शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
2
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
3
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
4
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
5
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
6
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
7
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
8
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
9
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
10
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
11
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
12
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
13
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
14
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
15
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
16
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
17
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
19
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
20
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती

सहा लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी

By admin | Updated: June 5, 2017 00:27 IST

जालना : जिल्ह्यात यंदा सहा लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी प्रस्तावित आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात यंदा सहा लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी प्रस्तावित आहे. शेतकऱ्यांचे प्रती हेक्टरी उत्पादकता वाढविण्यासाठी ‘उन्नत कृषी समृद्ध शेतकरी’ अभियानांतर्गत कृषी विभागाने विशेष नियोजन केले आहे. शेतकऱ्यांना बि-बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके वेळेत व योग्य दराने उपलब्ध व्हावी, बियाण्यांचा काळाबाजार रोखला जावा यासाठी नऊ भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे.सध्या शेतात नांगरणी, वखरणीसह मशागतीची अन्य कामे सुरू आहेत. मागील वर्षी जिल्ह्यात सहा लाख २६ हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली होती, हे क्षेत्र यंदा २६ हजार हेक्टरने घटण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तवली आहे. यंदा खरिपाच्या एकूण क्षेत्रामध्ये एक लाख ४२ हजार हेक्टरवर सोयाबीन, ८३ हजार हेक्टरवर मका, २९ हजार हेक्टर क्षेत्रावर बाजरीची पेरणी अपेक्षित आहे. एक लाख ६३ हजार हेक्टरवर तूर, मूग, उडीद या कडधान्य पिकांच्या पेरणीचे नियोजन आहे. तर मागील वर्षी दोन लाख ३४ हजार हेक्टरवर असणारे कापसाचे क्षेत्र यंदा २० टक्याने घटण्याची शक्यता आहे. खरीप हंगामात हेक्टरी पीक उत्पादन वाढीसाठी कृषी विभागाने वेगवेळ्या पातळ्यांवर नियोजन केले आहे. जिल्हास्तरावर बियाणे सनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या माध्यमातून कापूस, सोयाबीन व कडधान्य बियाण्यांच्या वितरणावर नियंत्रण ठेवले जाणार आहे. शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध, अप्रमाणित बियाण्यांची व्रिकी होऊ नये याकरिता निरीक्षकांमार्फत बियाण्यांचे नुमने काढण्यात आले आहेत. बि-बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके याचा काळबाजार रोखण्यासाठी प्रत्येक तालुक्यास एक तर जिल्हास्तरावर एक, अशा नऊ पथकांची स्थापना करण्यात आली आहे. कृषी विभागाने उपाययोजना केल्या असून, त्याची अमलबजावणी केली जात आहे.