शहरं
Join us  
Trending Stories
1
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
2
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...
3
Pune: पुणे रेल्वे स्थानकाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, तरुणाला अटक!
4
अलिबागजवळ अरबी समुद्रात संशयित बोट; पोलिसांनी बोटीकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण...
5
पगार आला की गायब होतोय? महिन्याच्या शेवटी खिसा रिकामा राहतोय? या सवयींनी व्हाल श्रीमंत
6
Viral Video : असं कोण करतं रे... भर मांडवात नवरदेवाला आडवा पाडला; एवढा गदारोळ कशासाठी? बघाच 
7
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
8
IND vs ENG 2nd Test: भारताच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय कुणाला? विराट कोहली म्हणाला...
9
"माझी बहीण १६ वर्षांनी लहान आहे, पण मी तिचं..." रश्मिका मंदानाने व्यक्त केली खंत
10
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
11
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
12
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
13
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख
14
"मराठी बोलत नाही, दम असेल तर...", भोजपुरी अभिनेत्याचं थेट राज ठाकरेंना चॅलेंज
15
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
16
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
17
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
18
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
19
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
20
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...

खरिपाची उत्पादकता घटणार

By admin | Updated: August 30, 2014 00:01 IST

यंदा अत्यल्प पावसामुळे खरिपाच्या उत्पादकतेत मोठी घट होण्याची चिन्हे आहेत.

नांदेड: मागील तीन वर्षांत पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावल्याने कृषी विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या पीककापणी प्रयोगावरुन जिल्ह्यातील कपाशी व सोयाबीनच्या उत्पादकतेत दुपटीने वाढ झाली होती, परंतु यंदा अत्यल्प पावसामुळे खरिपाच्या उत्पादकतेत मोठी घट होण्याची चिन्हे आहेत. दरवर्षी कृषी विभागाच्या वतीने महसूल मंडळ स्तरावर काही गावांची निवड करुन तालुकानिहाय, पीकनिहाय पीककापणी प्रयोग घेतले जातात. यावरुन पिकांचे हेक्टरी उत्पादन वाढले का कमी झाले हे स्पष्ट होते. कृषी कार्यालयाने २००९-१० मध्ये घेण्यात आलेल्या पीककापणी प्रयोगावरुन कपाशीचे हेक्टरी उत्पन्न ५ क्विंटल २७ किलो एवढे निघाले, तर सोयाबीनचे ४ क्विंटल ३७ किलो ऐवढे आले होते. यानंतर २०११-१२ मध्ये घेण्यात आलेल्या पीककापणी प्रयोगात कपाशीच्या हेक्टरी क्षेत्रात तीन क्विंटलने वाढ होवून ८ क्विंटल ५७ किलोवर पोहोचले. तर सोयाबीनचे उत्पन्न दुपटीने वाढून १२ क्विंटल ५४ किलोवर पोहोचले. यानंतर २०१२-१३ या वर्षात अल्पश: पावसामुळे सोयाबीन, कपाशीच्या उत्पन्नात मोठी घट झाल्याचे शेतकरी म्हटले तरी कृषी विभागाने घेतलेल्या पिक कापणी प्रयोगावरुन कपाशीचे सरासरी हेक्टरी उत्पन्न ९ क्विंटल ४६ किलो झाले आहे. तसेच सोयाबीनचे उत्पन्न १५ क्विंटल ४४ किलो निघाल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे वरील आकडेवारीवरुन गेल्या तीन वर्षांत सोयाबीन, कपाशीच्या उत्पादकतेत सरासरी दुपटीने वाढ झाल्याचे दिसते.यंदा कापूस, सोयाबीनसह अन्य सर्वच पिकांच्या उत्पादनात मोठी घट होणार असल्याने उत्पादकताही निम्यावर येईल, की नाही हे सांगणे कठीण आहे. (प्रतिनिधी)