शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
3
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
4
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
5
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
6
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
7
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
8
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
9
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
10
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
11
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
12
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
13
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
14
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
15
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
16
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
17
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
18
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
19
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
20
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य

खरिपाची उत्पादकता घटणार

By admin | Updated: August 30, 2014 00:01 IST

यंदा अत्यल्प पावसामुळे खरिपाच्या उत्पादकतेत मोठी घट होण्याची चिन्हे आहेत.

नांदेड: मागील तीन वर्षांत पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावल्याने कृषी विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या पीककापणी प्रयोगावरुन जिल्ह्यातील कपाशी व सोयाबीनच्या उत्पादकतेत दुपटीने वाढ झाली होती, परंतु यंदा अत्यल्प पावसामुळे खरिपाच्या उत्पादकतेत मोठी घट होण्याची चिन्हे आहेत. दरवर्षी कृषी विभागाच्या वतीने महसूल मंडळ स्तरावर काही गावांची निवड करुन तालुकानिहाय, पीकनिहाय पीककापणी प्रयोग घेतले जातात. यावरुन पिकांचे हेक्टरी उत्पादन वाढले का कमी झाले हे स्पष्ट होते. कृषी कार्यालयाने २००९-१० मध्ये घेण्यात आलेल्या पीककापणी प्रयोगावरुन कपाशीचे हेक्टरी उत्पन्न ५ क्विंटल २७ किलो एवढे निघाले, तर सोयाबीनचे ४ क्विंटल ३७ किलो ऐवढे आले होते. यानंतर २०११-१२ मध्ये घेण्यात आलेल्या पीककापणी प्रयोगात कपाशीच्या हेक्टरी क्षेत्रात तीन क्विंटलने वाढ होवून ८ क्विंटल ५७ किलोवर पोहोचले. तर सोयाबीनचे उत्पन्न दुपटीने वाढून १२ क्विंटल ५४ किलोवर पोहोचले. यानंतर २०१२-१३ या वर्षात अल्पश: पावसामुळे सोयाबीन, कपाशीच्या उत्पन्नात मोठी घट झाल्याचे शेतकरी म्हटले तरी कृषी विभागाने घेतलेल्या पिक कापणी प्रयोगावरुन कपाशीचे सरासरी हेक्टरी उत्पन्न ९ क्विंटल ४६ किलो झाले आहे. तसेच सोयाबीनचे उत्पन्न १५ क्विंटल ४४ किलो निघाल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे वरील आकडेवारीवरुन गेल्या तीन वर्षांत सोयाबीन, कपाशीच्या उत्पादकतेत सरासरी दुपटीने वाढ झाल्याचे दिसते.यंदा कापूस, सोयाबीनसह अन्य सर्वच पिकांच्या उत्पादनात मोठी घट होणार असल्याने उत्पादकताही निम्यावर येईल, की नाही हे सांगणे कठीण आहे. (प्रतिनिधी)