शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
3
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
4
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
5
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
6
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
7
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
8
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
9
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
10
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
11
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
12
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
13
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
14
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
15
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
16
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
17
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
18
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
19
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
20
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'

बायोमेट्रिकमुळे रॉकेलचा सुकाळ

By admin | Updated: August 3, 2014 01:11 IST

औरंगाबाद : रेशनवरील धान्य आणि रॉकेलचा काळाबाजार रोखण्यासाठी वर्षभरापूर्वी लागू करण्यात आलेल्या बायोमेट्रिक पद्धतीचे फायदे दिसण्यास सुरुवात झाली आहे

औरंगाबाद : रेशनवरील धान्य आणि रॉकेलचा काळाबाजार रोखण्यासाठी वर्षभरापूर्वी लागू करण्यात आलेल्या बायोमेट्रिक पद्धतीचे फायदे दिसण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत रेशन दुकानदारांना वितरणासाठी दिलेले रॉकेल कधीही शिल्लक राहत नव्हते. मात्र, बायोमेट्रिक पद्धत लागू केलेल्या दुकानांवर आता ते शिल्लक राहत आहे. चालू महिन्यात १८ दुकानांवर २४०० लिटर रॉकेल शिल्लक राहिल्याची माहिती जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी दिली.जिल्ह्यात एकूण १७७७ रेशन दुकाने आहेत. या दुकानांमधून रेशनकार्डधारकांना दरमहा अन्नधान्य आणि रॉकेलचा पुरवठा केला जातो. मात्र, अनेक लाभार्थी रेशनवरून अन्नधान्य किंवा रॉकेल घेऊन जात नाहीत. त्यामुळे बऱ्याच वेळा रेशन दुकानांवर काही कोटा शिल्लक राहतो.परंतु अनेक दुकानदार हा कोटा वितरित झाल्याचे दाखवून त्याची काळ्याबाजारात विक्री करतात. हा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने वर्षभरात रेशन दुकानांसाठी प्रायोगिक तत्त्वावर बायोमेट्रिक पद्धत लागू केली. याअंतर्गत आतापर्यंत औरंगाबाद शहरातील ९ आणि फुलंब्रीतील ९, अशा १८ दुकानांवर बायोमेट्रिक यंत्रे बसविण्यात आली आहेत. रेशन दुकानदारांना टॅब्लेटचे वाटप करण्यात आले असून, त्यात लाभार्थ्यांची संपूर्ण माहिती आणि त्यांच्या बोटांचे ठसे साठविण्यात आलेले आहेत. हे ठसे जुळल्यानंतरच त्या ठिकाणी धान्य दिले जाते. हे टॅब्लेट आॅनलाईन पद्धतीने सर्व्हरशी जोडलेले आहेत. त्यामुळे कोणत्या दुकानावरून किती आणि कोणत्या लाभार्थ्यांना धान्य वाटप झाले याची प्रत्येक मिनिटाची माहिती वरिष्ठ पातळीवर समजते. त्याचे चांगले परिणाम दिसून येत असल्याचे जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी सांगितले. ते म्हणाले, बायोमेट्रिक पद्धत लागू केलेल्या दुकानांवर दरमहा अन्नधान्य आणि रॉकेलचा काही कोटा शिल्लक राहत आहे. आतापर्यंत रॉकेलचा कोटा कधीही शिल्लक राहत नव्हता. मात्र, मागील महिन्यात १८ दुकानांवर तब्बल २४०० लिटर रॉकेल शिल्लक राहिले आहे. गंगापूर तालुक्यातही लागू करणार सध्या औरंगाबाद शहर आणि फुलंब्री तालुक्यातील १८ दुकानांवर प्रायोगिक तत्त्वावर बायोमेट्रिक यंत्रे बसविण्यात आली आहेत. त्याचे चांगले परिणाम दिसून येत असल्यामुळे लवकरच गंगापूर तालुक्यातील ९ दुकानांवरही बायोमेट्रिक पद्धत लागू केली जाणार आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.