शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : औरंगाबादचे दुसरे खासदार ठरले कर्मयोगी स्वामी रामानंद तीर्थ

By शांतीलाल गायकवाड | Updated: April 2, 2019 00:16 IST

हैदराबाद मुक्ती लढ्याचे प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक सदस्य शांताराम सावळाराम मिरजकर या दोन दिग्गज व्यक्तिमत्त्वांमध्ये जोरदार लढत झाली.

ठळक मुद्देलोकसभेची दुसरी निवडणूक : प्रभावी व्यक्तिमत्त्वाचा संघर्ष, पंडित नेहरूंची आमखास मैदानावर सभा

- शांतीलाल गायकवाड

औरंगाबाद : साधनसंपत्तीची कमतरता, तंत्रज्ञानाचा अभाव व कमालीची निरक्षरता ही पहिल्या लोकसभा निवडणुकीत असलेली वस्तुस्थिती लोकसभेच्या दुसऱ्या निवडणुकीत तसूभरही बदलली नव्हती. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात हैदराबाद मुक्ती लढ्याचे प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक सदस्य शांताराम सावळाराम मिरजकर या दोन दिग्गज व्यक्तिमत्त्वांमध्ये जोरदार लढत झाली. काँग्रेस प्रभावाखाली असलेल्या मतदारांनी स्वामी रामानंद तीर्थ यांना विजयी केले; परंतु विजयातील अंतर बरेच कमी होते.

स्वामींना मिळाली ७६ हजार २७४ मतेया काळात राज्य तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. लोकसभेची पहिली निवडणूक झाली तेव्हा, हैदराबाद हे स्वतंत्र राज्य होते. दुसऱ्या निवडणुकीपूर्वीच १९५६ मध्ये आंध्र प्रदेश राज्याची स्थापना झाली होती. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आकार घेत होती; परंतु मराठवाडा हा हैदराबादलाच जोडलेला होता. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे नेते स्वामी रामानंद तीर्थ यांना उमेदवारी दिली होती, तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाने शांताराम सावळाराम मिरजकर यांना मैदानात उतरविले. २५ फेब्रुवारी १९५७ रोजी औरंगाबाद मतदारसंघात मतदान झाले. मतदारसंघात ३ लाख ७६ हजार ४८ एकूण मतदार होते. त्यापैकी १ लाख ३३ हजार ७१३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. स्वामीजींना ७६ हजार २७४ मते मिळाली. त्यांना मिळालेल्या मतांची टक्केवारी ५७.०४ एवढी होती, तर पराभूत झालेले मिरजकर यांना ५७ हजार ४३९ मते अर्थात ४२.९६ टक्के मते मिळाली. पहिल्या लोकसभेत सुरेशचंद्र आर्य यांचा विजय ३५ हजारांहून अधिक मतांनी झाला होता. दुसºया निवडणुकीत काँग्रेसचे हे मताधिक्य घटले.

एकही मत बाद नाही...तेव्हा काही मतदारसंघ एक सदस्यीय, तर काही मतदारसंघ द्विसदस्यीय होते. औरंगाबाद मतदारसंघ सर्वसाधारण होता. त्यामुळे यात एक सदस्य होता. द्विसदस्यीय मतदारसंघात मतदारांना दोन मते करण्याचा अधिकार होता. त्यात अनेक मतदार दोन्ही मतपत्रिका एकाच उमेदवाराच्या मतपेटीत टाकत, त्यामुळे अनेक मते बाद होत असत; परंतु औरंगाबादेत एक सदस्य असल्यामुळे एकही मत बाद झाले नव्हते.पंडित नेहरूंची औरंगाबादेत सभाया निवडणुकीत औरंगाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मराठवाड्याचे सुपुत्र भुजंगराव कुलकर्णी होते. त्यांनीही या निवडणुकीचे अनुभव कथन केले. ते सांगतात, स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रचारार्थ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी औरंगाबादेतील आमखास मैदानावर जाहीर सभा घेतली होती. त्यानंतर पंडित नेहरू यांनी वेरूळ, औरंगाबाद लेण्यासही भेट दिली.

भुजंगराव कुलकर्णी यांनी सांगितल्यानुसार, या निवडणुकीत संपूर्ण निवडणूक यंत्रणेकडे केवळ दोन चारचाकी गाड्या होत्या. या दोन गाड्यांच्या मदतीने संपूर्ण मतदारसंघातील निवडणूक यंत्रणा हलविली जात होती. मतदान केंद्रांवर मतदान अधिकारी व यंत्रणा एक दिवस अगोदरच बसमधून पाठविली जाई. त्यानंतर प्रशासन व या कर्मचाऱ्यांचा संपर्कही होत नसे.

बैलगाड्या व घरच्या दशम्याजुन्या जाणत्यांनी नागरिकांच्या तोंडून या निवडणुकीतील अनेक कि स्से सांगितले जातात. पूर्वी मतदार स्वत:हूनच मतदान करण्यासाठी येत. त्यासाठी ते स्वत:च्या बैलगाड्या जुंपत. कार्यकर्तेही प्रचारासाठी बैलगाड्या वापरत. तेव्हा प्रचारासाठी सायकली मिळणेही दुरापास्त होते. कार्यकर्ते घरच्या दशम्या घेऊन प्रचारासाठी निघत. साधनसामग्रीची कमतरता व तंत्रज्ञानाची मोठी उणीव असली तरी कार्यकर्ते व मतदारांची निष्ठा आणि प्रामाणिकता मोठी होती.

स्वामीजींचा अल्पपरिचयस्वामी रामानंद तीर्थ ऊर्फ व्यंकटेश भगवानराव खेडगीकर यांचा जन्म ३ आॅक्टोबर १९०३ रोजी विजापूर जिल्ह्यातील सिंदगी याठिकाणी झाला. उत्कृष्ट संघटक व प्रभावी वक्ते असलेल्या स्वामींचे शिक्षण सोलापूरच्या सरकारी शाळेत झाले. उस्मानाबाद जिल्ह्यातील हिप्परगा या गावी गुरूकुलात ते कार्यरत होते. येथूनच हैदराबाद मुक्तिसंग्रामासाठी अनेक कार्यकर्ते, नेते पुढे आले. पुढे अंबाजोगाईत त्यांनी स्वतंत्र शाळा सुरू केली. १९३० मध्ये स्वामी नारायण तीर्थ यांनी त्यांना दीक्षा दिली व ते संन्यासी झाले. त्यांनी १९३८ मध्ये हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना करून हैदराबाद मुक्तिलढ्याचे रणशिंग फुंकले. १९५२ मध्ये झालेल्या पहिल्या लोकसभेत ते गुलबर्गा येथून काँग्रेसचे खासदार म्हणून संसदेत गेले होते. औरंगाबादेतून दुसºयांदा ते खासदार म्हणून विजयी झाले. ही टर्म संपल्यानंतर त्यांनी नेहरूंची भेट घेऊन राजकारणातून संन्यास घेत संपूर्ण जीवन अध्यात्मासाठी खर्च केले. २२ जानेवारी १९७२ रोजी त्यांचे हैदराबादेत देहावसान झाले.मिरजकरांचा मुंबईत डमी अर्ज१९५२ मध्ये झालेल्या पहिल्या निवडणुकीत उत्तर मुंबई मतदारसंघातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकसभेची निवडणूक लढविली होती. हा मतदारसंघ द्विसदस्यीय होता. त्यात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे श्रीपाद अमृत डांगे यांनीही अर्ज भरला होता. डांगे यांचा डमी उमेदवार म्हणून शांताराम मिरजकर यांनी उमेदवारी दाखल केली होती, जी नंतर मागे घेण्यात आली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादPoliticsराजकारण