शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

तलावातील गाळ उपसण्यातही खाबूगिरी

By admin | Updated: May 21, 2016 00:12 IST

औरंगाबाद : काँग्रेस आघाडी सरकारने दोन वर्षांपूर्वी महापालिकेला हर्सूल तलावातील गाळ काढण्यासाठी २ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता.

औरंगाबाद : काँग्रेस आघाडी सरकारने दोन वर्षांपूर्वी महापालिकेला हर्सूल तलावातील गाळ काढण्यासाठी २ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. या निधीचा ‘सदुपयोग’यंदा मनपाने केला. पंधरा दिवसांपूर्वी मोठा गाजावाजा करून गाळ काढण्याच्या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. सुमारे ४५ हजार क्युबिक मीटर गाळ काढण्यात आल्याचा दावा करून कंत्राटदाराने काम थांबविले. अजूनही तलावात ९० टक्के गाळ जशास तसा आहे. २ कोटी रुपये पंधरा दिवसांमध्ये कसे खर्च झाले, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. गाळ काढण्याच्या कामात मोठ्या प्रमाणात खाबूगिरी झाल्याचे बोलले जात आहे.मागील ५० वर्षांमध्ये हर्सूल तलावातील गाळ कधीच काढण्यात आला नव्हता. तलावात गाळाचे प्रमाण बरेच वाढल्याने दिवसेंदिवस पाणी कमी साचत आहे. चार वर्षांपूर्वी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी हर्सूल तलावाची पाहणी केली होती. त्यानंतर काँग्रेस आघाडी सरकारने २ कोटी रुपयांचा निधी मनपाला गाळ काढण्यासाठी दिला. मागील वर्षी ऐन पावसाळ्यात गाळ काढण्याचे टेंडर मनपाने काढले होते. या टेंडरला नगरसेवकांकडून कडाडून विरोध झाल्याने मनपाने उन्हाळ्यात काम करण्यात येणार असल्याचे घोषित केले होते. यंदाही मनपाला गाळ काढण्याची अजिबात इच्छा नव्हती. विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांनी हर्सूल तलावाची पाहणी करून गाळ काढण्याचे आदेश दिल्यावर मनपाची यंत्रणा कामाला लागली. ज्या कंत्राटदाराला गाळ काढण्याचे काम दिले होते, त्याने मागील १५ दिवसांमध्ये सुमारे ४५ हजार क्युबिक मीटर गाळ काढल्याचा दावा केला. २ कोटी रुपयांमध्ये एवढेच काम होऊ शकते. आणखी गाळ काढण्यासाठी निधी पाहिजे, अशी मागणी कंत्राटदारांकडून करण्यात येत आहे. मनपाने कोणत्या ‘हिशोबाने’कंत्राटदाराला गाळ काढण्याचे काम दिले. गाळ काढण्याच्या कामात कंत्राटदाराचे हित का जोपासण्यात आले, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.