शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भाला पावसाचा तडाखा! नागपूरमध्ये घरांमध्ये पाणी, शाळांना सुट्टी; पुरामुळे अनेक ठिकाणी संपर्क तुटला
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
टेस्ट पासून का रे दूरावा? किंग कोहली म्हणाला; दाढी पिकली रे भावा!
4
"साहेब, बायको पळाली"; ४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार; पतीची पोलिसांकडे धाव! म्हणाला... 
5
'या' आयपीओचं तुफान लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल; शेअर्स खरेदीची लूट
6
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
7
खळबळजनक! प्रायव्हेट व्हिडीओ दाखवून ३ कोटी उकळले अन् धमकावलं, CA ने आयुष्य संपवलं
8
आरारा....खतरनाक; कमी किमतीत स्मार्ट फीचर्स; Mahindra ने लॉन्च केली सर्वात SUV
9
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
10
'धुरंधर'मध्ये दिसलं पाकिस्तान, कुठे शूट झाले हे सीन्स? रणवीर सिंहच्या सिनेमाची चर्चा
11
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
12
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
13
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
14
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
15
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
16
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट
17
मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी २५० परप्रांतीय मजूर मुंबईत दाखल; काहींना विमानाने मुंबईत आणले
18
ही तर सोनमपेक्षा एक पाऊल पुढे! बॉयफ्रेंडसाठी पतीला विष दिलं अन् कुणालाही कळण्याआधी केला खेळ खल्लास!
19
Stock Market Today: ७६ अंकांनी घसरून उघडला सेन्सेक्स; ३ सेक्टर्समध्ये तेजी, का अस्थिर आहे मार्केट?
20
Pension Scheme: वृद्धापकाळात दरमहा ₹२०,५०० चं पेन्शन देईल ही स्कीम; पाहा याचे जबरदस्त ५ फायदे

औरंगाबाद शहरातील रस्त्याच्या कामाबद्दल खंडपीठाची सक्त नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 00:10 IST

शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्याच्या कामासाठी शासनाने गेल्यावर्षी १०० कोटींचा निधी महापालिकेला दिला आहे. मात्र, निविदा प्रक्रियेशिवाय रस्त्याचे काम अद्याप प्रत्यक्षात सुरूच झाले नाही.

ठळक मुद्देखंडपीठाचा इशारा : २ नोव्हेंबरपर्यंत रस्त्याच्या कामात प्रगती झाली नाही, तर निधी परत जाईल

औरंगाबाद : शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्याच्या कामासाठी शासनाने गेल्यावर्षी १०० कोटींचा निधी महापालिकेला दिला आहे. मात्र, निविदा प्रक्रियेशिवाय रस्त्याचे काम अद्याप प्रत्यक्षात सुरूच झाले नाही. महापालिकेने २ नोव्हेंबरपर्यंत शहरातील रस्त्याच्या कामांची प्रगती दाखविली नाही, तर शासन तो निधी परत घेऊ शकेल, अशा शब्दांत खंडपीठाने नाराजी व्यक्त केली. न्या. टी.व्ही. नलावडे आणि न्या. व्ही.व्ही. कंकणवाडी यांच्या खंडपीठात या जनहित याचिकेवर बुधवारी (दि.२४) सुनावणी झाली. पुढील सुनावणी २ नोव्हेंबरला होणार आहे.तसेच रेल्वेच्या नांदेड विभागाच्या उपमुख्य अभियंत्यांनी २ नोव्हेंबर रोजी व्यक्तिश: सुनावणीस हजर राहावे, असे निर्देशही खंडपीठाने दिले. रेल्वे विभागाने गोलवाडी येथील ‘फोर लेन’ उड्डाणपुलाच्या बांधकामाचा अंतिम नकाशा (जीएडी) सार्वजनिक बांधकाम विभागाला द्यावा, बांधकाम विभागाने दोन दिवसांत त्या नकाशाला मंजुरी देण्याचेही निर्देश खंडपीठाने दिले.आकाशवाणी येथील उड्डाणपूल आणि विमानतळासमोरील भुयारी मार्गाच्या २०० कोटी रुपयांच्या अंदाजित खर्चाच्या कामांना दिल्ली येथील राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाच्या सरव्यवस्थापकांनी २ नोव्हेंबरपर्यंत परवानगी देण्याचेही निर्देश खंडपीठाने दिले.२०१४ साली शहरातील १५ रस्त्यांच्या सुशोभीकरणासाठी ३० कोटींचा निधी आला होता. ही कामे आठ महिन्यांत पूर्ण करावयाची होती; परंतु चार वर्षांत कुठेही ‘झेब्रा क्रॉसिंग’ किंवा ‘लेन मार्किंग’ केले नसल्याचे याचिकाकर्ता अ‍ॅड. रूपेश जैस्वाल यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले असता एक महिन्यात ही कामे पूर्ण करण्याचेही निर्देश खंडपीठाने दिले. शहरातील रस्त्यांवरील दुभाजक (डिव्हायडर) पेट्रोलपंपांसमोर तसेच ठिकठिकाणी तोडले असून, त्यातून दुचाकी आणि लोक ये-जा करतात. त्यामुळे अनेक अपघात होतात. याबाबत पोलीस यंत्रणा आणि महापालिकेने गांभीर्याने कारवाई करणे जरूरी आहे, असेही मत खंडपीठाने व्यक्त केले. महावीर चौक ते विमानतळापर्यंतच्या रस्त्याचे काम डिसेंबर २०१८ पर्यंत पूर्ण केले जाईल, असे यावेळी खंडपीठास सांगण्यात आले.याचिकाकर्ता अ‍ॅड. रूपेश जैस्वाल यांनी आपली बाजू मांडली, तर महापालिकेतर्फे अ‍ॅड. राजेंद्र देशमुख, रेल्वेतर्फे अ‍ॅड. मनीष नावंदर, शासनातर्फे मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे व अ‍ॅड. नेरलीकर यांनी बाजू मांडली.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकCourtन्यायालय