शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
4
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
5
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
7
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
8
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
9
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
10
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
11
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
12
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
13
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
14
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
15
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
16
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
17
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
18
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
19
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
20
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
Daily Top 2Weekly Top 5

खुलजा सिम सिम...

By admin | Updated: October 19, 2014 00:21 IST

आशपाक पठाण , लातूर विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत गेल्या महिनाभरापासून रात्रीचा दिवस करून मतदारांच्या दारोदारी फिरणाऱ्या कार्यकर्त्यांची कसोटी पणाला लागली आहे.

आशपाक पठाण , लातूरविधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत गेल्या महिनाभरापासून रात्रीचा दिवस करून मतदारांच्या दारोदारी फिरणाऱ्या कार्यकर्त्यांची कसोटी पणाला लागली आहे. १५ आॅक्टोबर रोजी मतदान झाल्यावर कार्यकर्त्यांनी विजयाची गणिते जुळवीत आपणच कसे सरस राहू, याविषयी चर्चेचे गुऱ्हाळ गाळले. लातूर शहरातील अनेक कट्ट्यांवर मध्यरात्रीपर्यंतही निकालावर ज्येष्ठ कार्यकर्त्यांसह युवकांनीही चर्चा घडवून आणल्या. नेत्यांना दिलेला शब्द पूर्णत्वास जातो की नाही, मतदारांनी आपल्याला तारले की मारले, हे रविवारी सकाळी ११ वाजेपर्यंत उघडकीस येणार असल्याने कार्यकर्त्यांच्या मनात धाकधुक् सुरू आहे. तर मतदार ‘खुलजा सिम सिम...’ ची वाट पाहत आहेत़ लातूर जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चेचा मतदारसंघ असलेल्या लातूर शहर व औसा विधानसभा मतदारसंघात काय होणार? याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. तिरंगी व चौरंगी लढतीचा फायदा आपणालाच होईल, असा आत्मविश्वास सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांमध्ये आहे. शिवाय, कार्यकर्त्यांनीही नेत्यांना व उमेदवारांना विजय आपलाच होईल, अशी खात्री दिल्याने सर्वचजण निकालाकडे डोळे लावून आहेत. शिवाय, उत्साही कार्यकर्त्यांनी आपल्याच उमेदवाराचा विजय होईल, यावर पैजाही लावल्या आहेत. लातूर शहरात गेल्या तीन दिवसांपासून गल्लीबोळातही निवडणुकीची चर्चा रंगली आहे. राजकीय पक्षांचे उमेदवारही कार्यकर्त्यांकडून मतदानाची आकडेवारी घेऊन प्लस-मायनसचा गेल्या तीन दिवसांपासून मेळ घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. कुठल्या बूथवर किती मते मिळाली असतील, याचा अंदाज काढण्यात आल्याने कार्यकर्त्यांच्या विश्वासावर उमेदवारही आपणच विजयी होणार असल्याच्या आनंदात आहेत. औसा, निलंगा, उदगीर, अहमदपूर या चारही मतदारसंघांतील लढतींकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे लातूर शहर मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. लातूर शहर मतदारसंघात गेल्या तीन दिवसांपासून सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते विजय आपलाच असल्याचे सांगत सुटले आहेत. त्यामुळे दुपारनंतर निकालाचे चित्र स्पष्ट होणार असले, तरी कार्यकर्त्यांना मात्र चांगलीच धास्ती लागली आहे. नेत्यांना दिलेला शब्द खरा ठरतो की चुकीचा, यावर कार्यकर्ते चिंतन करीत आहेत. दिवाळीच्या अगोदर कोणाच्या फटाक्यांचा आवाज वाढणार आणि तो आवाज कुठवर जाणार, याकडे आता लक्ष लागून राहिले आहे़ रविवारी दुपारनंतर दिवाळीपुर्वीच फटाके फुटणार आहेत़ राजकीय पक्षांचे कार्यकर्ते पैजा लावण्यातच दंग आहेत. कार्र्यकर्त्यांचे दुकान भले कुठलेही असो, चर्चा मात्र ग्राहकांसोबत राजकारणावरच व कोण विजयी होईल, यावरच केल्या जात आहेत. सर्वसामान्य मतदार मात्र कोणीही आलं तरी आपलंच... अशी भावना व्यक्त करीत आहेत. कुठे पंजाची, कुठे कमळाची, कुठे घड्याळाची, कुठे धनुष्यबाणाची, कुठे इंजीनची तर कुठे शिट्टीचा आवाज रंगला आहे. रविवारी दुपारी १२ नंतर दिवाळीपूर्वीच फटाके कोण वाजविणार, कोणाचा आवाज वाढणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. उमेदवार व पक्षाचे नेते विजयाची गणिते जुळवीत आहेत. तर कार्यकर्ते बूथनिहाय कोण किती मतांनी प्लस राहील, कोण मायनस राहील, याचा विचार करीत आहेत. गल्लीतील कट्ट्यांवर राजकीय पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांवर प्लस-मायनसचे दावे करीत आहेत. हा समाज आमच्याकडे, ही गल्ली आमच्याकडे, तो गट आमच्याकडे, ते व्यापारी आमच्याकडे असे दावे-प्रतिदावे केले जात आहेत. कोणाच्या पारड्यात मतदार राजाने किती वजन टाकले, हे मात्र दुपारपर्यंत सिद्ध होणार आहे. त्यामुळे विजयाचा कांगावा करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांची बोलती मतमोजणीला सुरुवात झाल्यावर दोन ते तीन तासांतच बंद होणार आहे. ‘खुलजा सिम सिम...’ म्हणत मतदार मात्र प्रशासनाच्या मतमोजणीकडे लक्ष देऊन बसला आहे. मोबाईल, टीव्ही व अन्य साधणे मतमोजणीच्या पहिल्या दिवशीच उत्सुक कार्यकर्ते व मतदारांनी अपडेट् करून ठेवल्या आहेत.