शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
2
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
3
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
4
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
5
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
6
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
7
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
8
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
10
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
11
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
12
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
13
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
14
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
15
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
16
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
17
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
18
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
19
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
20
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली

मोदी लाटेवर निवडून आल्याचा खैरेंना विसर

By admin | Updated: April 22, 2016 01:00 IST

औरंगाबाद : खा.चंद्रकांत खैरे यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर डीपी प्लॅनमध्ये हेराफेरी केल्याचा आरोप करताच भाजपचे पीत्त खवळले आहे.

औरंगाबाद : खा.चंद्रकांत खैरे यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर डीपी प्लॅनमध्ये हेराफेरी केल्याचा आरोप करताच भाजपचे पीत्त खवळले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या लाटेवरच लोकसभेत ते निवडून आले आहेत, याचा विसर त्यांना पडला आहे. आता लोकसभा निवडणुका घेतल्या तर त्यांना त्यांचे स्थान कळेल, असेही भाजपने खैरेंना निशाणा करीत शिवसेनेला ठणकावून सांगितले. बुधवारी खा.खैरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात संनियंत्रण समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना विकास आराखड्यातील घोळाप्रकरणी उपमहापौर राठोड यांना टीकेचे लक्ष्य केले होते. तसेच मोदी लाटेमुळे फायदा झाला; परंतु फक्त १० टक्के मते मोदी लाटेमुळे वाढल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले होते. त्यावर गुरुवारी भाजपने त्यांच्या टीकेला सडतोड उत्तर दिले. गुरुवारी उपमहापौर प्रमोद राठोड, गटनेते भगवान घडामोडे यांनी खैरेंनीच शहराच्या विकासाला खीळ बसविल्याचा आरोप करून आजवर खासदार निधीतून कोणकोणती कामे केली व निधी कुठे कुठे खर्च केला याची माहिती देण्याचे आव्हानदेखील दिले. यावेळी सभापती दिलीप थोरात यांची उपस्थिती होती. उपमहापौर राठोड व त्यांच्या निकटवर्तीयांनी विकास आराखड्यात जमिनींचे घोटाळे केल्याच्या खा.खैरे यांच्या आरोपावर प्रतिक्रिया देताना राठोड म्हणाले, खैरेंनी माझ्या विरोधात पुरावे सादर करावेत. मी जर दोषी असेल तर उपमहापौरपदाचा तातडीने राजीनामा देतो आणि जर त्यांचे आरोप प्रतिमा मलीन करण्यापुरतेच असतील तर त्यांनी राजीनामा द्यावा. याप्रकरणी त्यांनी दिलगिरी व्यक्त केली नाही, तर त्यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा करण्याचा इशारा राठोड यांनी दिला. पराभवामुळे तोल जात आहे...सातारा-देवळाईत शिवसेनेचा पराभव झाला आहे. त्यामुळे ते बेताल वक्तव्य करीत सुटले आहेत. चार ‘टर्म’ पासून ते खासदार आहेत. असे असतानाही सातारा-देवळाईतील तांड्यांपर्यंत साधा रस्तादेखील ते विकास निधीतून करू शकले नाहीत. त्यामुळे नागरिकांनी सेनेला दूर ठेवले, असे राठोड, घडामोडे म्हणाले. त्याला जास्त किंमत द्यावी असे मला वाटत नाही...लोकसभा निवडणुकीत निवडून येण्यात माझे वैयक्तिक योगदान आहे की नाही. माझा जनसंपर्क, केलेली कामे, पक्षसंघटनेवर मी निवडून आलो आहे. मोदी लाटेचा १० टक्के प्रभाव झाला असेल. उपमहापौरांनी जे काही आरोप केले किंवा प्रत्युत्तर दिले आहे, त्याला जास्त किंमत द्यावी असे मला वाटत नाही, असे खा.चंद्रकांत खैरे म्हणाले.