शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

बौद्ध होण्याचे नुसतेच सोंगढोंग

By admin | Updated: September 11, 2016 01:22 IST

औरंगाबाद : बौद्ध होणे ही साधी गोष्ट नाही. लोकांनी इथे गाड्या आणि घरांना त्यावर नाव लिहून बौद्ध बनविले; पण घरातील माणसं मात्र बौद्ध झाली नाहीत.

औरंगाबाद : बौद्ध होणे ही साधी गोष्ट नाही. त्यासाठी सदाचारी बनावे लागते. वाईट गोष्टीचा त्याग करावा लागतो. लोकांनी इथे गाड्या आणि घरांना त्यावर नाव लिहून बौद्ध बनविले; पण घरातील माणसं मात्र बौद्ध झाली नाहीत. आम्ही बौद्ध असल्याची नुसती सोंगढोंगच करीत आहोत, अशी खंत भदन्त विशुद्धानंद बोधी महाथेरो यांनी व्यक्त केली.अनिलकुमार सोनकामळे लिखित ‘दलित नही, बौद्ध कहो’ या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन शनिवारी भदन्त विशुद्धानंद बोधी महाथेरो यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे अशोक कांबळे होते. व्यासपीठावर प्रा. डॉ. सुधीर गव्हाणे, डॉ. अरविंद गायकवाड, प्रसिद्ध कवी प्रतापसिंग बोदडे, बौद्ध महासभेचे अ‍ॅड. एस. आर. बोदडे, मनपा स्थायी समितीचे माजी सभापती रतनकुमार पंडागळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. विशुद्धानंद बोधी म्हणाले, गेल्या ३६ वर्षांपासून मी बौद्ध बनविण्याच्या प्रक्रियेत स्वत:ला वाहून घेतले आहे. तरीही इथल्या लोकांना मी अजून बौद्ध बनवू शकलो नाही ही माझ्यासाठी शोकांतिका आहे. इथे लोकांनी गाड्या, घरांना बौद्ध बनविले. घरांना सम्यक नाव दिले; पण स्वत: बुद्धाचे आचरण केलेले नाही. आम्ही नुसते सोंगढोंग करतो आहोत. गाडीवर बौद्ध असल्याचे लिहितो, पण त्याच गाडीवर बसून जाताना जर एखाद्याने ओव्हरटेक केले तर लगेच त्याला शिवी हासडतो. मग आम्ही बौद्ध कसे. आम्ही स्वत:ला बुद्धाचे, आंबेडकरांचे अनुयायी म्हणतो आणि दुसरीकडे खा, प्या, मजा करा अशा पद्धतीने जगतो आहोत. जयभीम बोलो आणि कही भी चलो असे आमचे वागणे सुरू आहे. हे बदलले पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले. तत्पूर्वी डॉ. अरविंद गायकवाड यांनी दलित नही बौद्ध कहो या पुस्तकावर भाष्य केले. दलित ही त्याज्य असलेली ओळख झुगारून बौद्ध अशी नवीन ओळख करून देण्याचा महत्त्वाचा मुद्दा या पुस्तकात मांडला आहे. परंतु केवळ अशी ओळख करून देऊन चालणार नाही तर ते करताना बौद्ध बनविण्याची प्रक्रिया आणखी एक पाऊल पुढे आली पाहिजे. बौद्ध समाज परिवर्तनाच्या चळवळीत वेगाने पुढे जात आहे, असेही डॉ. गायकवाड म्हणाले. यावेळी प्रतापसिंग बोदडे यांनी आपण आपल्या लेखनात यापुढे दलित हा शब्द वापरणार नसल्याचे स्पष्ट केले. सुरुवातीला लेखक अनिलकुमार सोनकामळे यांनी दलित हा शब्द असंवैधानिक असून तो बाबासाहेबांनाही पसंत नव्हता. हा शब्द त्याज्य किंवा कमी लेखणारा आहे. त्यामुळे मागासवर्गीयांनी यापुढे दलित अशी ओळख करून देऊ नये, असे आवाहन केले.