शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
4
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
5
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
6
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
7
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
8
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
9
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
10
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
11
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
12
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
13
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
14
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
15
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
16
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
17
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
18
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
19
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
20
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य

खरीप हंगामासाठी जिल्ह्यात यंदा खत, बियाणे मुबलक

By admin | Updated: May 14, 2014 00:28 IST

औरंगाबाद : खरीप हंगामासाठी जिल्ह्यास खत आणि बियाणांचा मुबलक साठा मंजूर झाला असल्यामुळे यंदा जिल्ह्यात खत आणि बियाणांची टंचाई भासणार नाही.

औरंगाबाद : खरीप हंगामासाठी जिल्ह्यास खत आणि बियाणांचा मुबलक साठा मंजूर झाला असल्यामुळे यंदा जिल्ह्यात खत आणि बियाणांची टंचाई भासणार नाही. तसेच शेतकर्‍यांना यंदा बांधावर खत देण्याची तयारी करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी दिली. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर विक्रमकुमार यांनी आज कृषी विभागाच्या तयारीची माहिती पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक पंडित लोणारे आणि जिल्हा कृषी विकास अधिकारी सीताराम कोलते उपस्थित होते. औरंगाबाद जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात ७ लाख १८ हजार हेक्टरवर पेरणी होण्याची शक्यता आहे. यामध्ये सर्वाधिक ४ लाख २५ हजार हेक्टरवर कापूस असेल. यंदा जिल्ह्यात कपाशीच्या बीटी वाणांच्या २१ लाख ७५ हजार पाकिटांची मागणी नोंदविण्यात आली होती. त्या तुलनेत २१ लाख ११ हजार पाकिटे मंजूर झाली आहेत. आतापर्यंत यातील साडेतीन लाख पाकिटे प्राप्तही झाली आहेत, असे विक्रमकुमार म्हणाले. खतांच्या बाबतीतही समाधानकारक परिस्थिती आहे. गेल्यावर्षी खरीप हंगामात जिल्ह्यात १ लाख ८६ हजार मेट्रिक टन खत लागले होते. या वर्षी २ लाख ३७ हजार मेट्रिक टन खत मंजूर झाले आहे. त्यापैकी आतापर्यंत ५४ हजार मेट्रिक टन खत मिळाले आहे. त्यामुळे यंदा जिल्ह्यात कुठेही खत आणि बियाणांची टंचाई भासणार नाही. खत आणि कपाशीच्या बियाणांचा काळाबाजार होऊ नये यासाठीही उपाययोजना करण्यात आल्या आहेत. कृषी विभागाने भरारी पथके स्थापन केली आहेत. शिवाय याबाबतच्या तक्रारींसाठी हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. सोयाबीनच्या बियाणांची टंचाई भासेल, असे प्रारंभी वाटले होते. मात्र, आता ही टंचाईसुद्धा भासणार नाही. जिल्ह्यात १० हजार क्विंटल बियाणे लागणार होते. तेवढे बियाणे मिळाले आहे. यंदाही शेतकरी गटांना बांधावर खत देण्याची तयारी करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी गटांनी आपली मागणी तालुका कृषी अधिकार्‍यांकडे नोंदवावी, असे आवाहनही जिल्हाधिकार्‍यांनी केले.