शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
4
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
5
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
6
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
7
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
8
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
9
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
10
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
11
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
12
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
13
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
14
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
15
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
16
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
17
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
18
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
19
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
20
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
Daily Top 2Weekly Top 5

सल्लागारांमुळे कलगीतुरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2017 00:58 IST

औरंगाबाद : जिल्हा परिषद अध्यक्षांनी मध्यंतरीच्या काळात चुकीच्या सल्लागारांचे ऐकून काही निर्णय घेतले

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्हा परिषद अध्यक्षांनी मध्यंतरीच्या काळात चुकीच्या सल्लागारांचे ऐकून काही निर्णय घेतले. त्यापैकी बरेच निर्णय अंगलटही आले. सिंचन विभागातील ५२ फायलींचा वादही निरर्थक ठरला. मर्जीतला ‘कॅफो’ हवा म्हणून तत्कालीन मुख्य वित्त व लेखा अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी दबाव आणला. आता सिंचन विभागाने वित्त विभागाची मान्यता न घेताच कोल्हापुरी व सिमेंट बंधाऱ्यांच्या कामांना कार्यारंभ आदेश दिले म्हणून कार्यकारी अभियंता पांढरे यांना कार्यमुक्त करण्यासाठी ‘सीईओं’कडे आग्रह धरला. आतापर्यंतच्या महिला अध्यक्षांपैकी देवयानी पाटील डोणगावकर या ‘डेअरिंगबाज’ आहेत. त्यांनी इतरांचे न ऐकता स्वत: निर्णय घ्यावेत व जिल्हा परिषदेत सुरू असलेला कलगीतुरा थांबवावा, अशी अपेक्षा सदस्यांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात सूत्रांनी सांगितले की, मागील आर्थिक वर्षात सिंचन विभागाने कोल्हापुरी बंधारे व सिमेंट बंधाऱ्यांच्या ५२ कामांसाठी निविदा मागविल्या होत्या. दरम्यान, मार्चअखेरपर्यंत ही कामे पूर्ण करून प्राप्त निधी खर्च करण्याची गरज होती; पण तत्कालीन अध्यक्षांनी सिंचन विभागाच्या या कामांचे नियोजन वेळेत केले नाही. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्या.आचारसंहितेमुळे प्रशासनालाही नियोजन करणे शक्य झाले नाही. आचारसंहिता उठल्यानंतर सिंचन विभागाने कोल्हापुरी बंधारे व सिमेंट बंधाऱ्यांच्या कामांसाठी निविदा मागविल्या. मुख्य वित्त व लेखाधिकाऱ्यांच्या समक्षच निविदा प्रक्रिया पार पडली. त्यानंतर त्यांच्याच उपस्थितीत प्रशासकीय मान्यता व तांत्रिक मान्यतेचे सोपस्कार झाले.तब्बल चार वेळा वित्त विभागात या फायलींचा प्रवास झाला. या सर्व कामांसाठी ई- टेंडरिंग झाले. यामध्ये सर्वच कामे जवळपास अंदाजपत्रकीय दराच्या १५ ते १८ टक्के दराने कमी खर्चात करण्यासाठी कंत्राटदार पुढे आले. नियमानुसार २० लाखांपर्यंतचे दर मंजुरीचे अधिकार हे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना, तर १० लाखांपर्यंतचे अधिकार कार्यकारी अभियंत्यांना आहेत. ही सर्व कामे २० लाखांपेक्षा कमी खर्चाची असल्यामुळे कंत्राटदारांना कार्यारंभ आदेश देण्यासाठी वित्त विभागाची मान्यता घेण्याची गरज नव्हती, असे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र, सल्लागारांनी चुकीची माहिती दिल्यामुळे अध्यक्षांनी या कामांच्या निविदांच्या ५२ फायली जप्त केल्या व काही दिवसांनंतर त्या परतही केल्या.विशेष म्हणजे, ५२ पैकी जवळपास ३० ते ३५ कामे पूर्णदेखील झालेली आहेत. मात्र, यापैकी एकाही कामाचे बिल अद्याप अदा करण्यात आलेले नाही. जे सल्ले देणारे आहेत, त्यांचा पूर्वेतिहासदेखील वादग्रस्त असल्याचे वित्त विभागाला ठाऊक आाहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे.