शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

पिस्तुलाचा धाक दाखवून अपहरण; वडगावच्या सरपंचासह ६ जणांविरुद्ध सिल्लोडमध्ये तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 15:32 IST

अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान करूनये म्हणून वडगाव कोल्हाटी-बजाजनगर ग्रामपंचायतीचे शिवसेनेचे सरपंच महेश भोंडवे यांनी  साथीदारांसह ग्रा.पं. सदस्या वैशाली जिवरग व त्यांचे पती काकाजी जिवरग यांना पिस्तूलचा धाक दाखूवन सिल्लोडमधून अपहरण केल्याची तक्रार गजानन जिवरग यांनी सिल्लोड पोलीस ठाण्यात दिली आहे. 

सिल्लोड-वाळूज महानगर : अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान करूनये म्हणून वडगाव कोल्हाटी-बजाजनगर ग्रामपंचायतीचे शिवसेनेचे सरपंच महेश भोंडवे यांनी  साथीदारांसह ग्रा.पं. सदस्या वैशाली जिवरग व त्यांचे पती काकाजी जिवरग यांना पिस्तूलचा धाक दाखूवन सिल्लोडमधून अपहरण केल्याची तक्रार गजानन जिवरग यांनी सिल्लोड पोलीस ठाण्यात दिली आहे. 

वडगाव कोल्हाटी ग्रा.पं. चे सरपंच महेश भोंडवे, उपसरपंच हौसाबाई पाटोळे यांच्यावर १२ सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. २ मे रोजी त्या संदर्भात विशेष सभा बोलावली आहे. हे १२ सदस्य आठवडाभरापूर्वीच अज्ञातस्थळी सहलीवर गेले आहेत. यातील वैशाली जिवरग या पतीसह काही कामानिमित्त सिल्लोड येथे दीराकडे गेल्या होत्या. वैशाली जिवरग यांना गाठून त्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान करू नये म्हणून सरपंच भोंडवे, उपसरपंचाचा मुलगा राम पाटोळे व गिरणीवाला त्रिभुवन यांच्यासह अन्य तीन जणांनी जिवरग दाम्पत्याला पिस्तूलचा धाक दाखवून सिल्लोडमधील गजबजलेल्या टिळकनगरातून शनिवारी सायंकाळी अपहरण केले. या प्रकरणी गजानन जिवरग यांच्या तक्रारीवरून सिल्लोड पोलीस ठाण्यात वडगावचे सरपंच महेश भोंडवे, राम पाटोळे, त्रिभुवन व अन्य तीन अशा सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला,

तक्रार दाखल न करण्यासाठी दबाव ...भाऊ काकाजी जिवरग व वहिनी वैशाली जिवरग यांचे अपहरण झाल्याची तक्रार द्यायला गजानन जिवरग हे पोलीस ठाण्यात गेले. तेव्हा शिवसेनेच्या एका नेत्याने पोलीस ठाण्यात फोन करून तक्रार घेऊ नका, असे सांगितले. शिवाय तक्रारदार जिवरग यांच्यावरही दबाव टाकण्यात आला. घाबरलेले जिवरग दुपारी ठाण्यातून निघून गेले. सायंकाळी पुन्हा तक्रार द्यायला आले. अखेर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

सरपंचावर गोव्यातही गुन्हा १५ दिवसांपूर्वीच महेश भोंडवे यांना विना परवाना पिस्टल बाळगल्याप्रकरणी गोवा पोलिसांनी अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. आता सिल्लोड  ठाण्यात पुन्हा अपहरण केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांवर दबाव नाहीघटना शनिवारी संध्याकाळी घडली. तक्रारदार रविवारी दुपारी आला आणि अपूर्ण तक्रार देऊन निघून गेला. त्यानंतर रविवारी संध्याकाळी पुन्हा तक्रार दिली. तक्रार येताच गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांवर कुणाचा दबाव नाही. उशिरा तक्रार दिली म्हणून उशिरा गुन्हा दाखल झाला, चौकशीअंती सत्य समोर येईल, असे सिल्लोडचे पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांनी सांगितले.

टॅग्स :KidnappingअपहरणElectionनिवडणूकAurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीस