शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
6
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
7
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
8
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
9
हृदयविकाराच्या झटक्याने प्रसिद्ध मराठी अभिनेता-दिग्दर्शकाचं निधन; ४२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
12
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
13
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
14
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
15
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
16
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
17
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
18
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
19
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
20
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

खरिपाच्या पेरण्या केवळ २२ टक्के

By admin | Updated: July 20, 2014 00:25 IST

सेनगाव : तालुक्यात वरुणराजाने पावसाळ्याच्या प्रारंभीपासूनच दडी मारल्याने गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची भीती आहे.

सेनगाव : तालुक्यात वरुणराजाने पावसाळ्याच्या प्रारंभीपासूनच दडी मारल्याने गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची भीती आहे. २० जुलैैपर्यंत दमदार पाऊस झाला नाही तर सोयाबीन, कापूस पेरणीची निर्धारित वेळही हातची जाण्याची शक्यता आहे. अत्यल्प पावसावर केवळ २२ टक्के पेरण्या झाल्याची कृषी विभागाची माहिती आहे.तालुक्यातील सर्वच भागात पावसाने दडी मारली आहे. १५ जुलैैपर्यंत केवळ ५६ मि.मी. पाऊस झाला असून सर्वसामान्यपणे ७५ मि.मी. पावसाच्या पुढे पेरणी करणे गरजेचे आहे; परंतु तालुक्यातील सवना, गोरेगाव, ताकतोडा, धनगरवाडी, पळशी, आजेगाव, पुसेगाव, पार्डी पोहकर, वरुड समद, आडोळ या भागातील शेतकऱ्यांनी अत्यल्प पावसावरच पेरणी केली आहे. तर सेनगाव, पानकनेरगाव, कवठा, जयपूर, कोळसा, वरुड चक्रपान, हत्ता, साखरा, कापडसिंगी, येलदरी, ब्रम्हवाडी या भागात भीजपावसाव्यतिरिक्त एकही दमदार पाऊस झाला नसल्याने संपूर्ण पेरण्या रखडल्या आहेत. तालुक्यात कृषी विभागाच्या माहितीनुसार केवळ २२ टक्के पेरण्या झाल्या आहेत. तालुक्यात ८९ हजार हेक्टर लागवडीयोग्य क्षेत्र असून प्रामुख्याने सोयाबीन, कापूस या पिकांना शेतकऱ्यांची पसंती आहे. या दोन्ही पिकांचा पेरणी हंगामाचा अवधी जास्तीत जास्त २० जुलैैपर्यंत असल्याची माहिती कृषी विभागाचे अधिकारी देत आहेत. २० जुलैै उजाडला तरी तालुक्यात एकही पेरणीयोग्य पाऊस झाला नसल्याने सोयाबीन, कापूस पेरणी करता येईल का? या संकटात शेतकरी सापडला आहे. चाऱ्याचा प्रश्न तीव्र झाला असून शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. जुलैै महिना संपत आला असून पेरणी झाली नसल्याने संपूर्ण शेत शिवार ओसाड दिसत आहे. (वार्ताहर)शेतशिवार ओसाडसेनगाव तालुक्यातील सर्वच भागात पावसाने दडी मारली आहे. १५ जुलैैपर्यंत केवळ ५६ मि.मी. पाऊस झाला असून पेरणीसाठी सर्वसामान्यपणे ७५ मि.मी. पावसाची आवश्यकता असते. पेरणीयोग्य पावसाची अजूनही प्रतीक्षा सुरूच असल्याने शेतीकामे रखडली आहेत. सवना, गोरेगाव, ताकतोडा, धनगरवाडी, पळशी, आजेगाव, पुसेगाव, पार्डी पोहकर, वरुड समद, आडोळ या भागातील शेतकऱ्यांनी जोखीम घेत अत्यल्प पावसावरच पेरणी केली आहे.तर सेनगाव, पानकनेरगाव, कवठा, जयपूर, कोळसा, वरुड चक्रपान, हत्ता, साखरा, कापडसिंगी, येलदरी, ब्रम्हवाडी या भागात भीज पावसाव्यतिरिक्त एकदाही दमदार पाऊस झालेला नाही. कृषी विभागाच्या माहितीनुसार तालुक्यात केवळ २२ टक्के पेरण्या झाल्या आहेत. तालुक्यात ८९ हजार हेक्टर लागवडयोग्य क्षेत्र असून प्रामुख्याने सोयाबीन, कापूस या पिकांना शेतकऱ्यांची पसंती आहे.