शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

खोतकर-सत्तार यांची औरंगाबादेत ‘चाय पे चर्चा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 12:26 IST

कार्यकर्त्यांसमवेत अर्जुन खोतकरजालन्याहून नाशिककडे चालले होते.

औरंगाबाद : राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर व औरंगाबाद जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आ. अब्दुल सत्तार यांची गुरुवारी दुपारी औरंगाबादेत ‘चाय पे चर्चा’ झाली. सत्तार यांनी खोतकरांना काँग्रेसमध्ये प्रवेश करून जालना लोकसभेची निवडणूक भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरुद्ध लढण्याची पुन्हा एकदा गळ घातली. तुम्हाला निवडून आणण्याची जबाबदारी आम्ही घेतो, अशी हमीही त्यांनी दिली; पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यास खोतकरांनी प्रतिसाद दिला नाही. 

अब्दुल रशीद पहिलवान व फिरोज लाला तांबोळी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांसमवेत अर्जुन खोतकर हे दुपारी जालन्याहून नाशिककडे चालले होते. औरंगाबादला आल्यानंतर त्यांनी सत्तार यांना फोन केला व चहा पिण्याच्या निमित्ताने काँग्रेसचे कार्यकर्ते फिरोज पटेल यांच्या बीड बायपास रोडवरील कार्यालयात दोघेच चर्चा करीत बसले. साधारण एक तासभर ही चर्चा चालली. दोन दिवसांत गोड बातमी देतो, असे सत्तार म्हणाले, तर आमची ही वैयक्तिक भेट होती, असे खोतकर यांनी सांगितले.

सत्तार यांनी सांगितले की, रावसाहेब दानवे हे खोतकरांना सतत त्रास देत आहेत. आता जर ते दानवे यांच्याविरुद्ध लढले नाहीत, तर त्यांचे राजकारणच संपेल. माझे व खोतकरांचे पारिवारिक संबंध आहेत. त्यांच्या कुटुंबियांशी चर्चा करून निवडणूक लढण्याचा निर्णय घ्यायला भाग पाडेन. 

जालना लोकसभा मतदारसंघातून डॉ. कल्याण काळे किंवा मी उमेदवार राहू, अशी घोषणा बुधवारी पत्रपरिषदेत अब्दुल सत्तार यांनी केली होती. याला चोवीस तास उलटत नाहीत तोच खोतकर व सत्तार यांच्यातील ‘चाय पे चर्चे’ने तर्कवितर्क लावणे सुरू झाले. 

खोतकर २ लाख मतांनी विजयी होतील ‘अर्जुन खोतकर हे दोन लाख मतांनी विजयी होतील. ते विजय प्राप्त करतात की, रणछोडदास बनतात, हे तुम्ही त्यांनाच विचारा,’ असेही सत्तारांनी म्हटले होते. गेल्या दोन वर्षांपासून खोतकर २३ वेळा दानवेंविरुद्ध लढणारच, असे बोलले आहेत.याची जाणीव त्यांनी ठेवली, तर चकवा निश्चित बसेल, अशा शब्दांत खोतकरांना टोला लगावला. 

टॅग्स :Arjun Khotkarअर्जुन खोतकरAbdul Sattarअब्दुल सत्तारLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९