शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
2
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
3
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
4
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
5
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
6
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
7
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
8
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
9
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
10
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
11
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
12
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
13
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
14
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
15
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
16
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
17
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
18
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
19
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
20
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस

केवड्याचा सुगंध मुंबईपर्यंत

By admin | Published: September 01, 2014 12:40 AM

गणेशोत्सव सुरू झाला आणि माळीवाड्यातील केवड्याचा सुगंध पुणे-मुंबईपर्यंत जाऊन पोहोचला.

औरंगाबाद : गणेशोत्सव सुरू झाला आणि माळीवाड्यातील केवड्याचा सुगंध पुणे-मुंबईपर्यंत जाऊन पोहोचला. शहरालगत माळीवाड्यात नागजरी नदीच्या काठी असलेले ‘केवडा बन’ महाराष्ट्रात तिसऱ्या नंबरचे आहे. पूर्वी या परिसरात केवड्याची झाडे १५ हजारांपेक्षा अधिक होती. मात्र, असंतुलित पर्जन्यमान, वाढते प्रदूषण यामुळे या बनात जुनी केवळ ४० झाडे उरली आहेत. महाराष्ट्रात तीन जिल्ह्यांतच केवड्याचे तुरळक बन शिल्लक राहिले आहे. यात औरंगाबाद जिल्ह्यातील माळीवाडा, उस्मानाबाद जिल्ह्यातील पापनस बन व सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील वाकरी येथील केवडा बनाचा समावेश होतो. दौलताबाद किल्ल्यामागील बाजूस असलेले माळीवाडा गाव केवड्यासाठी राज्यात प्रसिद्ध आहे. गावातील नागजरी नदीच्या काठावरील चार एकर जमिनीवर केवड्याची झाडे आहेत. देवगिरी किल्ल्याच्या इतिहासात १३ व्या शतकात यादवांचे राज्य होते. त्यावेळी येथील केवड्यापासून सुवासिक अत्तर केले जात असे. स्वातंत्रपूर्व काळापर्यंत येथे अत्तर बनविले जात होते. तेव्हा नागजरी नदी परिसरात सात एकर शेतात १५ हजारांपेक्षा अधिक झाडे होती. १९७२ च्या दुष्काळात अनेक झाडे वाळली. मागील दशकात दोनदा वादळामुळे अनेक झाडांच्या फांद्या तुटून मोठे नुकसान झाले होते. नदीतील रसायनयुक्त पाण्याचाही परिणाम झाडांवर झाला. मागील १० वर्षांत अनेक झाडे जळून गेली. आजघडीला चार एकर क्षेत्रांत ४० जुनी झाडे तग धरून आहेत. येथील शेतकऱ्यांनी नवीन झाडे लावली. १० वर्षे झाली तरी अजून त्यांना कणसे आली नाहीत.शेतकरी दिलीप गाणार यांनी सांगितले की, केवड्याचे झाड ३० ते ३५ फूट उंच वाढते. या झाडांना वर्षातून एकदाच कणसे येतात. केवड्यात दोन जाती असतात. एककेवडी एक जात असते. यास कणीस नसते व सुगंधही नसतो. दुसरी जातीच्या केवड्यास कणीस असते व त्याला सुगंध असतो. केवडा श्रावणात बहरतो आणि भाद्रपद महिना संपता संपता उतरणीला लागतो. केवड्याच्या एका झाडाला ४०० ते ५०० कणसे येतात. एका केवड्यास १२ ते १५ पाने असतात व तेवढीच छोटी-छोटी कणसे असतात. एक अख्खा केवडा ५०० ते ५५० रुपयांना विक्री होतो. बाजारात येत असलेला केवडा तीन पाने व कणसाचा छोटा तुकडा असलेला असतो. अख्खे कणीस ग्राहकांना पाहावयास मिळतच नाही.