शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
4
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
5
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
6
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
7
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
8
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
9
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
10
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
11
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
12
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
13
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
14
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
15
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
16
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
17
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
18
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
19
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
20
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

तलावातील गाळ उपसण्यातही खाबूगिरी

By admin | Updated: May 21, 2016 00:12 IST

औरंगाबाद : काँग्रेस आघाडी सरकारने दोन वर्षांपूर्वी महापालिकेला हर्सूल तलावातील गाळ काढण्यासाठी २ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता.

औरंगाबाद : काँग्रेस आघाडी सरकारने दोन वर्षांपूर्वी महापालिकेला हर्सूल तलावातील गाळ काढण्यासाठी २ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. या निधीचा ‘सदुपयोग’यंदा मनपाने केला. पंधरा दिवसांपूर्वी मोठा गाजावाजा करून गाळ काढण्याच्या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. सुमारे ४५ हजार क्युबिक मीटर गाळ काढण्यात आल्याचा दावा करून कंत्राटदाराने काम थांबविले. अजूनही तलावात ९० टक्के गाळ जशास तसा आहे. २ कोटी रुपये पंधरा दिवसांमध्ये कसे खर्च झाले, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. गाळ काढण्याच्या कामात मोठ्या प्रमाणात खाबूगिरी झाल्याचे बोलले जात आहे.मागील ५० वर्षांमध्ये हर्सूल तलावातील गाळ कधीच काढण्यात आला नव्हता. तलावात गाळाचे प्रमाण बरेच वाढल्याने दिवसेंदिवस पाणी कमी साचत आहे. चार वर्षांपूर्वी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी हर्सूल तलावाची पाहणी केली होती. त्यानंतर काँग्रेस आघाडी सरकारने २ कोटी रुपयांचा निधी मनपाला गाळ काढण्यासाठी दिला. मागील वर्षी ऐन पावसाळ्यात गाळ काढण्याचे टेंडर मनपाने काढले होते. या टेंडरला नगरसेवकांकडून कडाडून विरोध झाल्याने मनपाने उन्हाळ्यात काम करण्यात येणार असल्याचे घोषित केले होते. यंदाही मनपाला गाळ काढण्याची अजिबात इच्छा नव्हती. विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांनी हर्सूल तलावाची पाहणी करून गाळ काढण्याचे आदेश दिल्यावर मनपाची यंत्रणा कामाला लागली. ज्या कंत्राटदाराला गाळ काढण्याचे काम दिले होते, त्याने मागील १५ दिवसांमध्ये सुमारे ४५ हजार क्युबिक मीटर गाळ काढल्याचा दावा केला. २ कोटी रुपयांमध्ये एवढेच काम होऊ शकते. आणखी गाळ काढण्यासाठी निधी पाहिजे, अशी मागणी कंत्राटदारांकडून करण्यात येत आहे. मनपाने कोणत्या ‘हिशोबाने’कंत्राटदाराला गाळ काढण्याचे काम दिले. गाळ काढण्याच्या कामात कंत्राटदाराचे हित का जोपासण्यात आले, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.