शहरं
Join us  
Trending Stories
1
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
2
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
3
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
4
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
5
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
6
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
7
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
8
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
9
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
10
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
11
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
12
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
13
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?
14
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
15
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
16
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
17
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
18
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
19
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
20
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!

औरंगाबाद शहरातील रस्त्याच्या कामाबद्दल खंडपीठाची सक्त नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 00:10 IST

शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्याच्या कामासाठी शासनाने गेल्यावर्षी १०० कोटींचा निधी महापालिकेला दिला आहे. मात्र, निविदा प्रक्रियेशिवाय रस्त्याचे काम अद्याप प्रत्यक्षात सुरूच झाले नाही.

ठळक मुद्देखंडपीठाचा इशारा : २ नोव्हेंबरपर्यंत रस्त्याच्या कामात प्रगती झाली नाही, तर निधी परत जाईल

औरंगाबाद : शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्याच्या कामासाठी शासनाने गेल्यावर्षी १०० कोटींचा निधी महापालिकेला दिला आहे. मात्र, निविदा प्रक्रियेशिवाय रस्त्याचे काम अद्याप प्रत्यक्षात सुरूच झाले नाही. महापालिकेने २ नोव्हेंबरपर्यंत शहरातील रस्त्याच्या कामांची प्रगती दाखविली नाही, तर शासन तो निधी परत घेऊ शकेल, अशा शब्दांत खंडपीठाने नाराजी व्यक्त केली. न्या. टी.व्ही. नलावडे आणि न्या. व्ही.व्ही. कंकणवाडी यांच्या खंडपीठात या जनहित याचिकेवर बुधवारी (दि.२४) सुनावणी झाली. पुढील सुनावणी २ नोव्हेंबरला होणार आहे.तसेच रेल्वेच्या नांदेड विभागाच्या उपमुख्य अभियंत्यांनी २ नोव्हेंबर रोजी व्यक्तिश: सुनावणीस हजर राहावे, असे निर्देशही खंडपीठाने दिले. रेल्वे विभागाने गोलवाडी येथील ‘फोर लेन’ उड्डाणपुलाच्या बांधकामाचा अंतिम नकाशा (जीएडी) सार्वजनिक बांधकाम विभागाला द्यावा, बांधकाम विभागाने दोन दिवसांत त्या नकाशाला मंजुरी देण्याचेही निर्देश खंडपीठाने दिले.आकाशवाणी येथील उड्डाणपूल आणि विमानतळासमोरील भुयारी मार्गाच्या २०० कोटी रुपयांच्या अंदाजित खर्चाच्या कामांना दिल्ली येथील राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाच्या सरव्यवस्थापकांनी २ नोव्हेंबरपर्यंत परवानगी देण्याचेही निर्देश खंडपीठाने दिले.२०१४ साली शहरातील १५ रस्त्यांच्या सुशोभीकरणासाठी ३० कोटींचा निधी आला होता. ही कामे आठ महिन्यांत पूर्ण करावयाची होती; परंतु चार वर्षांत कुठेही ‘झेब्रा क्रॉसिंग’ किंवा ‘लेन मार्किंग’ केले नसल्याचे याचिकाकर्ता अ‍ॅड. रूपेश जैस्वाल यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले असता एक महिन्यात ही कामे पूर्ण करण्याचेही निर्देश खंडपीठाने दिले. शहरातील रस्त्यांवरील दुभाजक (डिव्हायडर) पेट्रोलपंपांसमोर तसेच ठिकठिकाणी तोडले असून, त्यातून दुचाकी आणि लोक ये-जा करतात. त्यामुळे अनेक अपघात होतात. याबाबत पोलीस यंत्रणा आणि महापालिकेने गांभीर्याने कारवाई करणे जरूरी आहे, असेही मत खंडपीठाने व्यक्त केले. महावीर चौक ते विमानतळापर्यंतच्या रस्त्याचे काम डिसेंबर २०१८ पर्यंत पूर्ण केले जाईल, असे यावेळी खंडपीठास सांगण्यात आले.याचिकाकर्ता अ‍ॅड. रूपेश जैस्वाल यांनी आपली बाजू मांडली, तर महापालिकेतर्फे अ‍ॅड. राजेंद्र देशमुख, रेल्वेतर्फे अ‍ॅड. मनीष नावंदर, शासनातर्फे मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे व अ‍ॅड. नेरलीकर यांनी बाजू मांडली.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकCourtन्यायालय