शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
3
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
4
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
5
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
6
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
7
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
8
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
9
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
10
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
11
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
12
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
13
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
14
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
15
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

खरिपाचा पेरा वाढणार

By admin | Updated: June 8, 2017 00:30 IST

नांदेड: जिल्ह्यात यंदा खरिपाचा पेरा वाढण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: जिल्ह्यात यंदा खरिपाचा पेरा वाढण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे़ त्यात रोहिण्या चांगल्या बरसल्याने शेतकरी आनंदीत झाला असून खरिपाच्या पेरणीची अंतिम लगबग सुरू असून आता बी-बियाणे खरेदीची तयारी केली जात आहे़जिल्ह्याचे १० लाख ३३ हजार १०० हेक्टर भौगोलिक क्षेत्र आहे़ त्यातील ७ लाख ७३ हजार ८०० हेक्टर क्षेत्र हे लागवडीखाली येते़ त्यामध्ये खरीपाच्या ७ लाख ५४ हजार ६६१ तर रबीच्या १ लाख ३६ हजार हेक्टरचा समावेश आहे़ जिल्ह्यात सर्वसाधारणपणे ज्वारी, तूर, सोयाबीन, कापूस ही प्रमुख पिके आहेत़ सर्वाधिक पेरा हा खरीप हंगामात होतो़ गतवर्षी ७ लाख ६९ हजार २५० हेक्टर क्षेत्रात खरीप पिकांचा पेरा झाला होता़ यात यंदा वाढ होण्याची शक्यता आहे़ त्यात सर्वाधिक पेरा हा सोयाबीनचा अपेक्षित आहे़ जिल्ह्यातील २ लाख ८३ हजार हेक्टर क्षेत्रात सोयाबीन, २ लाख ६५ हजार हेक्टर क्षेत्रात कापूस, ७८ हजार हेक्टर क्षेत्रात तूर तसेच ७६ हजार ५७५ हेक्टर क्षेत्रात इतर पिकांची लागवड होणे अपेक्षित आहे़ कापसासाठी १३ लाख २५ हजार बीटी कापूस बियाणांच्या पाकिटांची गरज भासणार आहे़ तर नॉन बीटी बियाणांचे २५ हजार पाकिटे आवश्यक आहेत़ जिल्ह्यात खरीप पिकासाठी इतर कंपन्यांच्या बियाणांचीही उपलब्धता होणार आहे़ त्याची संख्या ही १३ लाख १५ हजार इतकी आहे़ अजित वाणाचे २ लाख ५० हजार, राशीचे २ लाख ५० हजार, न्यूजिविडूचे १ लाख ५० हजार, कावेरीचे १ लाख ५० हजार, अंकूरचे एक लाख तसेच इतर कंपन्यांचे १ लाख ६५ हजार बियाणांची पाकिटे शेतकऱ्यांसाठी उपलब्ध राहणार आहेत़ अन्य पिकांसाठी महाबीजनेही बियाणे उपलब्ध करून दिले आहेत़ ज्वारी, तूर, मूग, उडीद व सोयाबीन या प्रमुख पिकांसाठी महाबीजचे ५५ हजार क्विंटल तर खाजगी बियाणांचे प्रमाण हे ४४ हजार ५० क्विंटल इतके राहणार आहे़ खतासाठीही कृषी विभागाने नियोजन केले असून मागणीपेक्षा जास्त खते उपलब्ध होणार आहेत़ रबी पिकासाठी मागवलेले ७८ हजार ५०० क्विंटल खते शिल्लक आहेत़ तर २०१७ साठीही २ लाख ८५ हजार ७०० मेट्रिक टन खत उपलब्ध होणार आहे़