शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत कुणाचं पारडं जड? एनडीए की इंडिया, कोण मारणार बाजी, असं आहे संसदेतील मतांचं गणित  
2
"ते मराठीत न बोलल्याने भाषेला भोकं पडणार का?’’, अभिनेत्री केतकी चितळेचं वादग्रस्त विधान
3
"सोनिया गांधी आमच्या देवी आहेत, त्यांनी…”, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी उधळली स्तुतीसुमने   
4
WTC मध्ये भारताचा टॉपर ठरला रिषभ पंत! हिटमॅन रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडला
5
हे सारं मी त्यांच्या सांगण्यावरून केलं, बनावट दूतावास चालवणाऱ्या हर्षवर्धनचा धक्कादायक दावा   
6
IND vs ENG 4th Test Day 2 Stumps: मॅच आधी गिलनं ज्यांना डिवचलं त्या दोघांनीच दमवलं; शेवटी...
7
Asia Cup 2025 : बीसीसीआय UAE च्या मैदानात स्पर्धा घेणार; भारत-पाक हायहोल्टेज मॅचही पाहायला मिळणार?
8
Anshul Kamboj vs Ben Duckett: अंशुल कंबोजची पहिली टेस्ट विकेट! बेन डकेट 'नर्व्हस नाइंटी'चा शिकार
9
"देशासाठी लढणारा मराठी माणूस कधी..., काहींना शिवरायांच्या नावाची ॲलर्जी"; मुख्यमंत्री फडणवीस यांचं जोरदार भाषण
10
Hulk Hogan Death: 'बालपणीचा सुपरहिरो' प्रसिद्ध WWE स्टार हल्क होगनचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
मग मृतांना निवडणुकीत मतदान करायला द्यायचं का? राहुल-तेजस्वींना निवडणूक आयोगाचा सवाल
12
VIDEO: ती आली अन् थेट त्याला बिलगली... चहल-महावशची एकमेकांना घट्ट मिठी, क्लिप व्हायरल
13
चक्क दारूच्या ट्रकवर राज्यामंत्र्याचे नाव, ४० लाखांची विदेशी दारू, सात आराेपींना घेतले ताब्यात
14
'या लोकांचे प्रफुल्ल लोढासोबत काय संबंध आहेत?', गिरीश महाजनांच्या संयमाचा कडेलोट, 'मविआ'ला थेट फोटोच दाखवले
15
दिल्लीतील JNU मधील देवेंद्र फणडवीसांच्या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांचं आंदोलन, महायुती सरकारविरोधात घोषणाबाजी
16
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी गुप्तचर संस्थेत नोकरी; मुंबई, नागपूरसाठी 'इतक्या' जागा राखीव!
17
Rishabh Pant Fifty : भारताच्या 'जखमी वाघा'ची डरकाळी! लढवय्या पंतनं ठोकली सॉलिड फिफ्टी
18
₹1600 वर पोहोचू शकतो इलेक्ट्रिक बस बनवणाऱ्या कंपनीचा शेअर, खरेदीसाठी उडालीय लोकांची झुंबड; करतोय मालामाल!
19
स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणी राहुल गांधी यांना नाशिकच्या कोर्टात जामीन
20
वाघाच्या काळजाचा! जखमी असूनही इंग्लंडशी भिडला, मँचेस्टरमध्ये पंतची विक्रमी खेळी

केवळ मलमपट्टी!

By admin | Updated: September 4, 2014 01:26 IST

सोमनाथ खताळ , बीड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. हे खड्डे बुजविण्यास बुधवारी सुरूवात केली मात्र खड्ड्यांमध्ये मोठ मोठे दगड असलेला

सोमनाथ खताळ , बीड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. हे खड्डे बुजविण्यास बुधवारी सुरूवात केली मात्र खड्ड्यांमध्ये मोठ मोठे दगड असलेला मुरूम टाकून केवळ मलमपट्टी करण्याचे काम संबंधित विभाग करीत होता. या मलमपट्टीमुळे अपघात रोखण्याऐवजी वाढण्याचीच अधिक भीती वर्तविली जात आहे. खड्डे बुजविण्यास सुरूवात झाली असली तरी अपघाताची मालिका मात्र काही केल्या थांबत नव्हती. अनेक दिवसांपासून हुलकावणी दिलेल्या पावसाने मागील पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात ठिकठिकाणी बरसायला सुरूवात केली आहे. या पावसामुळे बळीराजा खूश झाला आहे. याच पावसाने महामार्गाचे निकृष्ट दर्जाचे झालेले काम जनतेसमोर आले आहे. जालना रोडहून बार्शीनाका हे अंतर पार करण्यासाठी वाहनचालकांना तब्बल अर्ध्या तासाचा अवधी लागतो. या रस्त्यावरून अवजड वाहनांची वाहतूक खूप मोठी असून त्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. अगोदरच बीड शहराला बायपास आणि उड्डाणपूल नसल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. यातच आणखी भर म्हणून महामार्गावर खड्डे पडले आहेत. याच खड्ड्यांंमुळे सध्या छोटे-मोठे अपघात मोठया प्रमाणात घडत आहेत. मागील पंधरा दिवसांपासून दुचाकी घसरणे, चारचाकी वाहन खड्ड्यांंमध्ये आदळून पार्ट तुटणे, अवजड वाहने पुढे चालत असताना मागील वाहन खड्ड्यांत आदळून अपघात होणे, यासारखे अनेक छोटेमोठे अपघात घडत आहेत. मंगळवारी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी महामार्गावरील खड्ड्यांची पाहणी केली होती. त्यानंतर बुधवारी महामार्गावरील खड्डे बुजविण्यास सुरूवात करण्यात आली होती. मात्र हे खड्डे मोठ मोठे दगड असलेला मुरूम टाकून बुजविले जात होते. त्यामुळे जी अपघाताची मालिका सुरू होती, ती काही केल्या बंद झाली नव्हती. संघटना, पुढारी झोपले! एवढे जीवघेणे खड्डे महामार्गावर पडले असताना कोणतीही सामाजिक संघटना, पुढारी यावर आवाज उठविण्यास तयार नाहीत. एरव्ही प्रसिद्धीसाठी पुढे पुढे करणारे सामाजिक कार्यकर्ते, पुढारी गेले कुठे? असा सवाल सर्वसामान्यांमधून उपस्थित केला जात आहे. नगर रोडवर टाकली बारीक खडी बुधवारी नगर रोडवरीलही खड्डे बुजविण्यास सुरूवात केली होती. या खड्ड्यांमध्ये टाकण्यात येणारा मुरूमही खराब होता. तसेच मुरूम टाकल्यानंतर पाणी टाकून १० एमएमची बारीक खडी त्यावर टाकण्यात येत होती. मात्र बुजविलेले खड्डे किती दिवस टिकतील? हे सांगणे कठीणआहे. मोठा पाऊस आला तर लवकरच हे खड्डे उखडतील आणि नाही आला तर किमान दोन महिने हे खड्डे टिकू शकतात, असे सा.बां.चे उपविभागीय अधिकारी एस.सी.दंडे यांनी सांगितले. शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी, अरूंद रस्ता, अतिक्रमण, बायपास व उड्डाणपुल नसणे आदींमुळे विद्यार्थ्यांपासून ते पोलिसांपर्यंत बळी गेलेले आहेत. ४अपघात झाल्यानंतरच संघटना, पुढारी यांना जाग येते आणि मोर्चे, आंदोलने करतात. ४काही कालावधीनंतर हेच लोक अपघात विसरून जातात आणि जैसे थे परिस्थिती पुन्हा पहावयास मिळते. ४त्यानंतर पुन्हा अपघात झाल्यावर याच संघटना व पुढारी पहिल्यासारखेच करतात. ४प्रशासन ढिम्म तर संघटना थंड असल्याचे चित्र निर्माण झाले आहे़ ४त्यामुळे सामान्यांना खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागत आहे़