शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

कन्नड तालुक्याला पीक विम्यापोटी मिळाले एक कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:05 IST

कन्नड : सतत पडणाऱ्या पावसामुळे मागील वर्षीच्या खरीप हंगामातील कापूस आणि मका पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊनदेखील या पिकांचा ...

कन्नड : सतत पडणाऱ्या पावसामुळे मागील वर्षीच्या खरीप हंगामातील कापूस आणि मका पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊनदेखील या पिकांचा विमा न मिळाल्याने शेतकरीवर्गात प्रचंड नाराजी पसरली आहे.

कोरोना विषाणूने घातलेल्या थैमानामुळे शेती उत्पादित कोणत्याही पिकाला भाव नाही. तशातच निसर्गही कोपल्याने शेतकरीवर्ग पुरता नागवला गेला आहे. नैसर्गिक संकटामुळे पिकांचे नुकसान झाल्यास मदतीचा हातभार लागेल, या आशेपोटी गेल्यावर्षी तालुक्यातील २९ हजार १०६ शेतकऱ्यांनी कापूस, तर ४७,८८२ शेतकऱ्यांनी मक्याचा विमा उतरविला होता. मात्र, मुख्य पीक असलेल्या कापूस व मका पिकाचा विमा मिळालाच नाही. उडीद आणि मूग पिकांच्या विम्यापोटी ४,७५० शेतकऱ्यांना ९४ लाख रुपये मिळाले आहेत. तर टोल फ्री क्रमांकावर पीक नुकसानीबाबत तक्रार केलेल्या ३९३ शेतकऱ्यांना ११ लाख ३१ हजार रुपये मिळाले आहेत.

----

पाच वर्षांत मका व कापूस पिकांचा हेक्टरी उत्पादकता अहवाल :

कापूस पीक :

२०१६-१७ : १४०२ किलो

२०१७-१८ : ५५१ किलो

२०१८-१९ : ६२० किलो

२०१९-२० : ६४८ किलो

२०२०-२१ : ११८२ किलो

-----

मका पीक

२०१६-१७ : ४९०८ किलो

२०१७-१८ : ३६९९ किलो

२०१८-१९ : १६९८ किलो

२०१९-२० : १०८१ किलो

२०२०-२१ : ३३७७ किलो

---

७,२९५ शेतकऱ्यांचा समावेश

तालुक्यातील चिंचोली (लिं.), करंजखेडा, नाचनवेल, कन्नड व चापानेर या पाच महसूल मंडलातील २२ गावांना २० मार्चपासून सतत चार दिवस अवकाळी पाऊस व गारपिटीचा तडाखा बसला होता. महसूल व कृषी विभागाच्या वतीने या नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्यात आले होते. यामध्ये तालुक्यातील ७,२९५ शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला, तर ३.४० कोटींचा मदत निधी (अनुदान) प्रस्ताव शासनाकडून पाठविण्यात आलेला होता.