शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
4
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
5
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
6
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
7
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
9
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
10
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
11
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
12
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
13
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
14
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
16
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
17
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
18
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
19
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
20
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?

खैरेंनी दुस-यांच्या नावे शेंगा खाऊ नयेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 01:30 IST

शहराचे ‘औरंगाबाद ऐवजी संभाजीनगर’ असे नामकरण करण्यावरून शिवसेनेतच जुंपली आहे. खा.चंद्रकांत खैैरेंनी दुसºयांच्या नावे शेंगा खाण्यापेक्षा स्वत: काय करतात ते पाहावे. शिवसेनेचे सर्व मंत्री नालायक आणि ते एकटेच लायक आहेत, असा टोला पालकमंत्री तथा शिवसेना मराठवाडा नेते रामदास कदम यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना लगावला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहराचे ‘औरंगाबाद ऐवजी संभाजीनगर’ असे नामकरण करण्यावरून शिवसेनेतच जुंपली आहे. खा.चंद्रकांत खैैरेंनी दुसºयांच्या नावे शेंगा खाण्यापेक्षा स्वत: काय करतात ते पाहावे. शिवसेनेचे सर्व मंत्री नालायक आणि ते एकटेच लायक आहेत, असा टोला पालकमंत्री तथा शिवसेना मराठवाडा नेते रामदास कदम यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना लगावला.दोन दिवसांपूर्वी खा.चंद्रकांत खैरे यांनी पालकमंत्री रामदास कदम यांच्यासह शिवसेनेतील सर्व मंत्र्यांवर शहराचे नाव संभाजीनगर करण्याप्रकरणी खापर फोडले होते.   पालकमंत्र्यांचा दौरा गुप्तपालकमंत्री रामदास कदम यांचा दौरा गुप्त होता. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत कदम शहरात येऊन गेले हे खैरेंच्या निकटवर्तीयांना माहितीही नव्हते. त्यामुळे पालकमंत्री कदम काय बोलले याची माहिती खैरे गटांकडून घेण्यात येत होती.नामांतरासाठी शिवसेनेची निदर्शनेऔरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेने रविवारी सकाळी टी. व्ही. सेंटर हडको येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर निदर्शने केली. महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर खा. चंद्रकांत खैरे, जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, जि. प. अध्यक्षा देवयानी डोणगावकर, नगरसेवक राजू वैद्य, सचिन खैरे, बाळासाहेब थोरात, विजय वाघचौरे यांच्यासह महिला आघाडीच्या पदाधिकाºयांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. या निदर्शनाला जिल्हाप्रमुख अंबादास दानवे हे गैरहजर होते.४‘संभाजीनगर हवे की औरंगाबाद’ या शिवसेनाप्रमुखांनी केलेल्या घोषणेला मे २०१८ मध्ये ३० वर्षे पूर्ण होतील. दरम्यान १९९५ ते १९९९ हे साडेचार वर्षे राज्यात, १९९९ ते २००४ हे पाच वर्षे केंद्रात आणि मागील तीन वर्षांपासून केंद्रात व राज्यात शिवसेना सत्तेत आहे. आजवर ३० पैकी साडेबारा वर्षे सेना सत्तेत असतानाही नामकरणाचा मुद्दा राजकीय मुद्दा बनूनच राहिला. दरम्यान सोशल मीडियावर शिवसेनेच्या या भूमिकेवरून जोरदार मॅसेजवॉर सुरू झाले आहे. याचा फटका कुणाला बसतो हे आगामी काळात पाहणे लक्षणीय राहील.शिवसेना हिंदुत्ववादीकुठे राहिलीशिवसेनाप्रमुखांच्या विचाराशी निगडित हिंदुत्ववादी शिवसेना आता राहिली नसल्याचा आरोप भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड यांनी केला. डॉ. कराड म्हणाले, जर हिंदुवाद कायम असता, तर जि.प. निवडणुकीत भाजपबरोबर सेनेने युती केली असती. फुलंब्रीत पक्षचिन्ह,भगवे उपरणे बाजूला ठेवून काँग्रेसच्या व्यासपीठावर जाऊन शिवसेना नेत्यांनी प्रचार केला. लोकसभा निवडणुका जशा जवळ येतील, त्यानुसार शिवसेना ‘संभाजीनगर’ नामकरणाचा मुद्दा उकरून काढते. १९९९ ला शिवसेनाप्रमुखांनी फक्त काँग्रेसचा महापौर होऊ नये, म्हणून सेनेचे नगरसेवक जास्त असताना हिंदुत्वासाठी महापौरपदी माझी वर्णी लावली होती. आताची शिवसेना तसा निर्णय घेणे शक्य नसल्याचे अलीकडच्या राजकारणावरून दिसते आहे. कारण शिवसेनेने सत्तेसाठी काँग्रेसशी घरोबा केला आहे. संभाजीनगर नामकरण ही शिवसेनेची नौटंकी राजकारणापुरती आहे. सर्व शिवपे्रमी जनतेला हे समजले आहे.