शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
2
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
3
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
4
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
5
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा आरोप
6
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
7
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
8
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!
9
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
10
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
11
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
12
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO
13
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
14
Pooja Kumari : कष्टाचं फळ! भाजी, कपडे विकले, कोरोनात मास्क शिवले; अडचणींवर मात करुन झाली अधिकारी
15
जिओ IPO, AI आणि नवीन उर्जा... मुकेश अंबानी उद्या मोठ्या घोषणा करणार? गुंतवणूकदारांना संधी?
16
बिहारमध्ये हाय अलर्ट, जैश-ए-मोहम्मदचे तीन पाकिस्तानी दहशतवादी नेपाळमधून घुसले
17
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
18
इंजेक्शन घेऊन वर्ल्ड कप खेळला; आता त्याच्या फिटनेसवर नाही भरवसा! मोहम्मद शमी म्हणाला...
19
TVS: टीव्हीएसचा बाजारात धमाका! स्टायलिश डिझाइनसह ई-स्कूटर केली लॉन्च, जाणून घ्या किंमत
20
Open AI: एआयचा वापर धोकादायक? चॅटजीपीटीमुळे १६ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप

सर्व दुकाने दुपारी २ वाजेपर्यंत उघडी ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:02 IST

औरंगाबाद : सर्व दुकाने दुपारी २ वाजेपर्यंत सुरू ठेवावेत व त्यानंतरच लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करावी, अशी मागणी जिल्हा व्यापारी ...

औरंगाबाद : सर्व दुकाने दुपारी २ वाजेपर्यंत सुरू ठेवावेत व त्यानंतरच लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करावी, अशी मागणी जिल्हा व्यापारी महासंघातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली.

संपूर्ण लॉकडाऊनला सर्व स्तरांतून विरोध होत आहे. व्यापाऱ्यांनीही संपूर्ण लॉकडाऊनला पहिल्यापासूनच विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी दुपारी ४ वाजता जिल्हा व्यापारी महासंघाच्या पदाधिकऱ्यांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची भेट घेतली व त्यांना निवेदन दिले. यावेळी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी सांगितले की, आधीच कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने त्याचा परिणाम सर्व व्यवसायांवर झाला आहे. मागील वर्षी लॉकडाऊनमुळे बहुतांश व्यापाऱ्यांची प्रचंड आर्थिक कोंडी झाली होती. अनेकांना आपला व्यवसाय बंद करावा लागला होता. लॉकडाऊन करूनही रुग्णसंख्या वाढली होती.

मात्र, राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. त्या काळात ४० टक्के व्यवसाय दुपारी १२ वाजेपर्यंत उघडे ठेवण्यास परवानगी दिली आहे. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भेदभाव निर्माण होत आहे. लॉकडाऊन काळात सर्व व्यवसाय सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत उघडे ठेवण्यास परवानगी द्यावी. त्यानंतरच लॉकडाऊन सुरू करावे. ज्यामुळे सर्व व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान कमी होईल व दुकाने उघडी असल्याने ग्राहकही गर्दी करणार नाहीत.

अनेकांची मार्च एण्डची कामे बाकी आहेत. यात स्टॉक स्टेटमेंट तयार करणे, जीएसटीचे विवरणपत्र भरणे, आयकर रिटर्न भरणे, त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या मालमत्ता कराचासुद्धा भरणा करावयाची मुदत ३१ मार्च आहे. लाइट बिलाची मुदतसुद्धा ३१ मार्च आहे, याचा विचार प्रशासनाने करावा, अशी विनंती यावेळी करण्यात आली. रविवारी रात्री पोलीस आयुक्तांसमवेत बैठक आहे. त्यात आम्ही या मागण्यांचा विचार करू, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. यावेळी महासंघाचे सचिव लक्ष्मीनारायण राठी, पंकज लोया, दिलीप चोटलाणी यांची उपस्थिती होती.