शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

खाम नदी पात्रातील १२ घरे पाडली

By admin | Updated: May 13, 2016 00:09 IST

औरंगाबाद : खाम नदीपात्रातील अतिक्रमणे हटविण्याची मोहीम दुसऱ्या दिवशीही सुरूच होती. गुरुवारी १२ घरे पाडण्यात आली. जहांगीर कॉलनी, चाऊस कॉलनी, एकतानगर भागात कारवाई करण्यात आली.

औरंगाबाद : खाम नदीपात्रातील अतिक्रमणे हटविण्याची मोहीम दुसऱ्या दिवशीही सुरूच होती. गुरुवारी १२ घरे पाडण्यात आली. जहांगीर कॉलनी, चाऊस कॉलनी, एकतानगर भागात कारवाई करण्यात आली. यावेळी एमआयएमचे नगरसेवक अय्युब खान यांनी उपायुक्त रवींद्र निकम यांच्यासोबत वाद घालून कारवाईला विरोध केला. खाम नदीपात्रातील ३० मीटरपर्यंतची अतिक्रमणे हटविण्यासाठी काल बुधवारपासून मनपा प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. जहांगीर कॉलनी भागातील ५५ मालमत्ता काल जमीनदोस्त करण्यात आल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर गुरुवारी सकाळी १० वाजेपासून प्रशासनाने उर्वरित अतिक्रमणांवर कारवाई सुरू केली. जहांगीर कॉलनी परिसरात असलेली किरकोळ अतिक्रमणे हटविल्यानंतर मोहीम चाऊस कॉलनी भागात पोहोचली. दुपारी पक्क्या घरांचे बांधकाम तोडण्यात येत असताना एमआयएमचे नगरसेवक अय्युब खान तेथे पोहोचले. डी. एड. कॉलेजची संरक्षक भिंत, शौचालये हटविण्यास त्यांनी विरोध केला. उपायुक्त रवींद्र निकम यांनी कारवाईला विरोध करू नका, असे आवाहन केले. मात्र अय्युब यांनी मोहीम बंद पाडण्याचा प्रयत्न केला. अय्युब खान यांच्या विरोधानंतर एमआयएमचे आ. इम्तियाज जलील चाऊस कॉलनीत आले. त्यांनी रवींद्र निकम यांची भेट घेऊन कारवाईला आमचा विरोध नाही, मात्र ज्या नागरिकांचे शंभर टक्के घरे जात आहेत, त्यांचे पुनर्वसन करा, अशा सूचना आमदार जलील यांनी केल्या.