शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

१५ जूनपर्यंत मान्सून येणार

By admin | Updated: May 23, 2016 01:23 IST

औरंगाबाद : चक्रीवादळामुळे मान्सूनच्या वाटचालीत अडथळा निर्माण झाला आहे. पण लवकरच मान्सूनसाठी पोषक वातावरण निर्मिती होणार आहे.

औरंगाबाद : चक्रीवादळामुळे मान्सूनच्या वाटचालीत अडथळा निर्माण झाला आहे. पण लवकरच मान्सूनसाठी पोषक वातावरण निर्मिती होणार आहे. त्यामुळे सर्वसाधारणपणे १२ ते १५ जूनदरम्यान मान्सूनचे मराठवाड्यात आगमन होईल, असा अंदाज एमजीएम खगोलशास्त्र व अंतराळ संशोधन केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी व्यक्त केला आहे. भीषण दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या मराठवाड्यात सध्या पावसाची आतुरतेने प्रतीक्षा सुरू आहे. त्यात हवामान खात्याने यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे विभागातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तरीही मान्सूनच्या आगमनाच्या तारखेबद्दल अजून अनिश्चितता आहे. अंदमान आणि बंगालच्या उपसागराचा बहुतांश भाग व्यापल्यानंतर केरळकडे निघालेल्या नैऋत्य मान्सूनचा प्रवास थोडा रखडला आहे. यामुळे मान्सूनचे केरळातील आगमन २८ मे ऐवजी ३ जूनच्या आसपास होण्याचीच शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. महासेन नावाच्या चक्रीवादळाने मान्सूनच्या वाऱ्यामध्ये आर्द्रता निर्माण केल्याने या वाऱ्यांमध्ये कोरडेपणा निर्माण झाला आहे. यामुळे मान्सूनची प्रगती खुंटली आहे, असे हवामान खात्याचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर एमजीएम खगोलशास्त्र व अंतराळ संशोधन केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी मान्सूनच्या मराठवाड्यातील आगमनाविषयी अंदाज व्यक्त केला आहे. चक्रीवादळामुळे मान्सूनची वाटचाल अजून थांबलेली आहे. परंतु लवकरच हे वातावरण बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे ३ जूनच्या आसपास मान्सून केरळमध्ये दाखल होईल. त्यानंतर तो मराठवाड्यात पोहोचण्यास साधारणत: आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागेल.