शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या महिलेच्या अंगावरील दागिने दवाखान्यातून गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:02 IST

आळंद : कोरोनाने उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या महिलेच्या अंगावरील दागिने औरंगाबादेतील रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी लंपास केल्याची तक्रार मयत महिलेच्या मुलांनी पुंडलिकनगर ...

आळंद : कोरोनाने उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या महिलेच्या अंगावरील दागिने औरंगाबादेतील रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी लंपास केल्याची तक्रार मयत महिलेच्या मुलांनी पुंडलिकनगर पोलीस ठाणे व जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. रुग्णालय प्रशासनाची सविस्तर चौकशी करून, दागिने परत मिळवून देण्यासाठी ते एप्रिल महिन्यापासून चकरा मारीत आहेत. मात्र, अद्यापही त्यांची कोणी दखल घेतली नाही. रुग्णालय प्रशासनाने मात्र, हे आरोप फेटाळले आहेत.

दिलेल्या निवेदनात नमूद केले की, फुलंब्री तालुक्यातील नायगव्हान येथील मालनबाई भिवसन भालेराव यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने, नातेवाइकांनी ७ एप्रिल, २०२१ रोजी औरंगाबादेतील गजानन हॉस्पिटल व क्रिटिकल सेंटर येथे दाखल केले होते. कोरोना झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर, त्यांच्यावर तेथेच उपचार सुरू झाले. त्यावेळी मालनबाई यांच्या अंगावर मंगळसूत्र, सोन्याच्या बाळ्या व इतर असे सुमारे ७० ते ८० हजार रुपयांचे दागिने होते. कोरोनामुळे नातेवाइकांना आत जाण्यासाठी परवानगी नव्हती. दरम्यान, १२ एप्रिल रोजी सायंकाळी मालनबाई यांचा मृत्यू झाला. नातेवाईक हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर, त्यांना मयतास बघू न देता, मृतदेह तसाच मनपा कर्मचाऱ्यांच्या ताब्यात दिला. त्यांनी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले. दोन दिवसांनी मालनबाईच्या अंगावरील दागिन्यांबाबत कुटुंबीयांच्या लक्षात आले. मुलगा भाऊसाहेब व दीपक भालेराव यांनी गजानन हॉस्पिटलमध्ये जाऊन दागिन्यांबाबत चौकशी केली असता, त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली, तसेच हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची विनंती करूनही टाळाटाळ करण्यात आली. यानंतर, त्यांनी पुंडलिकनगर पोलीस ठाणे गाठून निवेदन दिले. मात्र, पोलिसांनी केवळ आश्वासन देऊन बोळवण केली. कारवाई होत नसल्याने भालेराव यांच्या मुलांनी जिल्हाधिकारी कार्यालयातही निवेदन देऊन दागिने मिळवून देण्याची मागणी केली आहे. मात्र, याकडे अद्यापही कोणी लक्ष दिले नाही.

कोट

कोरोनामुळे आईचा मृत्यू झाला, त्यावेळी अंगावर ८० हजार रुपयांचे दागिने अंगावर होते. ते दागिने गायब असून, रुग्णालय प्रशासनाला सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी अनेक वेळा केली. मात्र, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन टाळाटाळ केली. याबाबत पुंडलिकनगर पोलिसांना, तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊनही कोणीही दखल घेतली नाही.

- भाऊसाहेब भिवसन भालेराव, मयत महिलेचा मुलगा.

कोट

मी उपचारासाठी रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांवर उपचार करतो. त्यामुळे रुग्णांच्या अंगावरील दागिन्यांबाबत मला काहीही माहिती नाही.

डॉ.गीतेश दळवी

-गजानन हॉस्पिटल व क्रिटिकल सेंटर, औरंगाबाद.

290621\img-20210629-wa0132.jpg

फोटो ओळ:मालनबाई भालेराव यांचे दागिने मिळण्यासाठी भाऊसाहेब भालेराव यांनी पोलिस ठाणे व जिल्हाधिकारी यांना दिलेले निवेदन.