शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
2
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
4
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
5
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
6
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
7
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
8
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
9
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
10
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
11
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
12
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
13
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
14
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
15
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
16
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
17
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
18
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
19
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
20
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...

भाजप सरकारमुळेच नांदेडातील जेएनएनयुआरएमची कामे बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 00:22 IST

खोटी आश्वासने देवून साडे तीन वर्षांपूर्वी सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने नांदेडातील जेएनएनयुआरएमची कामे बंद पाडली आहेत़ या योजनेअंतर्गत आलेला तब्बल ३०० कोटींचा निधी त्यामुळे परत गेला़ स्मार्ट सिटी योजनेतूनही नांदेडला डावलण्यात आले़ त्यामुळे अशा जुमलेबाज सरकारच्या थापावर विश्वास ठेवू नका, असे आवाहन काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केले़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : खोटी आश्वासने देवून साडे तीन वर्षांपूर्वी सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने नांदेडातील जेएनएनयुआरएमची कामे बंद पाडली आहेत़ या योजनेअंतर्गत आलेला तब्बल ३०० कोटींचा निधी त्यामुळे परत गेला़ स्मार्ट सिटी योजनेतूनही नांदेडला डावलण्यात आले़ त्यामुळे अशा जुमलेबाज सरकारच्या थापावर विश्वास ठेवू नका, असे आवाहन काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केले़अतिथी हॉटेलमध्ये आयोजित पत्रपरिषदेत अतुल लोंढे म्हणाले, देशात गेल्या साडेतीन वर्षांत झालेल्या प्रत्येक निवडणुकीत भाजप सरकारने खोटी आश्वासने देवून सत्ता मिळविली़ सत्तेतून पैसा अन् पैशातून सत्ता असे समीकरणच झाले आहे़ लाखो कोटींच्या घोषणा करायच्या अन् प्रत्यक्षात एक रुपयाही द्यायचा नाही़ अशी जुमलेबाजी सातत्याने सुरु आहे़ ‘मेक इन इंडिया’ यासारख्या योजना फुसका बार निघाल्या आहेत़ त्यामुळे आता अर्थव्यवस्था भीषण संकटात सापडली आहे़ जीडीपी सातत्याने घसरत चालला आहे़ परंतु मोदी सरकारमधील कुणीही अर्थव्यवस्था, जीडीपी या विषयावर बोलण्यास तयार नाही़ उलट सरकारच्या निर्णयावर सोशल माध्यमातून टीका करणाºयांवर मात्र थेट पोलीस कारवाई करण्याचा सपाटाच सुरु केला आहे़ या कारवाईचा काँग्रेस निषेधच करते़ज्या-ज्या ठिकाणी भाजपाची सत्ता आहे़ त्या-त्या ठिकाणच्या नागरिकांची आता भाजपाकडून फसवणूक झाल्याची भावना निर्माण झाली आहे़ जकात, एलबीटी बंद केल्यानंतर महापालिकांना १४ टक्के नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन देण्यात आले होते़ प्रत्यक्षात ते ८ टक्के देण्यात आले़ त्यामुळे महापालिकेकडे कर्मचाºयांचे वेतन करण्याएवढेही पैसे नाहीत़नांदेडचा चेहरामोहरा बदलणाºया जवाहरलाल नेहरु नागरी पुनरुत्थान योजनेची नांदेडातील कामे या सरकारने बंद पाडली़ स्मार्ट सिटीमधूनही नांदेडचे नाव वगळण्यात आले़ परंतु स्मार्ट सिटी ही सुद्धा अशीच फसवी घोषणा असून या योजनेत समाविष्ट देशभरातील शहरांसाठी केवळ सात हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे़नांदेडकरांना माजी गृहमंत्री दिवंगत शंकरराव आणि आता माजी मुख्यमंत्री खा़ अशोकराव चव्हाण यांच्यासारखे दूरदृष्टीचे नेतृत्व लाभले आहे़ नांदेडकरांची आसक्ती आणि प्रतिभावान नेतृत्वामुळे नांदेडचा आजपर्यंत विकास झाला आहे़ लवकरच राज्यात सत्तांतर होणार असून पुन्हा राज्याचे नेतृत्व नांदेडकडेच येणार असल्याचेही लोंढे म्हणाले़भाजपाच्या प्रभारींचे त्यांच्या नेत्यांकडे किती वजन आहे? ते फार छोटे नेते आहेत़ त्यांना त्यांच्याच पक्षातील ज्येष्ठ नेते किती वेळ देतात हाही संशोधनाचा विषय आहे़ संभाजी पाटील निलंगेकरांवर असा टोलाही लोंढे यांनी लगावला़ यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते संतोष पांडागळे, मुन्तजीब यांची उपस्थिती होती़