शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

श्रमदानातून खोदली आदिवासींनी विहीर

By admin | Updated: May 30, 2016 01:13 IST

सुरेश चव्हाण , कन्नड दरवर्षीच भेडसावणारी पाणीटंचाई व त्यावर टँकरचा तात्पुरता उपाय. ही कुचंबणा थांबविण्यासाठी ठाकरवाडीचे आदिवासी एकत्र आले व त्यांनी कामगार दिनास

सुरेश चव्हाण , कन्नडदरवर्षीच भेडसावणारी पाणीटंचाई व त्यावर टँकरचा तात्पुरता उपाय. ही कुचंबणा थांबविण्यासाठी ठाकरवाडीचे आदिवासी एकत्र आले व त्यांनी कामगार दिनास श्रमदानातून विहीर खोदण्यास सुरुवात केली. १५ दिवसांच्या आत विहीर खोदून पूर्ण झाली अन् केवळ ३० फुटांवर पाणी लागल्याने ठाकरवाडीला आनंदाचे भरते आले. निमडोंगरी गु्रप ग्रामपंचायतअंतर्गत ठाकरवाडी आहे. वाडीत अख्खा ठाकर समाज, वाडीची लोकसंख्या जेमतेम ४००. बहुतेक सर्वजण ऊसतोड कामगार, उरलेल्या काळात थोडीफार असलेली शेती कसणे आणि मोलमजुरी हा यांचा व्यवसाय. वाडीत जाण्यासाठी असलेला कच्चा जोडरस्ता. वाडीला दरवर्षी पाण्याची टंचाई, प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात टँकर. ही समस्या कायमची दूर करण्याचे वाडीने ठरविले. वाडीपासून २ कि.मी.अंतरावर सरकारी इनाम (जमीन) आहे. या जमिनीपासून नाला आहे. या नाल्याच्या काठावर श्रमदानातून विहीर खोदण्याचे शिवधनुष्य त्यांनी उचलले. महाराष्ट्रदिनी काम सुरू करण्यात आले. निमडोंगरीचे सरपंच सुरेश नीळ व माजी सभापती शेकनाथ चव्हाण यांनी प्रोत्साहन दिले.ग्रामपंचायतने क्रे न उपलब्ध करून दिले. विहिरीवर श्रमदान करण्यासाठी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिलाही सरसावल्या. विहिरीचे काम ३० फूट खोल झाले आणि विहिरीला पाणी लागले. सर्वांचा आनंद गगनात मावेना. या पाण्याचे पूजन उपविभागीय अधिकारी राजू नंदकर यांच्या हस्ते शाखा अभियंता कालिदास उपासनी, सरपंच सुरेश नीळ व ठाकरवाडी-निमडोंगरी येथील ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी विहिरीपासून वाडीपर्यंत पाईपलाईन करून देण्याची मागणी केली. उपविभागीय अधिकारी राजू नंदकर यांनी ठाकरवाडीच्या रहिवाशांचे कौतुक करून विहिरीपासून गावापर्यंत तात्पुरत्या पाणीपुरवठा पाईपलाईनसाठी तांत्रिक बाबी तपासण्यासाठी पाणीपुरवठा विभाग खुलताबाद यांना आदेशित केले. ‘आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखरं’ या ना.धों. महानोरांच्या गीताप्रमाणे जंगलात अथवा डोंगर टेकडीच्या पायथ्याशी वस्ती करून राहणारा अशिक्षित आदिवासी ठाकर समाज काळानुरूप बदलताना दिसत आहे. एकीच्या बळाची महती त्यांना कळली आहे आणि म्हणूनच शासनाच्या भरवशावर न बसता ठाकरवाडी एकत्र आली आणि ‘आपुले भविष्य आपुल्या हाती’ या उक्तीप्रमाणे झपाटून कामाला लागले आणि नवीन इतिहास घडविला.