शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

कळंब तालुक्यात सर्वात कमी पाऊस !

By admin | Updated: June 16, 2015 00:48 IST

उस्मानाबाद : पावसाला सुरूवात झाली असून आजवर जिल्ह्यात सरासरी ५०.९१ मिमी एवढी पावसाची नोंद झाली आहे.

उस्मानाबाद : पावसाला सुरूवात झाली असून आजवर जिल्ह्यात सरासरी ५०.९१ मिमी एवढी पावसाची नोंद झाली आहे. कळंब तालुक्यात सर्वात कमी १७.८३ मिमी पाऊस झाला. तर परंडा, भूम आणि लोहारा तालुक्यांमध्ये प्रत्येकी ५० मिमी पेक्षा अधिक पर्जन्यमान झाले आहे. ज्या ठिकाणी पेरणीयोग्य पाऊस झाला आहे, तेथील शेतकऱ्यांनी चाढ्यावर मुठ धरली आहे.मागील तीन-चार वर्षांपासून जिल्ह्यात सातत्याने अत्यल्प पर्जन्यमान होत आहे. त्यामुळे शेती व्यवसाय आतबट्याचा ठरत आहे. किमान यंदातरी चागला पाऊस होईल, अशी शेतकऱ्यांना आशा आहे. अनेक तालुक्यामध्ये सुरूवात चांगली केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. असे असले कळंबसारख्या तालुक्यामध्ये २० मि.मी.ही पाऊस पडलेला नाही. रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत संबंधित तालुक्यात अवघा १७.८३ मिमी एवढा पाऊस पडला आहे. तसेच उस्मानाबाद तालुक्यातही पेरणीयोग्य पाऊस पडलेला नाही. आजवर ३३.३९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी सर्वाधिक पाऊस झालेल्या तुळजापूर तालुक्यातही आजवर ३४ मिमी एवढा पाऊस झाला. तसेच वाशी ३६.६७ मिमी, उमरगा ५७ मिमी तर परंडा, लोहारा आणि भूम या तालुक्यामध्ये अनुक्रमे ८९.६ मिमी, ६९.३४ मिमी आणि ६८.०९ मिमी एवढा पाऊस पडला आहे. दरम्यान, पावसाला सुरूवात झाली असली तरी कळंबसारख्या तालुक्यातील शेतऱ्यांना आजही मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. (प्रतिनिधी)