शहरं
Join us  
Trending Stories
1
एलओसीवर ८-९ मेची रात्र! भारताने एवढे बॉम्ब फोडले की, पाकिस्तानी चौकीवर सकाळी पांढरे निशाण फडकले
2
"मी उपलब्ध नाही...", पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यास युसूफ पठाण जाणार नाही, संसदीय शिष्टमंडळाला नकार
3
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल! स्वस्त झाले की महागले? जाणून घ्या आजचे दर
4
Amit Thackeray: "युद्धाचा निकाल स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा"; अमित ठाकरेंचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र
5
पाकचा नापाक इरादा भारताला आधीच लक्षात आला, सुवर्ण मंदिरावरील हल्ला 'अशा' प्रकारे उधळून लावला!
6
EPFO चा धमाका! तुमच्या PF आणि पेन्शनमध्ये मोठे बदल, जाणून घ्या ५ महत्त्वाचे अपडेट्स
7
स्वतंत्र झाल्यावर कसा असेल बलुचिस्तान देश? जाणून घ्या
8
पाकिस्तानचा मंत्री अध्यक्ष असलेल्या आशिया कपमध्ये भारतीय संघ खेळणार नाही; नाव माघारी घेतले... 
9
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्रावर भडकली टीव्ही अभिनेत्री, म्हणाली- "अशा लोकांना..."
10
'ठरलं तर मग' मालिकेत पुन्हा येतेय 'ही' अभिनेत्री, लेकीच्या जन्मानंतर दोन महिन्यात कमबॅक
11
Jyoti Mlhotra : "माझ्या मुलीला फसवलं जातंय, ती पाकिस्तानला..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांचा खळबळजनक दावा
12
"माझ्या ११ वर्षांच्या मुलाचं निधन झालं अन् मी देव्हाऱ्यातील मूर्ती काढल्या", अभिनेत्याचा मोठा खुलासा
13
जगबुडी नदी पुन्हा काळ बनली! अंत्ययात्रेला जाणाऱ्या मुंबईकरांची कार नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू
14
'सितारे जमीन पर' थिएटरमधून थेट युट्यूबवर होणार प्रदर्शित, आमिर खान आणणार PPV मॉडेल
15
बाजारात संमिश्र कल! 'हे' दिग्गज आयटी शेअर घसरले, बँकिंगमध्ये तेजी; एफपीआयचा विश्वास कायम
16
सख्खे शेजारी बनले पक्के वैरी! दारूच्या नशेत वाद विकोपाला गेला; हाणामारीत ३ जणांचा मृत्यू
17
हैदराबादमध्ये मोठा कट उधळला, ISIS शी संबंधित दोघांना अटक; बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त
18
कैलास मानसरोवर यात्रेसाठी आता जास्त पैसे मोजावे लागणार! चीनशी आहे थेट संबंध
19
Rain Update : रत्नागिरीत सकाळपासूनच जोरदार, मुंबईत तुरळक पाऊस; राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट
20
Joe Biden : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कॅन्सर! हाडांपर्यंत पोहोचला आजार

तलावातील गाळ उपसण्यातही खाबूगिरी

By admin | Updated: May 21, 2016 00:12 IST

औरंगाबाद : काँग्रेस आघाडी सरकारने दोन वर्षांपूर्वी महापालिकेला हर्सूल तलावातील गाळ काढण्यासाठी २ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता.

औरंगाबाद : काँग्रेस आघाडी सरकारने दोन वर्षांपूर्वी महापालिकेला हर्सूल तलावातील गाळ काढण्यासाठी २ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. या निधीचा ‘सदुपयोग’यंदा मनपाने केला. पंधरा दिवसांपूर्वी मोठा गाजावाजा करून गाळ काढण्याच्या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. सुमारे ४५ हजार क्युबिक मीटर गाळ काढण्यात आल्याचा दावा करून कंत्राटदाराने काम थांबविले. अजूनही तलावात ९० टक्के गाळ जशास तसा आहे. २ कोटी रुपये पंधरा दिवसांमध्ये कसे खर्च झाले, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. गाळ काढण्याच्या कामात मोठ्या प्रमाणात खाबूगिरी झाल्याचे बोलले जात आहे.मागील ५० वर्षांमध्ये हर्सूल तलावातील गाळ कधीच काढण्यात आला नव्हता. तलावात गाळाचे प्रमाण बरेच वाढल्याने दिवसेंदिवस पाणी कमी साचत आहे. चार वर्षांपूर्वी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी हर्सूल तलावाची पाहणी केली होती. त्यानंतर काँग्रेस आघाडी सरकारने २ कोटी रुपयांचा निधी मनपाला गाळ काढण्यासाठी दिला. मागील वर्षी ऐन पावसाळ्यात गाळ काढण्याचे टेंडर मनपाने काढले होते. या टेंडरला नगरसेवकांकडून कडाडून विरोध झाल्याने मनपाने उन्हाळ्यात काम करण्यात येणार असल्याचे घोषित केले होते. यंदाही मनपाला गाळ काढण्याची अजिबात इच्छा नव्हती. विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांनी हर्सूल तलावाची पाहणी करून गाळ काढण्याचे आदेश दिल्यावर मनपाची यंत्रणा कामाला लागली. ज्या कंत्राटदाराला गाळ काढण्याचे काम दिले होते, त्याने मागील १५ दिवसांमध्ये सुमारे ४५ हजार क्युबिक मीटर गाळ काढल्याचा दावा केला. २ कोटी रुपयांमध्ये एवढेच काम होऊ शकते. आणखी गाळ काढण्यासाठी निधी पाहिजे, अशी मागणी कंत्राटदारांकडून करण्यात येत आहे. मनपाने कोणत्या ‘हिशोबाने’कंत्राटदाराला गाळ काढण्याचे काम दिले. गाळ काढण्याच्या कामात कंत्राटदाराचे हित का जोपासण्यात आले, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.