शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
4
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
5
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
6
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
7
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
8
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
9
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
10
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
11
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
12
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
13
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
14
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
15
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
16
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
17
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
18
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
19
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
20
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!

अंतर्गत कलहाने काँग्रेसचा घात !

By admin | Updated: July 19, 2014 01:22 IST

संजय जाधव, पैठण पैठण नगर परिषदेत निर्णायक बहुमत असताना काँग्रेस पक्षाच्या उमेदवारास नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले.

संजय जाधव, पैठणपैठण नगर परिषदेत निर्णायक बहुमत असताना काँग्रेस पक्षाच्या उमेदवारास नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. प्रत्येक निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मुस्लिमबहुल भागातून भरीव असे बळ मिळत आले आहे; मात्र काल झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा पराभव होताच न.प.च्या कार्यालयासमोर जमा होऊन याच भागातील नागरिकांनी फटाके वाजवीत विरोधात घोषणा दिल्या. विधानसभेच्या तोंडावर झालेल्या या पराभवाचे आत्मचिंतन काँग्रेसच्या वरिष्ठांनी करणे गरजेचे झाले आहे.पैठण नगर परिषदेत अडीच वर्षांपूर्वी २० पैकी १० नगरसेवक निवडून देत जनतेने सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेसला पसंती दिली. यात मुस्लिमबहुल भागातून १० पैकी ७ नगरसेवक निवडून दिले व उर्वरित शहरातून ३ नगरसेवकांची वर्णी काँग्रेसकडून लागली होती. राष्ट्रवादीच्या पारड्यात जनतेने २ नगरसेवकांचे बळ दिले होते.पैठण नगर परिषदेचे नगराध्यक्षपद हे अनुसूचित जाती, जमातीसाठी राखीव होते; मात्र १० पैकी एकही नगरसेवक या प्रवर्गातील नसल्याने काँग्रेसने राष्ट्रवादी पक्षाकडून निवडून आलेले राजू गायकवाड यांना काँग्रेसमध्ये ओढून त्यांना नगराध्यक्षपदी बसवत मित्रपक्षाला धक्का दिला. वास्तविक पाहता राष्ट्रवादी हा मित्रपक्ष असल्याने अडीच वर्षे राष्ट्रवादी व अडीच वर्षे काँग्रेस अशी वाटाघाटी करूनही काँग्रेस पक्ष आज सत्तेत राहू शकत होता. २ नगरसेवकांपैकी १ नगरसेवक ओढून नेल्याने राष्ट्रवादी न. प.च्या राजकारणात दुखावली व त्याच घटनेचे पडसाद काल झालेल्या निवडणुकीत उमटले, अशी चर्चा शहरभर होत आहे.काँग्रेसने राष्ट्रवादीचा नगरसेवक ओढत त्याला नगराध्यक्ष केले. दोन वेळेस नगराध्यक्षपदी राहिलेले जितसिंग करकोटक यांना उपनगराध्यक्षपद दिले. पैठण शहराध्यक्षपदही जितसिंग करकोटक यांच्याचकडे होते. काँग्रेसच्या १० नगरसेवकांपैकी ५ नगरसेवक मुस्लिम समाजाचे होते. या पैकी एकाला उपनगराध्यक्षपद काँग्रेसने देणे गरजेचे होते, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. येथूनच आपल्याला डावलले जात असल्याची भावना या नगरसेवकांत निर्माण झाली व काल झालेल्या निवडणुकीत नगराध्यक्षपदाची उमेदवारी जितसिंग करकोटक यांना घोषित होताच काँग्रेसच्या नगरसेवकांत अस्वस्थता वाढली. नगरसेवकांत असलेल्या नाराजीस जितसिंग करकोटक दूर करण्यात कमी पडले. यातून १० पैकी ६ नगरसेवकांनी काल झालेल्या निवडणुकीतून अंग काढून घेतल्याने काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. काँग्रेस पक्षाबाबत निर्माण झालेली परिस्थिती व गैरसमज दूर करण्याची जबाबदारी आता वरिष्ठांवर आलेली आहे. असे न झाल्यास आगामी काळात काँग्रेसची पीछेहाट अटळ आहे, असे मानले जात आहे. काँग्रेस पक्षाचा व्हीप न पाळणारे नगरसेवक आजही आम्ही पक्षासोबत आहोत, असे विधान करीत आहेत. या परिस्थितीत काँग्रेसचे वरिष्ठ या नगरसेवकांवर कारवाई करणार की आणखी दुसरी कोणती भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे.