शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
5
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
6
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
7
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
8
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
9
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
10
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
11
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
12
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
13
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
14
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
15
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
16
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
17
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
18
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
19
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
20
देश सर्वप्रथम!- नि:स्पृह राष्ट्रसाधनेची १०० वर्षे!

शालेय पोषण आहारात तूरडाळ नसल्याने खिचडी बेचव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:02 IST

औरंगाबाद : जिल्ह्यात मे महिन्यापासून दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहारात कडधान्यच गायब झाले आहे. त्यामुळे शालेय पोषण आहारातील खिचडी ...

औरंगाबाद : जिल्ह्यात मे महिन्यापासून दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहारात कडधान्यच गायब झाले आहे. त्यामुळे शालेय पोषण आहारातील खिचडी बेचव झाली. याचा फटका जिल्ह्यातील सुमारे साडेचार लाख विद्यार्थ्यांना बसला आहे.

ग्रामीण व शहरी भागात कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी १६ मार्च २०२० पासून शाळा बंद करण्यात आल्या. तेव्हापासून शालेय विद्यार्थ्यांना शाळेत दिली जाणारी खिचडी बंद करण्यात आली. त्याऐवजी मुलांना धान्य घरी देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, वितरणामध्ये कडधान्य गायब झाल्याचे दिसून आले आहे.

शासनाच्या धोरणानुसार २००३ पासून मान्यताप्राप्त व जि. प. शाळेतील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जात आहे. विद्यार्थ्यांना पोषक आहार मिळावा आणि मुलांना शाळेत येण्याची ओढ निर्माण व्हावी हा त्यामागचा मूळ उद्देश होता. यानुसार आजपर्यंत शालेय पोषण आहार दिला जातो. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाकाळात पोषण आहारात बदल झाला. शहरी भागातील विद्यार्थ्यांना केवळ तांदूळ दिला जातो. तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मूगदाळ व तांदूळ दिला जात आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील १ ते ८ पर्यंतच्या शाळांची संख्या ३०७१ आहे.

------

कोरोनाकाळात तांदूळ दिला पण...

शहरातील लाभार्थी विद्यार्थ्यांना कोरोनाकाळात शालेय पोषण आहारात केवळ तांदूळ दिले जात होते. यामुळे केवळ तांदूळ बनवून खाणे हे विद्यार्थ्यांना रुचकर लागत नाही. तर ग्रामीण भागातही तूरडाळ मिळत नसल्याने खिचडीची चवच निघून गेली आहे. खिचडीसाठी लागणारे साहित्य मीठ, मिरची पावडर, जिरे, हळद, गोडतेल हे देखील देणे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या घरात ही खिचडी बनलीच नाही.

-------

जिल्ह्यातील पोषण आहार लाभार्थी : ४,४९,९११

शहरी लाभार्थी : १,०६,३००

ग्रामीण लाभार्थी : ३.४२,६११

--------------

कोट :

औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळेत जून २०२० पासून फेब्रुवारी २०२१ पर्यंत तांदूळ व मूगडाळीचा पुरवठा करण्यात आला. तर शहरी भागातील शाळांना केवळ तांदूळ पुरवठा करण्यात आला आहे. येत्या काही दिवसांत कडधान्याचा पुरवठा केला जाईल.

- भाऊसाहेब देशपांडे, शालेय पोषण आहार, लेखाधिकारी जि. प.