शहरं
Join us  
Trending Stories
1
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
2
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
3
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
4
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
5
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
6
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
7
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
8
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
9
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
10
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
11
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
12
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
13
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
14
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
15
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
16
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
17
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
18
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
19
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
20
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 

सहा लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी

By admin | Updated: June 5, 2017 00:27 IST

जालना : जिल्ह्यात यंदा सहा लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी प्रस्तावित आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात यंदा सहा लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी प्रस्तावित आहे. शेतकऱ्यांचे प्रती हेक्टरी उत्पादकता वाढविण्यासाठी ‘उन्नत कृषी समृद्ध शेतकरी’ अभियानांतर्गत कृषी विभागाने विशेष नियोजन केले आहे. शेतकऱ्यांना बि-बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके वेळेत व योग्य दराने उपलब्ध व्हावी, बियाण्यांचा काळाबाजार रोखला जावा यासाठी नऊ भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे.सध्या शेतात नांगरणी, वखरणीसह मशागतीची अन्य कामे सुरू आहेत. मागील वर्षी जिल्ह्यात सहा लाख २६ हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली होती, हे क्षेत्र यंदा २६ हजार हेक्टरने घटण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तवली आहे. यंदा खरिपाच्या एकूण क्षेत्रामध्ये एक लाख ४२ हजार हेक्टरवर सोयाबीन, ८३ हजार हेक्टरवर मका, २९ हजार हेक्टर क्षेत्रावर बाजरीची पेरणी अपेक्षित आहे. एक लाख ६३ हजार हेक्टरवर तूर, मूग, उडीद या कडधान्य पिकांच्या पेरणीचे नियोजन आहे. तर मागील वर्षी दोन लाख ३४ हजार हेक्टरवर असणारे कापसाचे क्षेत्र यंदा २० टक्याने घटण्याची शक्यता आहे. खरीप हंगामात हेक्टरी पीक उत्पादन वाढीसाठी कृषी विभागाने वेगवेळ्या पातळ्यांवर नियोजन केले आहे. जिल्हास्तरावर बियाणे सनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या माध्यमातून कापूस, सोयाबीन व कडधान्य बियाण्यांच्या वितरणावर नियंत्रण ठेवले जाणार आहे. शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध, अप्रमाणित बियाण्यांची व्रिकी होऊ नये याकरिता निरीक्षकांमार्फत बियाण्यांचे नुमने काढण्यात आले आहेत. बि-बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके याचा काळबाजार रोखण्यासाठी प्रत्येक तालुक्यास एक तर जिल्हास्तरावर एक, अशा नऊ पथकांची स्थापना करण्यात आली आहे. कृषी विभागाने उपाययोजना केल्या असून, त्याची अमलबजावणी केली जात आहे.