शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
2
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
3
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
4
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
5
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
6
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
7
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
8
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
9
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
10
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
11
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
12
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
13
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
14
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
15
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
16
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
17
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
18
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
19
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
20
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

जाती व्यवस्था मोडीत काढल्याशिवाय न्याय अशक्य

By admin | Updated: August 11, 2014 00:18 IST

बीड : जाती-पातीच्या नावावर राजकीय पोळी पाजून घेत आहेत. देशातल्या अठरापगड जाती ओबीसीच्या नावाखाली जोपर्यंत एकत्र येत नाहीत तोपर्यंत ओबीसीला न्याय मिळणे अशक्य आहे, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

बीड : जात व्यवस्था केव्हा अस्तित्वात आली हे कोणीही सांगू शकत नाही. मात्र जाती-पातीच्या नावावर राजकीय पोळी पाजून घेत आहेत. देशातल्या अठरापगड जाती ओबीसीच्या नावाखाली जोपर्यंत एकत्र येत नाहीत तोपर्यंत ओबीसीला न्याय मिळणे अशक्य आहे, असे मत व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे रविवारी ओबीसी जागृती मेळावा माजी केंद्रीय मंत्री खा. शरद यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. अध्यक्षस्थानी अ‍ॅड. प्रताप बांगर हे होते तर माजी आ. पांडुरंग ढोले, व्ही. के. जैन, धोबी संघटनेचे बालाजी शिंदे, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुभाष राऊत, अ‍ॅड. महादेव आंधळे, अशोक माळी, सावता परिषदेचे कल्याण आखाडे, विलास शिंदे, प्रकाश कानगावकर, प्रकाश राऊत, मंगल मोराळे, किशोर राऊत, बबन आंधळे, मोहन आघाव, प्रा. जगदीश जाधव, रफिक बागवान, गणेश जगताप, सुधीर जाधव यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक प्रा. सुशिला मोराळे यांनी केले. याप्रसंगी खा. शरद यादव म्हणाले की, समस्त ओबीसी समाजाला संपूर्ण अधिकार मिळालेले नाहीत. ओबीसीतील अठरापगड जातीला जाती-पातीत अडकवून ठेवले जात आहे. आमची श्रध्द अंधश्रध्देत बदलत चालली आहे. याचाच सत्ताधारी फायदा घेत आहेत. हा देश शेतकऱ्यांचा देश आहे. शेतकऱ्यांमध्ये ओबीसींची मोठी संख्या आहे. जो पर्यंत जाती-पातीच्या श्रृंखला तोडून आपण एकत्र येत नाहीत. तो पर्यंत आपला विकास होणार नाही. असे मत खा. यादव यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच प्रास्ताविकात प्रा. सुशिला मोराळे म्हणाल्या की, दुर्बल मानसिकतेतून ओबीसी समाज बाहेर यायला तयारच नाही. ओबीसी समाज हा देशाचा कणा आहे. या दृष्टीकोनातूनच जनता दलाने व्ही. पी. सिंगाच्या काळात मंडल आयोग लागू केला होता. मात्र या आयोगाची काँग्रेसच्या सरकारने पूर्णपणे अमलबजावणी न केल्याने ओबीसी ला न्याय मिळाला नाही. अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. अध्यक्षस्थानावरून बोलताना अ‍ॅड. प्रताप बांगर म्हणाले की, जो वर्ग बलवान आहे, तोच सत्तेची फळे चाकत आहेत. यामुळे ओबीसीला एकसंघ येऊन सक्षम बनावे लागेल असे त्यांनी सांगितले.धोबी संघटनेचे बालाजी शिंदे यांनी म्हटले की, ज्यांनी सुरुवातीच्या काळात मंडल आयोग लागू करण्यासाठी विरोध केला तेच आता आरक्षणाची मागणी करीत आहेत. न्याय व हक्कासाठी ओबीसीने एक संघ चळवळ उभी करण्याची गरज निर्माण झाली आहे. अंधश्रद्धेमुळे ओबीसीची अधोगती होत आहे. याचा विचार आता सर्वांनी करणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.हा कार्यक्रम तीन तास चालला. मराठवाड्यातून मेळाव्याला ओबीसी बांधवांची उपस्थिती होती. यावेळी व्ही.के. जैन, अ‍ॅड. महादेव आंधळे, माजी आमदार पांडुरंग ढोले यांनी मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)