शहरं
Join us  
Trending Stories
1
Revanth Reddy : "राहुल गांधी पंतप्रधान असते तर त्यांनी PoK परत आणला असता"; रेवंत रेड्डी यांचा मोदींवर निशाणा
2
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
3
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
4
लोन मिळवून देण्याच्या नावावर सर्वाधिक लोकांना लागलाय चुना, गमावलेत ₹३३,१४८ कोटी
5
"अकाऊंट हॅक झालेलं तर गप्प का बसलात?" सुदेश म्हशिलकरांच्या स्पष्टीकरणानंतर प्राचीचा सवाल, म्हणाली...
6
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
7
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
8
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
9
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
10
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
11
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
12
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
13
युद्धविराममध्ये कधीही व्यापाराचा उल्लेख नव्हता; भारताने ट्रम्प यांच्या टॅरिफ दाव्यांना पुन्हा एकदा नाकारले
14
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
15
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
16
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
17
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
18
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश
19
Covid-19 च्या डेल्टा व्हेरिएंटमुळे सायलेंट हॉर्ट अटॅक वाढले, आयआयटी इंदूरच्या अहवालात खुलासा

खरीप हंगाम आला धोक्यात

By admin | Updated: August 14, 2014 02:08 IST

सेलू : वरूणराजाने दांडी मारल्यामुळे खरीप हंगामातील सर्वच पिके धोक्यात सापडली असून मुगाचे शंभर टक्के नुकसान झाल्यात जमा आहे़

सेलू : वरूणराजाने दांडी मारल्यामुळे खरीप हंगामातील सर्वच पिके धोक्यात सापडली असून मुगाचे शंभर टक्के नुकसान झाल्यात जमा आहे़ तर पावसाअभावी इतर पिकेही सुकू लागली आहेत़ पावसाळयाचे दोन महिने संपले तरीही समाधानकारक पाऊस झालेला नाही़ अल्पश: पावसावर शेतकऱ्यांनी खरीपाची पेरणी केली़; परंतु, पावसाने प्रदीर्घ विश्रांती घेतल्यामुळे कापूस, तुर, सोयाबीन ही पिके धोक्यात आली आहेत. तर कडक उन्हामुळे खरीपाची पिके सुकू लागली आहेत़ सेलू तालुक्यात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र आहे़ जवळपास तीस हजार हेक्टरवर कापसाची लागवड करण्यात आली आहे़ बारा हजार हे़वर सोयाबीन, तुर ६ हजार ५०० हे़ व मुगाचे ८ हजार ५०० हे़ क्षेत्र आहे़ आजपर्यंत केवळ १५० मि़मी़ पाऊस झाला आहे़ जून महिन्यात झालेल्या अल्पश: पावसावर शेतकऱ्यांनी पिकाची पेरणी केल्याने वाढ खुंटली आहे़ तर मूग, उडीद या पिकांवर पाऊस नसल्यामुळे सर्वाधिक परिणाम झाला आहे़ कापूस वाढीच्या अवस्थेत असतांना पाऊस नसल्यामुळे झाडांची वाढ खुंटली आहे़ त्यामुळे कापसाच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे़ श्रावण महिन्यात येणाऱ्या सणावर तसेच गणेशोत्सव, महालक्ष्मी, पोळा हे सण साजरे करण्यासाठी मुग विकून आर्थिक घडी बसविण्याचा शेतकरी प्रयत्न करतात़ परंतू पावसाअभावी मुगाचे पीक गेल्यामुळे या सणांवर दुष्काळाचे सावट घोंगावत आहे़ वळवाचा पाऊस झाला नाही़ त्यामुळे जमिनीचे तापमान वाढल्याने कापसांच्या पिकांवर परिणाम झाला आहे़ दरम्यान, शेतात पिके सुकत असल्यामुळे शिवार उजाड झाले आहे़ पावसाळयाचे दिवस असतांनाही नदी, नाले कोरडेठाक असल्यामुळे पाणीपातळी खालावत चालल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे़ (प्रतिनिधी)