शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

शालेय पोषण आहारात तूरडाळ नसल्याने खिचडी बेचव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:02 IST

औरंगाबाद : जिल्ह्यात मे महिन्यापासून दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहारात कडधान्यच गायब झाले आहे. त्यामुळे शालेय पोषण आहारातील खिचडी ...

औरंगाबाद : जिल्ह्यात मे महिन्यापासून दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहारात कडधान्यच गायब झाले आहे. त्यामुळे शालेय पोषण आहारातील खिचडी बेचव झाली. याचा फटका जिल्ह्यातील सुमारे साडेचार लाख विद्यार्थ्यांना बसला आहे.

ग्रामीण व शहरी भागात कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी १६ मार्च २०२० पासून शाळा बंद करण्यात आल्या. तेव्हापासून शालेय विद्यार्थ्यांना शाळेत दिली जाणारी खिचडी बंद करण्यात आली. त्याऐवजी मुलांना धान्य घरी देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, वितरणामध्ये कडधान्य गायब झाल्याचे दिसून आले आहे.

शासनाच्या धोरणानुसार २००३ पासून मान्यताप्राप्त व जि. प. शाळेतील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जात आहे. विद्यार्थ्यांना पोषक आहार मिळावा आणि मुलांना शाळेत येण्याची ओढ निर्माण व्हावी हा त्यामागचा मूळ उद्देश होता. यानुसार आजपर्यंत शालेय पोषण आहार दिला जातो. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाकाळात पोषण आहारात बदल झाला. शहरी भागातील विद्यार्थ्यांना केवळ तांदूळ दिला जातो. तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मूगदाळ व तांदूळ दिला जात आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील १ ते ८ पर्यंतच्या शाळांची संख्या ३०७१ आहे.

------

कोरोनाकाळात तांदूळ दिला पण...

शहरातील लाभार्थी विद्यार्थ्यांना कोरोनाकाळात शालेय पोषण आहारात केवळ तांदूळ दिले जात होते. यामुळे केवळ तांदूळ बनवून खाणे हे विद्यार्थ्यांना रुचकर लागत नाही. तर ग्रामीण भागातही तूरडाळ मिळत नसल्याने खिचडीची चवच निघून गेली आहे. खिचडीसाठी लागणारे साहित्य मीठ, मिरची पावडर, जिरे, हळद, गोडतेल हे देखील देणे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या घरात ही खिचडी बनलीच नाही.

-------

जिल्ह्यातील पोषण आहार लाभार्थी : ४,४९,९११

शहरी लाभार्थी : १,०६,३००

ग्रामीण लाभार्थी : ३.४२,६११

--------------

कोट :

औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळेत जून २०२० पासून फेब्रुवारी २०२१ पर्यंत तांदूळ व मूगडाळीचा पुरवठा करण्यात आला. तर शहरी भागातील शाळांना केवळ तांदूळ पुरवठा करण्यात आला आहे. येत्या काही दिवसांत कडधान्याचा पुरवठा केला जाईल.

- भाऊसाहेब देशपांडे, शालेय पोषण आहार, लेखाधिकारी जि. प.