शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

मागासवर्गीय विद्यार्थ्यांची थट्टा

By admin | Updated: July 27, 2015 01:11 IST

उस्मानाबाद : विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लागावा, यासाठी भारत सरकार मॅट्रीकेत्तर शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे.

उस्मानाबाद : विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लागावा, यासाठी भारत सरकार मॅट्रीकेत्तर शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे. परंतु, उद्देश केवळ कागदावरच रहात असल्याचे दिसून येत आहे. २०१४-२०१५ हे शैक्षणिक वर्ष सरूनही जिल्हाभरातील तब्बल एक हजारावर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळालेली नाही. याबाबत समाजकल्याण विभागाकडे चौकशी केली असता रक्कम ‘कॅरी फॉरवर्ड’ होत नसल्याचे कारण देण्यात आले.अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इमाव आणि विमाप्र या संवर्गातील विद्यार्थ्यांना मॅट्रीकेत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क या योजनेच्या माध्यमातून शिक्षणासाठी आर्थिक हातभार लावला जातो. पैशाअभावी शिक्षणामध्ये खंड पडू नये, हा यामागचा उद्देश. २०१४-२०१५ या आर्थिक वर्षामध्ये जिल्हाभरातील तब्बल दीड हजारावर विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी आॅनलाईन अर्ज दाखल केले होते. या विद्यार्थ्यांना संबंधित शैक्षणिक वर्षातच शिष्यवृत्तीची रक्कम मिळणे अपेक्षित होते. परंतु, संबंधित शैक्षणिक वर्ष सरले तरी त्यांना शिष्यवृत्ती मिळालेली नाही. त्यामुळे शासनाचा उद्देश कागदावरच रहात असल्याचे या निमित्ताने समोर आले आहे. यापैकी काही विद्यार्थ्यांनी वारंवार पाठपुरवा केला आहे. परंतु, त्यांना ठरलेली शासकीय उत्तरे दिली जात आहेत. या प्रकाराबाबत लाभार्थी विद्यार्थ्यांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालयाशी संपर्क साधला असता एप्रिल २०१५ मध्ये निधी उपलब्ध झाला आहे. परंतु, अनेक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची रक्कम ‘कॅरी फॉरवर्ड’ होत नसल्याचे सांगण्यात आले. याबाबत लवकरच तोडगा निघेल, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.उपरोक्त योजनेअंतर्गत तरतूद प्राप्त होवूनही संबंधित लाभार्थी विद्यार्थ्यांचे अर्ज प्रलंबित असल्याचे समोर आल्यानंतर समाजकल्याण आयुक्त यांनी सहाय्यक आयुक्तांना १७ जून २०१५ रोजी पत्र दिले होते. विद्यार्थ्यांचे अर्ज निकाली काढण्यात अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे सदरील पत्रात म्हटले होते. सदरील बाब अत्यंत गंभीर असल्याचे सांगत जिल्हास्तरावर प्रलंबित असलेले अर्ज तातडीने निकाली काढण्याचे आदेश दिले होते. असे असतानाही या प्रक्रियेला गती आलेली नाही. त्यामुळे आजही सदरील विद्यार्थी कार्यालयाचे उंबरठे झिजवित आहेत. लोकशाही दिनी तक्रार४शिष्यवृत्तीसाठी आॅनलाईन फॉर्म भरूनही शिष्यवृत्ती न मिळाल्यामुळे एस. एच. कांबळे यांनी लोकशाही दिनी तक्रार नोंदविली होती. त्यावेळी सहाय्यक समाजकल्याण आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत स्पष्टीकरण दिले होते. २०१४-२०१५ या वर्षाची आर्थिक तरतूद २०१५-२०१६ या वर्षात झाल्याचे सांगत काही विद्यार्थ्यांसाठीची तरतूद असूनही ती ‘कॅरी फॉरवर्ड’ होत नाही. त्यामुळे आॅनलाईन पद्धतीने देयक तयार करता येत नाही, असे त्यात स्पष्ट करण्यात आले होते. सदरील त्रुटी दूर होताच शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्याच्या खात्यावर वर्ग केली जाईल, असे सांगितले होते.