शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलंबियाची ४८ तासांत कोलांटी उडी! शशी थरूरनी शाळाच घेतली; पाकिस्तानच्या बाजुने केलेले वक्तव्य मागे घ्यायला लावले
2
पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत
3
'या' ४ ठिकाणी पत्नी मिळवून देऊ शकते जबरदस्त नफा; पाहा कोणत्या आहेत या स्कीम्स?
4
आजचे राशीभविष्य: शनिवार 31 मे 2025; खर्चाचे प्रमाण वाढेल, एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो
5
'केईएम'मध्ये पुन्हा पाणी साचायला नको, उपाययोजनांसह प्रतिज्ञापत्र सादर करा : हायकोर्ट
6
युद्धनौका, पाणबुड्यांची नावे, ठावठिकाणा वर्माने पाकला पुरवला; कोठडीत रवानगी
7
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
8
राज्यात साडेएकवीस हजार शासकीय वाहने भंगारात; अपघातांसह प्रदूषणास बसेल आळा
9
गेट लॉस्ट, मि. मस्क! दुसऱ्याच्या पदच्युतीसाठी किमान चार वर्षे लागतील
10
गाळ टाकण्याच्या जागेतही हेराफेरी; लॉगशीटवर गुंदवली, माल उतरवला दिवे गावात!
11
विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. तटकरे यांचे स्पष्टीकरण
12
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
13
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही
14
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान एकाकी पडला; तालिबानशी संबंध सुधारण्याची घोषणा
15
आधी कॅच घेताना गडबडला; बॅटिंग करताना Hit Wicket झाला! मग नेटकऱ्यांमध्ये रंगली मॅच 'फिक्सिंग'ची चर्चा
16
"राज्यपातळीवरुन 'गोकुळ'च्या राजकारणात हस्तक्षेप झाला नाही..."; सतेज पाटलांनी स्पष्टच सांगितलं
17
MI vs GT : हार्दिक पांड्याची कडक फटकेबाजी; त्याच्या षटकारानंतर लक्षवेधी ठरली ही सुंदरी (VIDEO)
18
रेल्वेकडून धाराशिवचे नामांतर फायनल, दोन स्थानके निर्णयाधिन;अहिल्यानगर आणि छ. संभाजीनगरला प्रतिक्षा : रेल्वे बोर्डाकडून होणार निर्णय

केवळ मलमपट्टी!

By admin | Updated: September 4, 2014 01:26 IST

सोमनाथ खताळ , बीड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. हे खड्डे बुजविण्यास बुधवारी सुरूवात केली मात्र खड्ड्यांमध्ये मोठ मोठे दगड असलेला

सोमनाथ खताळ , बीड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. हे खड्डे बुजविण्यास बुधवारी सुरूवात केली मात्र खड्ड्यांमध्ये मोठ मोठे दगड असलेला मुरूम टाकून केवळ मलमपट्टी करण्याचे काम संबंधित विभाग करीत होता. या मलमपट्टीमुळे अपघात रोखण्याऐवजी वाढण्याचीच अधिक भीती वर्तविली जात आहे. खड्डे बुजविण्यास सुरूवात झाली असली तरी अपघाताची मालिका मात्र काही केल्या थांबत नव्हती. अनेक दिवसांपासून हुलकावणी दिलेल्या पावसाने मागील पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात ठिकठिकाणी बरसायला सुरूवात केली आहे. या पावसामुळे बळीराजा खूश झाला आहे. याच पावसाने महामार्गाचे निकृष्ट दर्जाचे झालेले काम जनतेसमोर आले आहे. जालना रोडहून बार्शीनाका हे अंतर पार करण्यासाठी वाहनचालकांना तब्बल अर्ध्या तासाचा अवधी लागतो. या रस्त्यावरून अवजड वाहनांची वाहतूक खूप मोठी असून त्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. अगोदरच बीड शहराला बायपास आणि उड्डाणपूल नसल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. यातच आणखी भर म्हणून महामार्गावर खड्डे पडले आहेत. याच खड्ड्यांंमुळे सध्या छोटे-मोठे अपघात मोठया प्रमाणात घडत आहेत. मागील पंधरा दिवसांपासून दुचाकी घसरणे, चारचाकी वाहन खड्ड्यांंमध्ये आदळून पार्ट तुटणे, अवजड वाहने पुढे चालत असताना मागील वाहन खड्ड्यांत आदळून अपघात होणे, यासारखे अनेक छोटेमोठे अपघात घडत आहेत. मंगळवारी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी महामार्गावरील खड्ड्यांची पाहणी केली होती. त्यानंतर बुधवारी महामार्गावरील खड्डे बुजविण्यास सुरूवात करण्यात आली होती. मात्र हे खड्डे मोठ मोठे दगड असलेला मुरूम टाकून बुजविले जात होते. त्यामुळे जी अपघाताची मालिका सुरू होती, ती काही केल्या बंद झाली नव्हती. संघटना, पुढारी झोपले! एवढे जीवघेणे खड्डे महामार्गावर पडले असताना कोणतीही सामाजिक संघटना, पुढारी यावर आवाज उठविण्यास तयार नाहीत. एरव्ही प्रसिद्धीसाठी पुढे पुढे करणारे सामाजिक कार्यकर्ते, पुढारी गेले कुठे? असा सवाल सर्वसामान्यांमधून उपस्थित केला जात आहे. नगर रोडवर टाकली बारीक खडी बुधवारी नगर रोडवरीलही खड्डे बुजविण्यास सुरूवात केली होती. या खड्ड्यांमध्ये टाकण्यात येणारा मुरूमही खराब होता. तसेच मुरूम टाकल्यानंतर पाणी टाकून १० एमएमची बारीक खडी त्यावर टाकण्यात येत होती. मात्र बुजविलेले खड्डे किती दिवस टिकतील? हे सांगणे कठीणआहे. मोठा पाऊस आला तर लवकरच हे खड्डे उखडतील आणि नाही आला तर किमान दोन महिने हे खड्डे टिकू शकतात, असे सा.बां.चे उपविभागीय अधिकारी एस.सी.दंडे यांनी सांगितले. शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी, अरूंद रस्ता, अतिक्रमण, बायपास व उड्डाणपुल नसणे आदींमुळे विद्यार्थ्यांपासून ते पोलिसांपर्यंत बळी गेलेले आहेत. ४अपघात झाल्यानंतरच संघटना, पुढारी यांना जाग येते आणि मोर्चे, आंदोलने करतात. ४काही कालावधीनंतर हेच लोक अपघात विसरून जातात आणि जैसे थे परिस्थिती पुन्हा पहावयास मिळते. ४त्यानंतर पुन्हा अपघात झाल्यावर याच संघटना व पुढारी पहिल्यासारखेच करतात. ४प्रशासन ढिम्म तर संघटना थंड असल्याचे चित्र निर्माण झाले आहे़ ४त्यामुळे सामान्यांना खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागत आहे़