शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
2
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
3
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
4
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
5
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
6
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
7
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
8
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
9
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
10
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
11
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
12
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
13
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
14
परीक्षेच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थिनीने केली आत्महत्या; लातूरच्या शासकीय महिला तंत्रनिकेतनच्या वसतिगृहात घेतला गळफास
15
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
16
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
17
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
18
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
19
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
20
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!

पत्रकार ते आमदारापर्यंतचा प्रवास!

By admin | Updated: October 22, 2014 01:21 IST

औरंगाबाद : पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करताना राजकीय मंडळींसोबत अनेकांचा घनिष्ठ संबंध येतो.

औरंगाबाद : पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करताना राजकीय मंडळींसोबत अनेकांचा घनिष्ठ संबंध येतो. या संबंधातून अनेकजण निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतात; पण यश प्रत्येकाच्या पदरी पडत नाही. तब्बल २२ वर्षे पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करणारे ज्येष्ठ पत्रकार इम्तियाज जलील यांनी अचानकपणे नोकरीला सोडचिठ्ठी देत आपली कर्मभूमी असलेल्या औरंगाबादेतून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. अवघ्या एक महिन्यातील त्यांच्या या राजकीय प्रवासात त्यांनी घवघवीत यशही संपादन केले हे विशेष.इम्तियाज जलील यांचा जन्म औरंगाबादचा. मौलाना आझाद महाविद्यालयात शिक्षण घेतले. शिक्षणानंतर त्यांनी आपले करिअर पत्रकारितेत करण्याचा निर्णय घेतला. ‘लोकमत’टाईम्समध्ये त्यांनी तब्बल १२ वर्षे काम केले. त्यानंतर ‘एनडीटीव्ही’या वृत्त वाहिनीत त्यांनी पुण्यात वरिष्ठ पत्रकार म्हणून काम सुरू केले. या ठिकाणीही १२ वर्षे काम केल्यावर अचानक नोकरीला सोडचिठ्ठी दिली. मागील महिन्यात २० सप्टेंबरला त्यांनी औरंगाबाद गाठले. मित्र परिवाराला त्यांनी सांगितले की, मी औरंगाबाद मध्य मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. विनोदी प्रवृत्ती, हजरजवाबीपणा हे त्यांचे वैशिष्ट्ये राहिल्याने सुरुवातीला मित्रांना वाटले की, हा चेष्टा करीत आहे. त्याने मित्रांना सांगितले की, मी मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लमिनकडून (एमआयएम) निवडणूक लढविणार आहे.एमआयएम या नवख्या पक्षाची औरंगाबादेत काय डाळ शिजेल, दिग्गज आणि मातब्बर उमेदवारांसमोर आपला काय निभाव लागेल. निवडणुकीसाठी किती कोटी लागतील, असे अनेक अंदाज बांधत मित्रपरिवाराने त्यांना या भानगडीत न पडण्याचा सल्ला दिला. मात्र, इम्तियाज यांचा इरादा आणि मनसुबे अटळ होते. ते इंचभरही मागे हटले नाहीत. २५ सप्टेंबर रोजी त्यांनी एमआयएमकडून उमेदवारी अर्जही दाखल केला. १५ आॅक्टोबर रोजी मतदान घेण्यात आले तेव्हा तमाम मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन मतदान केले. १९ रोजी मतपेट्या उघडल्या तेव्हा जनतेने कौल पत्रकार इम्तियाज जलील यांच्या पारड्यात टाकला होता.उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी अवघ्या काही दिवसांमध्ये मतदारसंघ प्रचाराच्या निमित्ताने ढवळून काढला. आबालवृद्धांकडून त्यांना सकारात्मक प्रतिसादही मिळू लागला. एमआयएमचे प्रमुख अकबर ओवेसी आणि असदोद्दीन ओवेसी यांनी आमखास मैदानावर दोन जाहीर सभा घेऊन इम्तियाज जलील यांच्या विजयावर जणू शिक्कामोर्तबच केले होते.