शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
3
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
4
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
5
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
6
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
7
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
8
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
9
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
10
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
11
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
12
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
13
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
14
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
15
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
16
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
17
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
18
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
19
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
20
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
Daily Top 2Weekly Top 5

खरीप हंगामासाठी जिल्ह्यात यंदा खत, बियाणे मुबलक

By admin | Updated: May 14, 2014 00:28 IST

औरंगाबाद : खरीप हंगामासाठी जिल्ह्यास खत आणि बियाणांचा मुबलक साठा मंजूर झाला असल्यामुळे यंदा जिल्ह्यात खत आणि बियाणांची टंचाई भासणार नाही.

औरंगाबाद : खरीप हंगामासाठी जिल्ह्यास खत आणि बियाणांचा मुबलक साठा मंजूर झाला असल्यामुळे यंदा जिल्ह्यात खत आणि बियाणांची टंचाई भासणार नाही. तसेच शेतकर्‍यांना यंदा बांधावर खत देण्याची तयारी करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी दिली. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर विक्रमकुमार यांनी आज कृषी विभागाच्या तयारीची माहिती पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक पंडित लोणारे आणि जिल्हा कृषी विकास अधिकारी सीताराम कोलते उपस्थित होते. औरंगाबाद जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात ७ लाख १८ हजार हेक्टरवर पेरणी होण्याची शक्यता आहे. यामध्ये सर्वाधिक ४ लाख २५ हजार हेक्टरवर कापूस असेल. यंदा जिल्ह्यात कपाशीच्या बीटी वाणांच्या २१ लाख ७५ हजार पाकिटांची मागणी नोंदविण्यात आली होती. त्या तुलनेत २१ लाख ११ हजार पाकिटे मंजूर झाली आहेत. आतापर्यंत यातील साडेतीन लाख पाकिटे प्राप्तही झाली आहेत, असे विक्रमकुमार म्हणाले. खतांच्या बाबतीतही समाधानकारक परिस्थिती आहे. गेल्यावर्षी खरीप हंगामात जिल्ह्यात १ लाख ८६ हजार मेट्रिक टन खत लागले होते. या वर्षी २ लाख ३७ हजार मेट्रिक टन खत मंजूर झाले आहे. त्यापैकी आतापर्यंत ५४ हजार मेट्रिक टन खत मिळाले आहे. त्यामुळे यंदा जिल्ह्यात कुठेही खत आणि बियाणांची टंचाई भासणार नाही. खत आणि कपाशीच्या बियाणांचा काळाबाजार होऊ नये यासाठीही उपाययोजना करण्यात आल्या आहेत. कृषी विभागाने भरारी पथके स्थापन केली आहेत. शिवाय याबाबतच्या तक्रारींसाठी हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. सोयाबीनच्या बियाणांची टंचाई भासेल, असे प्रारंभी वाटले होते. मात्र, आता ही टंचाईसुद्धा भासणार नाही. जिल्ह्यात १० हजार क्विंटल बियाणे लागणार होते. तेवढे बियाणे मिळाले आहे. यंदाही शेतकरी गटांना बांधावर खत देण्याची तयारी करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी गटांनी आपली मागणी तालुका कृषी अधिकार्‍यांकडे नोंदवावी, असे आवाहनही जिल्हाधिकार्‍यांनी केले.