शहरं
Join us  
Trending Stories
1
गौतम गंभीरने पिचशी छेडछाड थांबवावी अन् मी सांगतोय ते ऐकावं...; सौरव गांगुलीचा थेट सल्ला
2
बांगलादेश कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर शेख हसीना यांची पहिली प्रतिक्रिया; काय म्हणाल्या? 
3
किरकोळ गुंतवणूकदारांनी 'या' १० शेअर्समध्ये टाकले ₹१८,००० कोटी! सुजलॉन त्यापैकी एक, आणखी नावं कोणती?
4
"राहुल गांधी पंतप्रधान होवोत अथवा न होवोत, आमचा हेतू...!" बिहार निवडणुकीसंदर्भात बोलताना काय म्हणाले रॉबर्ट वाड्रा? 
5
क्रिप्टो मार्केटमध्ये हाहाकार! बिटकॉइन १५ लाख तर इथर १.३५ लाखानं कोसळला; ही आहेत कारणं
6
दिल्लीतील स्फोटात बुटाचा वापर, उमरने TATP स्फोटकांचा केला वापर; NIA च्या तपासात खळबळजनक माहिती
7
MLA Disqualification Case: 'आमदारांचं प्रकरण दोन आठवड्यात निकाली काढा, नाहीतर...'; सर्वोच्च न्यायालय विधानसभा अध्यक्षांवर संतापले
8
दिल्ली स्फोट तपास: कोडवर्ड, 'वुल्फ आवर' आणि महिला दहशतवाद्यांचे 'ऑरोरा-लूना' पथक!
9
ओवेसींच्या पाठिंब्यामुळे प्रतिष्ठेच्या पोटनिवडणुकीत मारली बाजी, कोण आहेत काँग्रेसचे आमदार नवीन यादव?
10
Delhi Blast : नेपाळमध्ये खरेदी केले ७ सेकंड-हँड फोन, कानपूरमधून ६ सिमकार्ड; दिल्ली स्फोटात मोठा खुलासा
11
निशस्त्र आंदोलकांवर गोळीबार, बॉम्ब टाकण्याचे आदेश, शेख हसीना दोषी, कोर्टाने सुनावली फाशीची शिक्षा 
12
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल; Gold २ हजारांपेक्षा अधिकनं झालं स्वस्त, Silver मध्ये ६५०० ची घसरण
13
भाजपाचा यू टर्न! काशिनाथ चौधरींच्या पक्षप्रवेशाला स्थगिती; पालघर साधू हत्याकांडात झाले होते आरोप
14
Video: माकडाच्या उडीने REEL मध्ये आलं वेगळंच 'थ्रिल' !! घाबरलेल्या मुलीने पुढे काय केलं बघा
15
चाणक्यनीती: कोणी त्रास देत असेल तर अशा हितशत्रूंशी लढण्यासाठी वापरा 'या' ३ गुप्त रणनीती! |
16
Yuvraj Singh Father Yograj Singh : "मी मरायला तयार आहे, अनोळखी लोकांनी दिलेल्या अन्नावर जगतोय"; युवीच्या वडिलांना भावना अनावर
17
भारत सरकार शेख हसीना यांना बांगलादेशात परत पाठवणार? नियम काय सांगतात?
18
भाजपानं तिकीट नाकारल्यानं RSS कार्यकर्त्यांनं उचललं टोकाचं पाऊल?; अखेरच्या क्षणी केला होता शिवसेनेशी संपर्क
19
ATM मध्ये दोनदा 'कॅन्सल' बटन दाबल्यास तुमचे पैसे सुरक्षित राहतात? व्हायरल दाव्याचे सत्य काय?
20
Bihar CM: नितीश कुमारच होणार बिहारचे मुख्यमंत्री! भाजप प्रदेशाध्यक्षांनीच गोंधळ थांबवला; म्हणाले, "फक्त..."
Daily Top 2Weekly Top 5

शालेय पोषण आहारात तूरडाळ नसल्याने खिचडी बेचव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:02 IST

औरंगाबाद : जिल्ह्यात मे महिन्यापासून दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहारात कडधान्यच गायब झाले आहे. त्यामुळे शालेय पोषण आहारातील खिचडी ...

औरंगाबाद : जिल्ह्यात मे महिन्यापासून दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहारात कडधान्यच गायब झाले आहे. त्यामुळे शालेय पोषण आहारातील खिचडी बेचव झाली. याचा फटका जिल्ह्यातील सुमारे साडेचार लाख विद्यार्थ्यांना बसला आहे.

ग्रामीण व शहरी भागात कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी १६ मार्च २०२० पासून शाळा बंद करण्यात आल्या. तेव्हापासून शालेय विद्यार्थ्यांना शाळेत दिली जाणारी खिचडी बंद करण्यात आली. त्याऐवजी मुलांना धान्य घरी देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, वितरणामध्ये कडधान्य गायब झाल्याचे दिसून आले आहे.

शासनाच्या धोरणानुसार २००३ पासून मान्यताप्राप्त व जि. प. शाळेतील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जात आहे. विद्यार्थ्यांना पोषक आहार मिळावा आणि मुलांना शाळेत येण्याची ओढ निर्माण व्हावी हा त्यामागचा मूळ उद्देश होता. यानुसार आजपर्यंत शालेय पोषण आहार दिला जातो. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाकाळात पोषण आहारात बदल झाला. शहरी भागातील विद्यार्थ्यांना केवळ तांदूळ दिला जातो. तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मूगदाळ व तांदूळ दिला जात आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील १ ते ८ पर्यंतच्या शाळांची संख्या ३०७१ आहे.

------

कोरोनाकाळात तांदूळ दिला पण...

शहरातील लाभार्थी विद्यार्थ्यांना कोरोनाकाळात शालेय पोषण आहारात केवळ तांदूळ दिले जात होते. यामुळे केवळ तांदूळ बनवून खाणे हे विद्यार्थ्यांना रुचकर लागत नाही. तर ग्रामीण भागातही तूरडाळ मिळत नसल्याने खिचडीची चवच निघून गेली आहे. खिचडीसाठी लागणारे साहित्य मीठ, मिरची पावडर, जिरे, हळद, गोडतेल हे देखील देणे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या घरात ही खिचडी बनलीच नाही.

-------

जिल्ह्यातील पोषण आहार लाभार्थी : ४,४९,९११

शहरी लाभार्थी : १,०६,३००

ग्रामीण लाभार्थी : ३.४२,६११

--------------

कोट :

औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळेत जून २०२० पासून फेब्रुवारी २०२१ पर्यंत तांदूळ व मूगडाळीचा पुरवठा करण्यात आला. तर शहरी भागातील शाळांना केवळ तांदूळ पुरवठा करण्यात आला आहे. येत्या काही दिवसांत कडधान्याचा पुरवठा केला जाईल.

- भाऊसाहेब देशपांडे, शालेय पोषण आहार, लेखाधिकारी जि. प.