शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
3
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
4
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
5
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
6
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
7
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
8
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
9
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
10
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
11
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
12
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
13
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
14
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
15
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
16
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
17
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
18
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
19
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
20
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

मराठवाड्यात खरिपाचे नियोजन एप्रिलमध्येच

By admin | Updated: April 15, 2016 01:49 IST

औरंगाबाद : मराठवाड्यात खरीप हंगामाच्या आढावा बैठका २० एप्रिलपूर्वीच घेण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत

औरंगाबाद : मराठवाड्यात खरीप हंगामाच्या आढावा बैठका २० एप्रिलपूर्वीच घेण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. विभागात दोन पिकांमध्ये कडधान्ये घेण्यासाठी शेतकऱ्यांची मानसिकता तयार करण्यावर भर द्यावा, असे विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी विभागातील अधिकाऱ्यांना सांगितले आहे. दांगट यांनी बुधवारी मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच कृषी अधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यापूर्वी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत मे महिन्यात खरीप आढावा बैठक घेण्यात येत होती. मात्र, यावेळी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर एक महिना अगोदरच ही बैठक होणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकत्रित आढावा घेतील. आंतरपिकांची शेती करा मराठवाड्यात एकूण क्षेत्रापैकी एकतृतीयांश क्षेत्रावर कापूस, एकतृतीयांश क्षेत्रावर सोयाबीन, तसेच इतर कडधान्ये घेण्यात येतात. तर उर्वरित क्षेत्रावर ज्वारी, मका, बाजरी, गहू, यासह इतर पिके घेतली जातात. या पार्श्वभूमीवर या बैठकीत दांगट यांनी आंतरपीक घेण्याच्या सूचना दिल्या. तुरीसोबत सोयाबीन, कापसासोबत मूग, उडीद घेण्यास शेतकऱ्यांना सांगावे असे ते म्हणाले. तसेच ज्यांच्याकडे पाणी आहे, त्यांनी उसाऐवजी ठिबकचा वापर करून तुरीचे, कापसाचे उत्पादन घ्यावे, असा पर्यायही सुचविला आहे, तसेच कृषी सहायकाच्या अंतर्गत दहा हेक्टरपर्यंत फलोत्पादन करण्यात यावे आणि त्यातही कोरडवाहू फळपिके असणाऱ्या बोर, सीताफळ,आंबा तसेच डाळिंबाला प्राधान्य देण्यात यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. मार्केटिंगला प्राधान्य द्या अ‍ॅग्रो प्रोसेसिंग तसेच मार्केटिंगच्या कंपन्या स्थापन करण्यासाठी पुढाकार घेण्याच्या सूचना यावेळी दांगट यांनी अधिकाऱ्यांना केल्या. यासाठी एकाच भागात एक पीक घेतल्यास त्याचे मार्केटिंग करणे सोपे होते. त्यामुळे केवळ उत्पादन वाढविण्यावर भर देण्यासोबत शेतकऱ्यांच्या मालाला भाव कसा मिळेल, यासाठीदेखील प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मराठवाड्यातदेखील मोठ्या प्रमाणात झाडे लावण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.