शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
3
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
4
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
5
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
6
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
7
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
8
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
9
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
10
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
11
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
12
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
13
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
14
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
15
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
16
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
17
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
18
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
19
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
20
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस

खरीप हंगामासाठी जिल्ह्यात यंदा खत, बियाणे मुबलक

By admin | Updated: May 14, 2014 00:28 IST

औरंगाबाद : खरीप हंगामासाठी जिल्ह्यास खत आणि बियाणांचा मुबलक साठा मंजूर झाला असल्यामुळे यंदा जिल्ह्यात खत आणि बियाणांची टंचाई भासणार नाही.

औरंगाबाद : खरीप हंगामासाठी जिल्ह्यास खत आणि बियाणांचा मुबलक साठा मंजूर झाला असल्यामुळे यंदा जिल्ह्यात खत आणि बियाणांची टंचाई भासणार नाही. तसेच शेतकर्‍यांना यंदा बांधावर खत देण्याची तयारी करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी दिली. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर विक्रमकुमार यांनी आज कृषी विभागाच्या तयारीची माहिती पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक पंडित लोणारे आणि जिल्हा कृषी विकास अधिकारी सीताराम कोलते उपस्थित होते. औरंगाबाद जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात ७ लाख १८ हजार हेक्टरवर पेरणी होण्याची शक्यता आहे. यामध्ये सर्वाधिक ४ लाख २५ हजार हेक्टरवर कापूस असेल. यंदा जिल्ह्यात कपाशीच्या बीटी वाणांच्या २१ लाख ७५ हजार पाकिटांची मागणी नोंदविण्यात आली होती. त्या तुलनेत २१ लाख ११ हजार पाकिटे मंजूर झाली आहेत. आतापर्यंत यातील साडेतीन लाख पाकिटे प्राप्तही झाली आहेत, असे विक्रमकुमार म्हणाले. खतांच्या बाबतीतही समाधानकारक परिस्थिती आहे. गेल्यावर्षी खरीप हंगामात जिल्ह्यात १ लाख ८६ हजार मेट्रिक टन खत लागले होते. या वर्षी २ लाख ३७ हजार मेट्रिक टन खत मंजूर झाले आहे. त्यापैकी आतापर्यंत ५४ हजार मेट्रिक टन खत मिळाले आहे. त्यामुळे यंदा जिल्ह्यात कुठेही खत आणि बियाणांची टंचाई भासणार नाही. खत आणि कपाशीच्या बियाणांचा काळाबाजार होऊ नये यासाठीही उपाययोजना करण्यात आल्या आहेत. कृषी विभागाने भरारी पथके स्थापन केली आहेत. शिवाय याबाबतच्या तक्रारींसाठी हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. सोयाबीनच्या बियाणांची टंचाई भासेल, असे प्रारंभी वाटले होते. मात्र, आता ही टंचाईसुद्धा भासणार नाही. जिल्ह्यात १० हजार क्विंटल बियाणे लागणार होते. तेवढे बियाणे मिळाले आहे. यंदाही शेतकरी गटांना बांधावर खत देण्याची तयारी करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी गटांनी आपली मागणी तालुका कृषी अधिकार्‍यांकडे नोंदवावी, असे आवाहनही जिल्हाधिकार्‍यांनी केले.