शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
2
'ब्लॅक फ्रायडे' म्हणजे काळा शुक्रवार...! मग भरमसाठ डिस्काऊंट देऊन साजरा का करतात कंपन्या...? 
3
Travel : कोल्डड्रिंकपेक्षाही स्वस्त पेट्रोल, इतर गोष्टीही खिशाला परवडणाऱ्या; भारतीयांसाठी व्हिसा फ्री आहे 'हे' बेट!
4
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
5
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
6
बिहार काँग्रेसच्या पराभवाची फाईल दिल्लीत उघडणार; ६१ उमेदवार जिल्हावार अहवाल सादर करणार
7
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
8
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
9
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
10
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
11
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
12
सात जन्माच्या साथीदारानेच केली क्रूरता! पतीमुळे ४ वर्षांच्या चिमुकल्याची आई ९ महिने तडफडत राहिली.. 
13
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
14
सोनिया जी, राहुल जी आन् मी..., कर्नाटक सत्तासंघर्षावर खर्गेंचे मोठे सेंकत! पुढचे 48 तास महत्वाचे; "200% 'तेच' CM होणार"
15
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय; रेअर अर्थ मॅग्नेट उत्पादनाला भारतात मोठी गती मिळणार
16
मायक्रोसॉफ्टचा बाजार उठणार की काय? गुगल कॉम्प्युटर, लॅपटॉपसाठी आणतेय ऑपरेटिंग सिस्टीम...
17
टीम इंडियाचा दबदबा संपत चाललाय, काही जण तर..; लाजिरवाण्या पराभवानंतर हर्षा भोगलेंनी सुनावलं
18
पंडित देशमुख खुनाचा मुद्दा २० वर्षांनंतर प्रचारात, मोहोळच्या देशमुखांसोबत काय घडलं होतं?
19
'थोडी वाट पाहा, फोन करतो', मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेदरम्यान राहुल गांधींचा डीके शिवकुमार यांना मेसेज
20
एकनाथ शिंदे सत्ता मिळवून दिघे साहेबांचे स्वप्न साकारणार की गणेश नाईक पुन्हा दूर ठेवणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘कमळाबाई’ शिवसेनेचे उपकार विसरली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 01:36 IST

शिवसेनेचे बोट धरून राजकारणात आलेल्या ‘कमळाबाई’चे नखरे वाढले असून, उपकार विसरलेल्या ‘कमळाबाई’चा बंदोबस्त करण्याची वेळ आल्याची टीका राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी भाजप प्रदेशाध्यक्षांचे नाव न घेता केली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शिवसेनेचे बोट धरून राजकारणात आलेल्या ‘कमळाबाई’चे नखरे वाढले असून, उपकार विसरलेल्या ‘कमळाबाई’चा बंदोबस्त करण्याची वेळ आल्याची टीका राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी भाजप प्रदेशाध्यक्षांचे नाव न घेता केली. रविवारी सायंकाळी नूतन वसाहतमध्ये आयोजित रमाई स्वर्गरथ लोकार्पण आणि रमाई ग्रुप आणि अल फतेह गु्रपच्या वतीने आयोजित शिवसेनेत जाहीर प्रवेश सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, शहरप्र्रमुख विष्णू पाचफुले, बाला परदेशी, माजी आ. संतोष सांबरे, भाऊसाहेब घुगे, सुधाकर निकाळजे, अ‍ॅड. भास्कर मगरे, आत्मानंद भक्त, पंडित भुतेकर, बालाजी कल्याणकर, नगरसेवक अशोक पांगारकर आदींची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.खोतकर म्हणाले की, लोकसभेला शिवसेना तुमच्या पाठीशी उभी राहिल्यामुळे तुम्ही चार वेळेस लोकसभेत पोहोचलात. मात्र सत्ता डोक्यात गेल्यामुळे तुम्ही शिवसेनेचे उपकार विसरलात. सेनेच्या वाघावर जाळे टाकणे तुम्हाला महाग पडले. आमचा भाजपाला विरोध नसून त्यांच्या प्रवृत्तीला आहे. ६० वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेसच्या डोक्यात सत्ता गेली नाही, मात्र भाजप तीन वर्षात सत्तेची भाषा बोलत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर या पक्षाची खिल्ली उडवली जात असल्याचे खोतकर म्हणाले. लवकरच सर्वांना पीआरकार्ड व रमाई घरकुल योजनेचा फायदा मिळवू दिला जाईल. दलित वस्ती योजनेअंतर्गत या भागात विविध विकास कामे करण्यावर भर दिला जाईल, असे त्यांनी सांगितले. अन्य मान्यवरांचीही भाषणे झाली. अ‍ॅड. बबन मगरे व अ‍ॅड. अशपाक पठाण यांच्यासह त्यांच्यासोबतच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.