शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
5
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
6
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
7
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
8
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
9
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
10
Ganesh Chaturthi 2025:वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
11
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
12
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
13
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
14
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
15
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
16
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
17
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
18
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
19
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
20
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा

पैशांसाठी वाळू व्यावसायिकाचे अपहरण अन् नाट्यमय सुटका

By admin | Updated: November 5, 2014 01:00 IST

औरंगाबाद : पैशांसाठी एका टोळीने वाळू व्यावसायिकाचे मध्यवर्ती बसस्थानकाजवळील एका हॉटेलमधून अपहरण केले. नंतर पोलीस आपल्या मागावर असल्याचे लक्षात येताच

औरंगाबाद : पैशांसाठी एका टोळीने वाळू व्यावसायिकाचे मध्यवर्ती बसस्थानकाजवळील एका हॉटेलमधून अपहरण केले. नंतर पोलीस आपल्या मागावर असल्याचे लक्षात येताच अपहरणकर्त्यांनी या वाळू व्यावसायिकाची मिटमिट्याजवळ सुटका केली. हे अपहरण नाट्य मंगळवारी घडले.अपहरणकर्त्यांच्या टोळीतील गणेश ऊर्फ पप्पू अशोक इंगळे (रा. दलालवाडी) व फिरोज मोहंमद तांबोळी (रा. मिल कॉर्नर) या दोन जणांना गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीतील राजू भुतेकर, रिडलॉन व चावरिया हे तीन आरोपी फरार झाले आहेत. गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांनी सांगितले की, काचीवाड्यातील संदीप प्रकाश हिवराळे (२८) या वाळू व्यावसायिकाचा पैशांच्या देवाणघेवाणीवरून आरोपी राजू भुतेकरसोबत वाद सुरू आहे. दरम्यान, मंगळवारी सकाळी संदीप हा त्याच्या मैत्रिणीसोबत मध्यवर्ती बसस्थानकाजवळील हॉटेल रविराजमध्ये गप्पा मारत बसलेला होता. साडेअकरा वाजेच्या सुमारास आरोपी भुतेकर हा पप्पू इंगळे, फिरोज तांबोळी, रिडलॉन, चावरिया याच्यासह हॉटेलमध्ये पोहोचला. आरोपी इंगळे व इतरांनी ‘चल भुतेकरचे ७० हजार रुपये त्याला आताच दे अन् हे प्रकरण मिटविण्यासाठी आम्हालाही पैसे दे,’ असे म्हणत संदीपला धमकाविले.इकडे संदीपच्या वडिलांनी तातडीने पोलीस नियंत्रण कक्षात संपर्क साधून आपल्या मुलाचे काही जणांनी अपहरण केले असून, त्याला ते मिटमिट्याकडे घेऊन गेले आहेत, अशी माहिती कळविली. माहिती मिळताच गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवा ठाकरे, फौजदार गिरीधर ठाकूर, सुभाष खंडागळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मिटमिट्याच्या दिशेने धाव घेतली. पोलिसांच्या गाड्या रस्त्यावर दिसताच आरोपींचे धाबे दणाणले. मिटमिट्याजवळच आरोपींनी संदीपला धमकावत कारमधून खाली ढकलून दिले. आरोपींचे असेही धाडसआरोपींच्या तावडीतून सुटका होताच संदीपने वडिलांशी संपर्क साधला. तेव्हा त्याचे वडील पोलीस आयुक्तालयात बसलेले होते. त्यांनी त्याला थेट आयुक्तालयात येण्यास सांगितले. रिक्षा पकडून तो पोलीस आयुक्तालयासमोर आला. विशेष म्हणजे आरोपी पप्पू इंगळे व फिरोज तांबोळी हे दोघे एका दुचाकीवर त्याचा पाठलाग करीत आले आणि त्यांनी आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारातून पुन्हा संदीपचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला; परंतु संदीपने आरडाओरड केल्याने तेथे असलेले गुन्हे शाखेचे पोलीस धावत आले आणि त्यांनी दोन्ही आरोपींना अटक केली.