्वकीयांचा मातीच्या ढिगाऱ्याखालून जिवंत कोणी तरी मिळेल का याचा शोध चालू होता. अनेक ठिकाणी या शोधातून प्रेतच हाती येत असल्याने रडारड पाहण्यास मिळत होती. ज्या ढिगाऱ्याजवळ माणूस दिसत नसेल अशा ठिकाणी कुत्री मुडद्यांचे लचके तोडत होती. कावळे व गिधाडांचीही लगबग वाढलेली होती.

आम्ही सास्तूर, गुबाळ, नारंगवाडी, राजेगाव, बलसूरपर्यंत सर्वत्र फिरलो. याच दरम्यान येणेगूरहून आमचे वार्ताहर देवीसिंग राजपूत, बसवराज पाटील ही मंडळी त्या परिसरातील माहिती घेऊन आली होती. त्यांच्या सांगण्यावरून हेच चित्र सर्वत्र होते. उस्मानाबादला परत येऊन संपादक राजेंद्र दर्डा यांना परिस्थिती विशद केली. त्यांच्या सूचनेनुसार श्यामसुंदर बोरा यांना सर्व फोटोज् देऊन तातडीने खास गाडी करून औरंगाबादला पाठविले. औरंगाबादच्या लोकमत कार्यालयात सर्वप्रथम फोटो व बातमी उस्मानाबादची पोहोचली होती.

दुसऱ्या दिवशी हेडलाईनमध्ये बाय नेम बातमी आली व त्यापाठोपाठ परदेशातील व्हॉइस आॅफ अमेरिका, बीबीसीसह अनेक वृत्तसंस्थांनी लोकमत कार्यालयातून माझा फोन नंबर घेऊन घटनेचा सविस्तर वृत्तांत व फोटो माझ्याकडून घेऊन माझा संदर्भ देऊन बातम्या प्रसारित केल्या. पत्रकारितेसोबतच सामाजिक जाण ठेवून तातडीने अन्नाची पाकिटे, केळी, बिस्किटस् व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था लोकमततर्फे करावी, अशी विनंती राजेंद्र दर्डा यांना,  तर जैन संघटनेतर्फे करण्याची विनंती शांतिलालजी मुथ्थाा यांना केली. त्यानुसार लोकमत व जैन संघटनेचे प्रमुख मदत केंद्र सास्तूर येथे सुरू झाले. दुसऱ्या दिवशी सकाळीच ‘लोकमत’ कडून मदतीचे वितरणदेखील सुरू झाले. 

टॅग्स :Killari Earthquakeकिल्लारी भूकंपAurangabadऔरंगाबादlaturलातूर