शहरं
Join us  
Trending Stories
1
"...महाराष्ट्राच्या इतिहास एवढा मोठा विजय कुणालाच मिळालेला नाही, ही तर...," फडणवीसांनी नगराध्यक्ष, नगरसेवकांचा आकडाच सांगितला
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

केवड्याचा सुगंध मुंबईपर्यंत

By admin | Updated: September 1, 2014 17:13 IST

गणेशोत्सव सुरू झाला आणि माळीवाड्यातील केवड्याचा सुगंध पुणे-मुंबईपर्यंत जाऊन पोहोचला.

औरंगाबाद : गणेशोत्सव सुरू झाला आणि माळीवाड्यातील केवड्याचा सुगंध पुणे-मुंबईपर्यंत जाऊन पोहोचला. शहरालगत माळीवाड्यात नागजरी नदीच्या काठी असलेले ‘केवडा बन’ महाराष्ट्रात तिसऱ्या नंबरचे आहे. पूर्वी या परिसरात केवड्याची झाडे १५ हजारांपेक्षा अधिक होती. मात्र, असंतुलित पर्जन्यमान, वाढते प्रदूषण यामुळे या बनात जुनी केवळ ४० झाडे उरली आहेत. महाराष्ट्रात तीन जिल्ह्यांतच केवड्याचे तुरळक बन शिल्लक राहिले आहे. यात औरंगाबाद जिल्ह्यातील माळीवाडा, उस्मानाबाद जिल्ह्यातील पापनस बन व सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील वाकरी येथील केवडा बनाचा समावेश होतो. दौलताबाद किल्ल्यामागील बाजूस असलेले माळीवाडा गाव केवड्यासाठी राज्यात प्रसिद्ध आहे. गावातील नागजरी नदीच्या काठावरील चार एकर जमिनीवर केवड्याची झाडे आहेत. देवगिरी किल्ल्याच्या इतिहासात १३ व्या शतकात यादवांचे राज्य होते. त्यावेळी येथील केवड्यापासून सुवासिक अत्तर केले जात असे. स्वातंत्रपूर्व काळापर्यंत येथे अत्तर बनविले जात होते. तेव्हा नागजरी नदी परिसरात सात एकर शेतात १५ हजारांपेक्षा अधिक झाडे होती. १९७२ च्या दुष्काळात अनेक झाडे वाळली. मागील दशकात दोनदा वादळामुळे अनेक झाडांच्या फांद्या तुटून मोठे नुकसान झाले होते. नदीतील रसायनयुक्त पाण्याचाही परिणाम झाडांवर झाला. मागील १० वर्षांत अनेक झाडे जळून गेली. आजघडीला चार एकर क्षेत्रांत ४० जुनी झाडे तग धरून आहेत. येथील शेतकऱ्यांनी नवीन झाडे लावली. १० वर्षे झाली तरी अजून त्यांना कणसे आली नाहीत.शेतकरी दिलीप गाणार यांनी सांगितले की, केवड्याचे झाड ३० ते ३५ फूट उंच वाढते. या झाडांना वर्षातून एकदाच कणसे येतात. केवड्यात दोन जाती असतात. एककेवडी एक जात असते. यास कणीस नसते व सुगंधही नसतो. दुसरी जातीच्या केवड्यास कणीस असते व त्याला सुगंध असतो. केवडा श्रावणात बहरतो आणि भाद्रपद महिना संपता संपता उतरणीला लागतो. केवड्याच्या एका झाडाला ४०० ते ५०० कणसे येतात. एका केवड्यास १२ ते १५ पाने असतात व तेवढीच छोटी-छोटी कणसे असतात. एक अख्खा केवडा ५०० ते ५५० रुपयांना विक्री होतो. बाजारात येत असलेला केवडा तीन पाने व कणसाचा छोटा तुकडा असलेला असतो. अख्खे कणीस ग्राहकांना पाहावयास मिळतच नाही.