शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची नवी खेळी! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
2
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
3
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
4
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
5
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
6
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
7
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
8
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल
9
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय
10
"तेव्हा विराट कोहलीने मला लाथ मारली होती अन् म्हणाला होता..."; इशांत शर्माने सगळंच सांगून टाकलं
11
इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
12
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!
13
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना पैसाच पैसा, धनसंचयात यश; पदोन्नती, गुंतवणुकीत मोठा फायदा!
14
हे रिअल शिंदे आहेत का? भर सभागृहात दुसरीत शिकणाऱ्या मुलीचा पालकांना प्रश्न, नेमके काय घडले?
15
बाळासाहेबांवर निष्ठा नसल्याने राऊतांवर पुस्तक काढण्याची वेळ : एकनाथ शिंदे
16
Ashish Ubale: 'गार्गी'चे दिग्दर्शक आशिष उबाळे यांची आत्महत्या, नागपूरमधील रामकृष्ण मठात घेतला गळफास
17
Income Tax Return : 'सहज' आणि 'सुगम' फॉर्म म्हणजे काय? आयटीआर भरण्यापूर्वी जाणून घ्या
18
सेक्स, ड्रग्ज, ब्लॅकमेलिंग...मस्क यांना अडकवण्याचा कट; माजी FBI अधिकाऱ्याचा दावा
19
२७७ प्रवाशांना घेऊन जाणारे मॅक्सिकन नौदलाचे जहाज न्यूयॉर्कच्या ब्रुकलिन ब्रीजला धडकले
20
बांगलादेशी तयार कपड्यांना भारतीय बंदरांची दारे बंद, परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाकडून अधिसूचना जारी

जाती व्यवस्था मोडीत काढल्याशिवाय न्याय अशक्य

By admin | Updated: August 11, 2014 00:18 IST

बीड : जाती-पातीच्या नावावर राजकीय पोळी पाजून घेत आहेत. देशातल्या अठरापगड जाती ओबीसीच्या नावाखाली जोपर्यंत एकत्र येत नाहीत तोपर्यंत ओबीसीला न्याय मिळणे अशक्य आहे, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

बीड : जात व्यवस्था केव्हा अस्तित्वात आली हे कोणीही सांगू शकत नाही. मात्र जाती-पातीच्या नावावर राजकीय पोळी पाजून घेत आहेत. देशातल्या अठरापगड जाती ओबीसीच्या नावाखाली जोपर्यंत एकत्र येत नाहीत तोपर्यंत ओबीसीला न्याय मिळणे अशक्य आहे, असे मत व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे रविवारी ओबीसी जागृती मेळावा माजी केंद्रीय मंत्री खा. शरद यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. अध्यक्षस्थानी अ‍ॅड. प्रताप बांगर हे होते तर माजी आ. पांडुरंग ढोले, व्ही. के. जैन, धोबी संघटनेचे बालाजी शिंदे, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुभाष राऊत, अ‍ॅड. महादेव आंधळे, अशोक माळी, सावता परिषदेचे कल्याण आखाडे, विलास शिंदे, प्रकाश कानगावकर, प्रकाश राऊत, मंगल मोराळे, किशोर राऊत, बबन आंधळे, मोहन आघाव, प्रा. जगदीश जाधव, रफिक बागवान, गणेश जगताप, सुधीर जाधव यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक प्रा. सुशिला मोराळे यांनी केले. याप्रसंगी खा. शरद यादव म्हणाले की, समस्त ओबीसी समाजाला संपूर्ण अधिकार मिळालेले नाहीत. ओबीसीतील अठरापगड जातीला जाती-पातीत अडकवून ठेवले जात आहे. आमची श्रध्द अंधश्रध्देत बदलत चालली आहे. याचाच सत्ताधारी फायदा घेत आहेत. हा देश शेतकऱ्यांचा देश आहे. शेतकऱ्यांमध्ये ओबीसींची मोठी संख्या आहे. जो पर्यंत जाती-पातीच्या श्रृंखला तोडून आपण एकत्र येत नाहीत. तो पर्यंत आपला विकास होणार नाही. असे मत खा. यादव यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच प्रास्ताविकात प्रा. सुशिला मोराळे म्हणाल्या की, दुर्बल मानसिकतेतून ओबीसी समाज बाहेर यायला तयारच नाही. ओबीसी समाज हा देशाचा कणा आहे. या दृष्टीकोनातूनच जनता दलाने व्ही. पी. सिंगाच्या काळात मंडल आयोग लागू केला होता. मात्र या आयोगाची काँग्रेसच्या सरकारने पूर्णपणे अमलबजावणी न केल्याने ओबीसी ला न्याय मिळाला नाही. अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. अध्यक्षस्थानावरून बोलताना अ‍ॅड. प्रताप बांगर म्हणाले की, जो वर्ग बलवान आहे, तोच सत्तेची फळे चाकत आहेत. यामुळे ओबीसीला एकसंघ येऊन सक्षम बनावे लागेल असे त्यांनी सांगितले.धोबी संघटनेचे बालाजी शिंदे यांनी म्हटले की, ज्यांनी सुरुवातीच्या काळात मंडल आयोग लागू करण्यासाठी विरोध केला तेच आता आरक्षणाची मागणी करीत आहेत. न्याय व हक्कासाठी ओबीसीने एक संघ चळवळ उभी करण्याची गरज निर्माण झाली आहे. अंधश्रद्धेमुळे ओबीसीची अधोगती होत आहे. याचा विचार आता सर्वांनी करणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.हा कार्यक्रम तीन तास चालला. मराठवाड्यातून मेळाव्याला ओबीसी बांधवांची उपस्थिती होती. यावेळी व्ही.के. जैन, अ‍ॅड. महादेव आंधळे, माजी आमदार पांडुरंग ढोले यांनी मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)