शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

शालेय पोषण आहारात तूरडाळ नसल्याने खिचडी बेचव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:02 IST

औरंगाबाद : जिल्ह्यात मे महिन्यापासून दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहारात कडधान्यच गायब झाले आहे. त्यामुळे शालेय पोषण आहारातील खिचडी ...

औरंगाबाद : जिल्ह्यात मे महिन्यापासून दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहारात कडधान्यच गायब झाले आहे. त्यामुळे शालेय पोषण आहारातील खिचडी बेचव झाली. याचा फटका जिल्ह्यातील सुमारे साडेचार लाख विद्यार्थ्यांना बसला आहे.

ग्रामीण व शहरी भागात कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी १६ मार्च २०२० पासून शाळा बंद करण्यात आल्या. तेव्हापासून शालेय विद्यार्थ्यांना शाळेत दिली जाणारी खिचडी बंद करण्यात आली. त्याऐवजी मुलांना धान्य घरी देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, वितरणामध्ये कडधान्य गायब झाल्याचे दिसून आले आहे.

शासनाच्या धोरणानुसार २००३ पासून मान्यताप्राप्त व जि. प. शाळेतील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जात आहे. विद्यार्थ्यांना पोषक आहार मिळावा आणि मुलांना शाळेत येण्याची ओढ निर्माण व्हावी हा त्यामागचा मूळ उद्देश होता. यानुसार आजपर्यंत शालेय पोषण आहार दिला जातो. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाकाळात पोषण आहारात बदल झाला. शहरी भागातील विद्यार्थ्यांना केवळ तांदूळ दिला जातो. तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मूगदाळ व तांदूळ दिला जात आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील १ ते ८ पर्यंतच्या शाळांची संख्या ३०७१ आहे.

------

कोरोनाकाळात तांदूळ दिला पण...

शहरातील लाभार्थी विद्यार्थ्यांना कोरोनाकाळात शालेय पोषण आहारात केवळ तांदूळ दिले जात होते. यामुळे केवळ तांदूळ बनवून खाणे हे विद्यार्थ्यांना रुचकर लागत नाही. तर ग्रामीण भागातही तूरडाळ मिळत नसल्याने खिचडीची चवच निघून गेली आहे. खिचडीसाठी लागणारे साहित्य मीठ, मिरची पावडर, जिरे, हळद, गोडतेल हे देखील देणे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या घरात ही खिचडी बनलीच नाही.

-------

जिल्ह्यातील पोषण आहार लाभार्थी : ४,४९,९११

शहरी लाभार्थी : १,०६,३००

ग्रामीण लाभार्थी : ३.४२,६११

--------------

कोट :

औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळेत जून २०२० पासून फेब्रुवारी २०२१ पर्यंत तांदूळ व मूगडाळीचा पुरवठा करण्यात आला. तर शहरी भागातील शाळांना केवळ तांदूळ पुरवठा करण्यात आला आहे. येत्या काही दिवसांत कडधान्याचा पुरवठा केला जाईल.

- भाऊसाहेब देशपांडे, शालेय पोषण आहार, लेखाधिकारी जि. प.