शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

खोतकर-सत्तार यांची औरंगाबादेत ‘चाय पे चर्चा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 12:26 IST

कार्यकर्त्यांसमवेत अर्जुन खोतकरजालन्याहून नाशिककडे चालले होते.

औरंगाबाद : राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर व औरंगाबाद जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आ. अब्दुल सत्तार यांची गुरुवारी दुपारी औरंगाबादेत ‘चाय पे चर्चा’ झाली. सत्तार यांनी खोतकरांना काँग्रेसमध्ये प्रवेश करून जालना लोकसभेची निवडणूक भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरुद्ध लढण्याची पुन्हा एकदा गळ घातली. तुम्हाला निवडून आणण्याची जबाबदारी आम्ही घेतो, अशी हमीही त्यांनी दिली; पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यास खोतकरांनी प्रतिसाद दिला नाही. 

अब्दुल रशीद पहिलवान व फिरोज लाला तांबोळी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांसमवेत अर्जुन खोतकर हे दुपारी जालन्याहून नाशिककडे चालले होते. औरंगाबादला आल्यानंतर त्यांनी सत्तार यांना फोन केला व चहा पिण्याच्या निमित्ताने काँग्रेसचे कार्यकर्ते फिरोज पटेल यांच्या बीड बायपास रोडवरील कार्यालयात दोघेच चर्चा करीत बसले. साधारण एक तासभर ही चर्चा चालली. दोन दिवसांत गोड बातमी देतो, असे सत्तार म्हणाले, तर आमची ही वैयक्तिक भेट होती, असे खोतकर यांनी सांगितले.

सत्तार यांनी सांगितले की, रावसाहेब दानवे हे खोतकरांना सतत त्रास देत आहेत. आता जर ते दानवे यांच्याविरुद्ध लढले नाहीत, तर त्यांचे राजकारणच संपेल. माझे व खोतकरांचे पारिवारिक संबंध आहेत. त्यांच्या कुटुंबियांशी चर्चा करून निवडणूक लढण्याचा निर्णय घ्यायला भाग पाडेन. 

जालना लोकसभा मतदारसंघातून डॉ. कल्याण काळे किंवा मी उमेदवार राहू, अशी घोषणा बुधवारी पत्रपरिषदेत अब्दुल सत्तार यांनी केली होती. याला चोवीस तास उलटत नाहीत तोच खोतकर व सत्तार यांच्यातील ‘चाय पे चर्चे’ने तर्कवितर्क लावणे सुरू झाले. 

खोतकर २ लाख मतांनी विजयी होतील ‘अर्जुन खोतकर हे दोन लाख मतांनी विजयी होतील. ते विजय प्राप्त करतात की, रणछोडदास बनतात, हे तुम्ही त्यांनाच विचारा,’ असेही सत्तारांनी म्हटले होते. गेल्या दोन वर्षांपासून खोतकर २३ वेळा दानवेंविरुद्ध लढणारच, असे बोलले आहेत.याची जाणीव त्यांनी ठेवली, तर चकवा निश्चित बसेल, अशा शब्दांत खोतकरांना टोला लगावला. 

टॅग्स :Arjun Khotkarअर्जुन खोतकरAbdul Sattarअब्दुल सत्तारLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९